शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

मीरा-भार्इंदरला ७५ दशलक्ष अतिरिक्त पाणी

By admin | Updated: April 10, 2017 05:36 IST

मीरा-भार्इंदरला राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोट्यातून मंजूर केलेला

भार्इंदर : मीरा-भार्इंदरला राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोट्यातून मंजूर केलेला अतिरिक्त ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा १५ मे पासून सुरू होणार आहे. त्यामुळे २००८ पासून नवीन नळजोडण्या बंद झाल्याने केवळ टँकरद्वारे तहान भागवणाऱ्या नवीन इमारतींतील रहिवाशांना नळाद्वारे पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी ३० एप्रिलपासून नवीन नळजोडण्यांचे अर्ज गरजूंना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी ‘लोकमत’ला दिली. शहराला २०१५ पूर्वी स्टेमद्वारे ८६ व एमआयडीसीद्वारे ३० असा एकूण ११६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत होता. हा पाणीपुरवठा वाढत्या शहरीकरणाला अपुरा ठरत होता. शहरात रोज नवनवीन इमारतींचे काम सुरू होत असल्याने लोकसंख्येत सतत वाढ होत आहे. शहराची लोकसंख्या आज १२ लाखांवर गेली असून होणारा पाणीपुरवठा किमान दरडोईपेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे शहराला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी तत्कालीन आघाडी सरकारकडे सतत पाठपुरावा केला. त्याची दखल घेत तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी २०१२ मध्ये शहराला एमआयडीसी कोट्यातून १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर केला. त्यानंतर, सत्तेवर आलेल्या युती सरकारने या मंजूर पाण्यापैकी २०१६ मध्ये शहराच्या पाणीपुरवठ्यात तातडीने २० दशलक्ष लीटर पाण्याची वाढ केली. उर्वरित ८० दशलक्ष लीटर पाणी शहरात आणण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी आवश्यक ठरल्याने ती टाकण्याच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्या पथकाने ८० टक्कयांहून अधिक काम पूर्ण केल्याने शहराला लवकरच पाणी मिळण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)युद्धपातळीवर काम सुरूसध्या युद्धपातळीवर सुरू असलेले काम मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण करण्यात येणार आहे. त्याची चाचणी घेतल्यानंतर १५ मे पासून शहराला प्रत्यक्षात पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. पुरेशा पाण्याअभावी पालिकेने २००८ पासून नवीन नळजोडण्या देणे बंद केले होते. शहरातील नवीन इमारतींतील रहिवाशांना केवळ टँकरद्वारे तहान भागवावी लागत आहे. यंदा अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू होणार असल्याने त्या रहिवाशांना टँकरची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना नवीन नळजोडणीद्वारे पाणी मिळणार आहे.