शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरला ७५ दशलक्ष अतिरिक्त पाणी

By admin | Updated: April 10, 2017 05:36 IST

मीरा-भार्इंदरला राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोट्यातून मंजूर केलेला

भार्इंदर : मीरा-भार्इंदरला राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोट्यातून मंजूर केलेला अतिरिक्त ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा १५ मे पासून सुरू होणार आहे. त्यामुळे २००८ पासून नवीन नळजोडण्या बंद झाल्याने केवळ टँकरद्वारे तहान भागवणाऱ्या नवीन इमारतींतील रहिवाशांना नळाद्वारे पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी ३० एप्रिलपासून नवीन नळजोडण्यांचे अर्ज गरजूंना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी ‘लोकमत’ला दिली. शहराला २०१५ पूर्वी स्टेमद्वारे ८६ व एमआयडीसीद्वारे ३० असा एकूण ११६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत होता. हा पाणीपुरवठा वाढत्या शहरीकरणाला अपुरा ठरत होता. शहरात रोज नवनवीन इमारतींचे काम सुरू होत असल्याने लोकसंख्येत सतत वाढ होत आहे. शहराची लोकसंख्या आज १२ लाखांवर गेली असून होणारा पाणीपुरवठा किमान दरडोईपेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे शहराला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी तत्कालीन आघाडी सरकारकडे सतत पाठपुरावा केला. त्याची दखल घेत तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी २०१२ मध्ये शहराला एमआयडीसी कोट्यातून १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर केला. त्यानंतर, सत्तेवर आलेल्या युती सरकारने या मंजूर पाण्यापैकी २०१६ मध्ये शहराच्या पाणीपुरवठ्यात तातडीने २० दशलक्ष लीटर पाण्याची वाढ केली. उर्वरित ८० दशलक्ष लीटर पाणी शहरात आणण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी आवश्यक ठरल्याने ती टाकण्याच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्या पथकाने ८० टक्कयांहून अधिक काम पूर्ण केल्याने शहराला लवकरच पाणी मिळण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)युद्धपातळीवर काम सुरूसध्या युद्धपातळीवर सुरू असलेले काम मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण करण्यात येणार आहे. त्याची चाचणी घेतल्यानंतर १५ मे पासून शहराला प्रत्यक्षात पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. पुरेशा पाण्याअभावी पालिकेने २००८ पासून नवीन नळजोडण्या देणे बंद केले होते. शहरातील नवीन इमारतींतील रहिवाशांना केवळ टँकरद्वारे तहान भागवावी लागत आहे. यंदा अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू होणार असल्याने त्या रहिवाशांना टँकरची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना नवीन नळजोडणीद्वारे पाणी मिळणार आहे.