शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मीरा-भाईंदरमध्ये १७ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर १२१ दुकानांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 23:47 IST

नागरिकांना दिलासा; १७ लाख ५१ हजार ७१० किलो धान्याचे वाटप

- धीरज परब मीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये शिधावाटप विभागात अवघे १७ कर्मचारी आणि १२१ शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून शिधावाटपाचे काम करत आहेत. आतापर्यंत शहरातील २ लाख ३८ पैकी ८७ टक्के लाभार्थ्यांना १७ लाख ५१ हजार ७१० किलो इतके तांदूळ व गहू वाटप करण्यात आले. तर मे पासून २ लाख ५२ हजार केशरी कार्डधारक लाभार्थ्यांनाही धान्य वाटप केले जाणार आहे.धान्य घेण्यासाठी शिधावाटप दुकानाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातच काही नगरसेवक, कार्यकर्ते यांना त्यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यास दिले नाही म्हणून फुगल्याने कांगावे करत सुटले आहेत. तर धान्य वाटपाची आकडेवारी ही आॅनलाइनही पाहता येत असून बायोमेट्रिकद्वारे धान्य वितरण होत असल्याने कांगावे बिनबुडाचे ठरत आहेत. शिधावाटप विभागात २० कर्मचारी असून त्यातील १७ कर्मचारीच सध्या कामा वर येत आहेत. काही महिला कर्मचारी तर केळवे, वसई आदी भागातून रोज दुचाकीने जीव धोक्यात घालून कामावर येत आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग त्यात १२१ शिधावाटप दुकानांमध्ये धान्य वाटपाचे नियोजन करणे अवघड जात आहे. नागरिकांकडून धान्यासाठी मोठी गर्दी केली जात असल्याने कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.अन्न सुरक्षा योजनेतील ५२ हजार शिधापत्रिका असून २ लाख ३८ हजार इतके लाभार्थी आहेत. आतापर्यंत या लाभार्थ्यांना ५ लाख ९६ हजार ६४५ किलो गहू व ४ लाख ९ हजार ९०० किलो तांदळाचे वाटप केलेले आहे. या शिवाय प्रती माणशी ५ किलोप्रमाणे ७ लाख ४५ हजार १६५ किलो तांदूळ मोफत देण्यात आला आहे. ८७ टक्के लाभार्थ्यांना आतापर्यंत धान्य वाटप झालेले असून एप्रिल संपायच्या आत यात आणखी वाढ होणार आहे. ज्यांच्या शिधावाटप पत्रिका आधारशी लिंक झालेल्या नाहीत त्यांनाही मे महिन्यापासून धान्य मिळणार असल्याचे शिधावाटप अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या ५४ हजार इतकी असून २ लाख ५२ हजार लाभार्थी आहेत. त्यांनाही मे व जूनसाठी प्रती माणशी ३ किलो गहू ८ रुपये दराने तर २ किलो तांदूळ १२ रुपये दराने दिले जाणार आहेत.सबळ पुराव्यासह तक्रारी कराव्यातसरकारकडून आवश्यक धान्यसाठा येत असून सर्वच लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे धान्य मिळणार आहे. परंतु, नागरिकांनी गर्दी न करता प्रशासन व शिधावाटप दुुकानदारांना सहकार्य करावे. धान्यवाटपाबद्दल कोणत्या तक्रारी असतील, तर त्या सबळ पुराव्यांसह दिल्या जाव्यात, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.