शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

मीरा-भाईंदरमध्ये १७ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर १२१ दुकानांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 23:47 IST

नागरिकांना दिलासा; १७ लाख ५१ हजार ७१० किलो धान्याचे वाटप

- धीरज परब मीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये शिधावाटप विभागात अवघे १७ कर्मचारी आणि १२१ शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून शिधावाटपाचे काम करत आहेत. आतापर्यंत शहरातील २ लाख ३८ पैकी ८७ टक्के लाभार्थ्यांना १७ लाख ५१ हजार ७१० किलो इतके तांदूळ व गहू वाटप करण्यात आले. तर मे पासून २ लाख ५२ हजार केशरी कार्डधारक लाभार्थ्यांनाही धान्य वाटप केले जाणार आहे.धान्य घेण्यासाठी शिधावाटप दुकानाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातच काही नगरसेवक, कार्यकर्ते यांना त्यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यास दिले नाही म्हणून फुगल्याने कांगावे करत सुटले आहेत. तर धान्य वाटपाची आकडेवारी ही आॅनलाइनही पाहता येत असून बायोमेट्रिकद्वारे धान्य वितरण होत असल्याने कांगावे बिनबुडाचे ठरत आहेत. शिधावाटप विभागात २० कर्मचारी असून त्यातील १७ कर्मचारीच सध्या कामा वर येत आहेत. काही महिला कर्मचारी तर केळवे, वसई आदी भागातून रोज दुचाकीने जीव धोक्यात घालून कामावर येत आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग त्यात १२१ शिधावाटप दुकानांमध्ये धान्य वाटपाचे नियोजन करणे अवघड जात आहे. नागरिकांकडून धान्यासाठी मोठी गर्दी केली जात असल्याने कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.अन्न सुरक्षा योजनेतील ५२ हजार शिधापत्रिका असून २ लाख ३८ हजार इतके लाभार्थी आहेत. आतापर्यंत या लाभार्थ्यांना ५ लाख ९६ हजार ६४५ किलो गहू व ४ लाख ९ हजार ९०० किलो तांदळाचे वाटप केलेले आहे. या शिवाय प्रती माणशी ५ किलोप्रमाणे ७ लाख ४५ हजार १६५ किलो तांदूळ मोफत देण्यात आला आहे. ८७ टक्के लाभार्थ्यांना आतापर्यंत धान्य वाटप झालेले असून एप्रिल संपायच्या आत यात आणखी वाढ होणार आहे. ज्यांच्या शिधावाटप पत्रिका आधारशी लिंक झालेल्या नाहीत त्यांनाही मे महिन्यापासून धान्य मिळणार असल्याचे शिधावाटप अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या ५४ हजार इतकी असून २ लाख ५२ हजार लाभार्थी आहेत. त्यांनाही मे व जूनसाठी प्रती माणशी ३ किलो गहू ८ रुपये दराने तर २ किलो तांदूळ १२ रुपये दराने दिले जाणार आहेत.सबळ पुराव्यासह तक्रारी कराव्यातसरकारकडून आवश्यक धान्यसाठा येत असून सर्वच लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे धान्य मिळणार आहे. परंतु, नागरिकांनी गर्दी न करता प्रशासन व शिधावाटप दुुकानदारांना सहकार्य करावे. धान्यवाटपाबद्दल कोणत्या तक्रारी असतील, तर त्या सबळ पुराव्यांसह दिल्या जाव्यात, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.