शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने तिजोरी उघडली
3
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
4
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
5
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
6
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
7
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
8
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
9
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
10
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
11
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
12
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
13
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
14
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
16
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
17
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
18
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
19
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
20
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर

मीरा-भार्इंदरची ३० टक्के पाणीकपात रद्द

By admin | Updated: January 7, 2016 00:39 IST

मीरा-भार्इंदर शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात आ. नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्नाने रद्द करण्याचा निर्णय ५ जानेवारीला राज्याच्या लाभ

भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात आ. नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्नाने रद्द करण्याचा निर्णय ५ जानेवारीला राज्याच्या लाभ क्षेत्र विकास विभागाचे सचिव शि.मा. उपासे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे शहराला दिलासा मिळणार असून राष्ट्रवादीच्या पाणीकपातीविरोधातील ८ जानेवारीच्या नियोजित आंदोलनाला चपराक बसली आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांवर गेली असून या प्रमाणात शहराला स्टेम व एमआयडीसीकडून होणारा प्रत्येकी ८६ व ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. राज्य शासनाने शहराला एमआयडीसी कोट्यातून अतिरिक्त १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर केला असून त्यातील २० दशलक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित ८० पैकी ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा योजना मार्गी लागली असून ती कार्यान्वित होण्यासाठी सुमारे २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सध्याचा पाणीपुरवठा अपुरा असून तो वाढविण्यासाठी प्रशासनासह राजकीय पाठपुरावा सुरू आहे. परंतु, यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या आंध्रा धरणात क्षमतेपेक्षा १४८ व बारवी धरणात सुमारे १४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन १५ जुलै २०१६ पर्यंत सुसह्य व्हावे, यासाठी ३० टक्के पाणीकपातीला सुरुवात केली आहे. पाणीपुरवठ्याच्या ठिकाणांहून शहर सुमारे ४५ किमी शेवटच्या टोकाला असल्याने अगोदरच होणारा पाणीपुरवठा सुमारे ५० तासांवर गेला असताना या कपातीमुळे शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दरआठवड्याच्या बुधवार ते शुक्रवारदरम्यान पाणीकपातीमुळे खंडित होत असल्याने शनिवार ते रविवारी शहरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. त्यामुळे शहरवासीयांना कपातीमधून वगळावे, अशी मागणी मेहता यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार शहराची पाणीकपात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.