शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

मीरा-भार्इंदरला ७५ दशलक्ष अतिरिक्त पाणी

By admin | Updated: April 10, 2017 05:36 IST

मीरा-भार्इंदरला राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोट्यातून मंजूर केलेला

भार्इंदर : मीरा-भार्इंदरला राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोट्यातून मंजूर केलेला अतिरिक्त ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा १५ मे पासून सुरू होणार आहे. त्यामुळे २००८ पासून नवीन नळजोडण्या बंद झाल्याने केवळ टँकरद्वारे तहान भागवणाऱ्या नवीन इमारतींतील रहिवाशांना नळाद्वारे पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी ३० एप्रिलपासून नवीन नळजोडण्यांचे अर्ज गरजूंना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी ‘लोकमत’ला दिली. शहराला २०१५ पूर्वी स्टेमद्वारे ८६ व एमआयडीसीद्वारे ३० असा एकूण ११६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत होता. हा पाणीपुरवठा वाढत्या शहरीकरणाला अपुरा ठरत होता. शहरात रोज नवनवीन इमारतींचे काम सुरू होत असल्याने लोकसंख्येत सतत वाढ होत आहे. शहराची लोकसंख्या आज १२ लाखांवर गेली असून होणारा पाणीपुरवठा किमान दरडोईपेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे शहराला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी तत्कालीन आघाडी सरकारकडे सतत पाठपुरावा केला. त्याची दखल घेत तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी २०१२ मध्ये शहराला एमआयडीसी कोट्यातून १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर केला. त्यानंतर, सत्तेवर आलेल्या युती सरकारने या मंजूर पाण्यापैकी २०१६ मध्ये शहराच्या पाणीपुरवठ्यात तातडीने २० दशलक्ष लीटर पाण्याची वाढ केली. उर्वरित ८० दशलक्ष लीटर पाणी शहरात आणण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी आवश्यक ठरल्याने ती टाकण्याच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्या पथकाने ८० टक्कयांहून अधिक काम पूर्ण केल्याने शहराला लवकरच पाणी मिळण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)युद्धपातळीवर काम सुरूसध्या युद्धपातळीवर सुरू असलेले काम मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण करण्यात येणार आहे. त्याची चाचणी घेतल्यानंतर १५ मे पासून शहराला प्रत्यक्षात पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. पुरेशा पाण्याअभावी पालिकेने २००८ पासून नवीन नळजोडण्या देणे बंद केले होते. शहरातील नवीन इमारतींतील रहिवाशांना केवळ टँकरद्वारे तहान भागवावी लागत आहे. यंदा अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू होणार असल्याने त्या रहिवाशांना टँकरची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना नवीन नळजोडणीद्वारे पाणी मिळणार आहे.