शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मीरा-भार्इंदरची ३० टक्के पाणीकपात रद्द

By admin | Updated: January 7, 2016 00:39 IST

मीरा-भार्इंदर शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात आ. नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्नाने रद्द करण्याचा निर्णय ५ जानेवारीला राज्याच्या लाभ

भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात आ. नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्नाने रद्द करण्याचा निर्णय ५ जानेवारीला राज्याच्या लाभ क्षेत्र विकास विभागाचे सचिव शि.मा. उपासे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे शहराला दिलासा मिळणार असून राष्ट्रवादीच्या पाणीकपातीविरोधातील ८ जानेवारीच्या नियोजित आंदोलनाला चपराक बसली आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांवर गेली असून या प्रमाणात शहराला स्टेम व एमआयडीसीकडून होणारा प्रत्येकी ८६ व ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. राज्य शासनाने शहराला एमआयडीसी कोट्यातून अतिरिक्त १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर केला असून त्यातील २० दशलक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित ८० पैकी ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा योजना मार्गी लागली असून ती कार्यान्वित होण्यासाठी सुमारे २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सध्याचा पाणीपुरवठा अपुरा असून तो वाढविण्यासाठी प्रशासनासह राजकीय पाठपुरावा सुरू आहे. परंतु, यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या आंध्रा धरणात क्षमतेपेक्षा १४८ व बारवी धरणात सुमारे १४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन १५ जुलै २०१६ पर्यंत सुसह्य व्हावे, यासाठी ३० टक्के पाणीकपातीला सुरुवात केली आहे. पाणीपुरवठ्याच्या ठिकाणांहून शहर सुमारे ४५ किमी शेवटच्या टोकाला असल्याने अगोदरच होणारा पाणीपुरवठा सुमारे ५० तासांवर गेला असताना या कपातीमुळे शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दरआठवड्याच्या बुधवार ते शुक्रवारदरम्यान पाणीकपातीमुळे खंडित होत असल्याने शनिवार ते रविवारी शहरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. त्यामुळे शहरवासीयांना कपातीमधून वगळावे, अशी मागणी मेहता यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार शहराची पाणीकपात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.