शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

मीरा-भार्इंदर पालिकेच्या नवीन नळजोडणी लोकार्पण कार्यक्रमात सेना-भाजपाचा गोंधळ

By admin | Updated: May 1, 2017 00:24 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेला राज्य सरकारने मंजुर केलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्यातील पहिल्या टप्प्यात नवीन नळजोडणी

 राजू काळे/ऑनलाइन लोकमतभार्इंदर, दि. 1 -  मीरा-भार्इंदर महापालिकेला राज्य सरकारने मंजुर केलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्यातील पहिल्या टप्प्यात नवीन नळजोडणी लोकार्पण कार्यक्रम पालिकेने रविवारी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासुन सेना-भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन गोंधळ घातला. सततच्या घोषणाबाजीमुळे रंगलेल्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीष महाजनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले होते. परंतु, तो प्रत्यक्षात ८ वाजता सुरु झाला. दरम्यान सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कार्यक्रमात आपापल्या पक्षाचे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यात सेनेच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने भाजपाची संख्या कमी पडत असल्याचे दिसुन येत होते. मात्र त्यांची नारेबाजी काही केल्या थांबत नसल्याने सुरुवातीला उपमहापौर प्रवीण पाटील यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. तरी देखील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी थांबत नसल्याने महापौर गीता जैन यांनी आवाहन केले. त्यालाही कार्यकर्त्यांनी दाद न दिल्याने भाजपाचे मंत्री प्रकाश मेहता, गिरीष महाजन व्यासपीठावर आल्यानंतरही दोन्ही पक्षांची जोरदार नारेबाजी सुरुच राहिली. अखेर आ. नरेंद्र मेहता यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे वारंवार आवाहन केल्यानंतर ते शांत झाले. त्यानंतर आ. मेहता यांनी केलेल्या भाषणात युती सरकारऐवजी केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्रचे सरकार असल्याचा उल्लेख करुन आपणच करुन दाखवलंच्या उल्लेखावर सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी व्यासपीठाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. ते पाहुन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा हरहर मोदी, घरघर मोदीची नारेबाजी सुरु केली. अखेर आ. प्रताप सरनाईक यांना व्यासपीठावरुन खाली उतरुन सेना कार्यकर्त्यांना शांत करावे लागले. आ. मेहता यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी सरनाईक यांनी केलेल्या भाषणात पाण्यासाठी आपणच विधानसभेत आवाज उठविला असुन तरीदेखील आम्ही श्रेयासाठी धडपडत नाही. सध्याचे सरकार आमच्याच पाठींब्यावर चालत असल्याची आठवण मेहता यांना करुन देत मेहता यांच्या नळजोडणी अर्ज वाटपाचा समाचार घेतला. त्यांनी नागरीकांना समाजकंटक व पाणीचोरांपासुन सावध राहण्याचा सल्ला देताच सरनाईक यांनी मेहता यांनाच टोमणा दिल्याचे गृहित धरुन भाजपाने पुन्हा गोधळ सुरु केला. अखेर सरनाईक यांनी ते विधान काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल केल्याचा खुलासा करुन गोंधळ थांबविण्याचा प्रयत्न केला. या घोषणाबाजीमुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार असले तरी त्याची सुरुवात मीरा-भार्इंदरमधुनच होईल, असे भाकीत केले. हि बाब शहरासाठी भुषणावह नसल्याची खंतही व्यक्त केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूकपुर्वीच घोषणाबाजीला सुरुवात झाल्याचा टोला दोन्ही पक्षाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना लगावला. खा. संजय राऊत यांनी भाजपाच्या हरहर मोदीच्या नारेबाजीवर सामंजसचा डोस देत देशाचे पंतप्रधान असलेले मोदी यांना खालच्या स्तरावर आणू नका, त्यांना त्यांना देशाचे राजकारण करु द्या. त्यांची सध्या मीरा-भार्इंदर मध्ये नाही तर काश्मिरमध्ये गरज असल्याचा चिमटा काढला. तीन तासांहुन अधिक काळ चाललेल्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांची घोषणाबाजीच अधिक काळ सुरु होती.