शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मीरा-भार्इंदर पालिकेच्या नवीन नळजोडणी लोकार्पण कार्यक्रमात सेना-भाजपाचा गोंधळ

By admin | Updated: May 1, 2017 00:24 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेला राज्य सरकारने मंजुर केलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्यातील पहिल्या टप्प्यात नवीन नळजोडणी

 राजू काळे/ऑनलाइन लोकमतभार्इंदर, दि. 1 -  मीरा-भार्इंदर महापालिकेला राज्य सरकारने मंजुर केलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्यातील पहिल्या टप्प्यात नवीन नळजोडणी लोकार्पण कार्यक्रम पालिकेने रविवारी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासुन सेना-भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन गोंधळ घातला. सततच्या घोषणाबाजीमुळे रंगलेल्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीष महाजनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले होते. परंतु, तो प्रत्यक्षात ८ वाजता सुरु झाला. दरम्यान सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कार्यक्रमात आपापल्या पक्षाचे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यात सेनेच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने भाजपाची संख्या कमी पडत असल्याचे दिसुन येत होते. मात्र त्यांची नारेबाजी काही केल्या थांबत नसल्याने सुरुवातीला उपमहापौर प्रवीण पाटील यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. तरी देखील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी थांबत नसल्याने महापौर गीता जैन यांनी आवाहन केले. त्यालाही कार्यकर्त्यांनी दाद न दिल्याने भाजपाचे मंत्री प्रकाश मेहता, गिरीष महाजन व्यासपीठावर आल्यानंतरही दोन्ही पक्षांची जोरदार नारेबाजी सुरुच राहिली. अखेर आ. नरेंद्र मेहता यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे वारंवार आवाहन केल्यानंतर ते शांत झाले. त्यानंतर आ. मेहता यांनी केलेल्या भाषणात युती सरकारऐवजी केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्रचे सरकार असल्याचा उल्लेख करुन आपणच करुन दाखवलंच्या उल्लेखावर सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी व्यासपीठाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. ते पाहुन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा हरहर मोदी, घरघर मोदीची नारेबाजी सुरु केली. अखेर आ. प्रताप सरनाईक यांना व्यासपीठावरुन खाली उतरुन सेना कार्यकर्त्यांना शांत करावे लागले. आ. मेहता यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी सरनाईक यांनी केलेल्या भाषणात पाण्यासाठी आपणच विधानसभेत आवाज उठविला असुन तरीदेखील आम्ही श्रेयासाठी धडपडत नाही. सध्याचे सरकार आमच्याच पाठींब्यावर चालत असल्याची आठवण मेहता यांना करुन देत मेहता यांच्या नळजोडणी अर्ज वाटपाचा समाचार घेतला. त्यांनी नागरीकांना समाजकंटक व पाणीचोरांपासुन सावध राहण्याचा सल्ला देताच सरनाईक यांनी मेहता यांनाच टोमणा दिल्याचे गृहित धरुन भाजपाने पुन्हा गोधळ सुरु केला. अखेर सरनाईक यांनी ते विधान काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल केल्याचा खुलासा करुन गोंधळ थांबविण्याचा प्रयत्न केला. या घोषणाबाजीमुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार असले तरी त्याची सुरुवात मीरा-भार्इंदरमधुनच होईल, असे भाकीत केले. हि बाब शहरासाठी भुषणावह नसल्याची खंतही व्यक्त केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूकपुर्वीच घोषणाबाजीला सुरुवात झाल्याचा टोला दोन्ही पक्षाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना लगावला. खा. संजय राऊत यांनी भाजपाच्या हरहर मोदीच्या नारेबाजीवर सामंजसचा डोस देत देशाचे पंतप्रधान असलेले मोदी यांना खालच्या स्तरावर आणू नका, त्यांना त्यांना देशाचे राजकारण करु द्या. त्यांची सध्या मीरा-भार्इंदर मध्ये नाही तर काश्मिरमध्ये गरज असल्याचा चिमटा काढला. तीन तासांहुन अधिक काळ चाललेल्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांची घोषणाबाजीच अधिक काळ सुरु होती.