शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

मीरा-भार्इंदरची ३० टक्के पाणीकपात रद्द

By admin | Updated: January 7, 2016 00:39 IST

मीरा-भार्इंदर शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात आ. नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्नाने रद्द करण्याचा निर्णय ५ जानेवारीला राज्याच्या लाभ

भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात आ. नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्नाने रद्द करण्याचा निर्णय ५ जानेवारीला राज्याच्या लाभ क्षेत्र विकास विभागाचे सचिव शि.मा. उपासे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे शहराला दिलासा मिळणार असून राष्ट्रवादीच्या पाणीकपातीविरोधातील ८ जानेवारीच्या नियोजित आंदोलनाला चपराक बसली आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांवर गेली असून या प्रमाणात शहराला स्टेम व एमआयडीसीकडून होणारा प्रत्येकी ८६ व ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. राज्य शासनाने शहराला एमआयडीसी कोट्यातून अतिरिक्त १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर केला असून त्यातील २० दशलक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित ८० पैकी ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा योजना मार्गी लागली असून ती कार्यान्वित होण्यासाठी सुमारे २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सध्याचा पाणीपुरवठा अपुरा असून तो वाढविण्यासाठी प्रशासनासह राजकीय पाठपुरावा सुरू आहे. परंतु, यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या आंध्रा धरणात क्षमतेपेक्षा १४८ व बारवी धरणात सुमारे १४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन १५ जुलै २०१६ पर्यंत सुसह्य व्हावे, यासाठी ३० टक्के पाणीकपातीला सुरुवात केली आहे. पाणीपुरवठ्याच्या ठिकाणांहून शहर सुमारे ४५ किमी शेवटच्या टोकाला असल्याने अगोदरच होणारा पाणीपुरवठा सुमारे ५० तासांवर गेला असताना या कपातीमुळे शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दरआठवड्याच्या बुधवार ते शुक्रवारदरम्यान पाणीकपातीमुळे खंडित होत असल्याने शनिवार ते रविवारी शहरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. त्यामुळे शहरवासीयांना कपातीमधून वगळावे, अशी मागणी मेहता यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार शहराची पाणीकपात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.