शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

दहा महिने होऊनही मिनीट्रेन बंदच...

By admin | Updated: February 16, 2017 02:07 IST

माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेन तांत्रिक अडचणीचे कारण देत रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी बंद केली, आज याला दहा महिने होत

मुकुंद रांजणे / माथेरानमाथेरानची राणी अर्थात मिनीट्रेन तांत्रिक अडचणीचे कारण देत रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी बंद केली, आज याला दहा महिने होत आलेत. मागील वर्षी ८ मेला रेल्वे घसरल्याने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला. तेव्हा रेल्वे सेवा पूर्ववत व्हावी यासाठी माथेरानकरांनी मोठे आंदोलन केले. मात्र ऐन पर्यटन हंगामामध्ये रेल्वे सेवा बंद झाली. पर्यटकांपर्यंत ही बाब जाण्यास उशीर झाला त्यामुळे मागील वर्षी पर्यटनावर त्याचा फार मोठा परिणाम दिसून आला नाही. जसजसा काळ पुढे चालला आहे तसतसा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर याचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. माथेरान हे प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना येथील डोंगर रांगांमध्ये नागमोडी वळणे घेणाऱ्या मिनीट्रेनचे फार मोठे आकर्षण आहे. आपल्या शालेय जीवनात घेतलेला मिनीट्रेनचा थरारक अनुभव आपल्या बच्चे कंपनीनेही घ्यावा अशी येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची इच्छा असते, त्यामुळे येथील मिनीट्रेनमुळे माथेरानच्या पर्यटन व्यवसायास भरभराट आली होती. मात्र रेल्वे प्रशासन तोट्यात चालणारी सेवा म्हणून कायम या मार्गाला दुर्लक्षित करीत राहिले. यामुळेच येथील मार्गावर चालणारी इंजिने व बोगी डबघाईला आली त्याचा परिणाम येथील सेवेवर होऊन गाडी बंद पाडण्याचे प्रमाण वाढू लागले. इंजिनाची क्षमता नसतानाही त्यांना गाड्यांना जोडून प्रवास सुरू होता. हे सत्र जवळजवळ दोन वर्षे सुरु होते, या काळात कोणतेही नवीन इंजिन माथेरानच्या ताफ्यात समाविष्ट केले गेले नाही, त्यामुळे इंजिनाची क्षमता संपून गाडी घसरण्याच्या प्रमाणात वाढ झाली. वॉटरपाइप स्टेशन ते माथेरान दरम्यानच्या मार्गावर अजूनही खूप कामे बाकी आहेत. मधल्या भागातील काही रेल्वे रूळसुध्दा जमिनीखाली बुजले गेले आहेत. अमनलॉज ते माथेरान हे रूळ काढून त्याचा फक्त सांगाडाच शिल्लक ठेवलेला आहे. माथेरान स्थानक मोकाट गुरांचा अड्डाच बनलेला आहे. सर्वत्र धूळ व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळेच माथेरानची मिनीट्रेन लवकरच सुरू करणार या रेल्वे प्रशासनाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याची विचारणा स्थानिकांकडून होत आहे. रेल्वेने चाचणी सुरू केल्याचा देखावा देखील केलेला आहे. अपघात क्षेत्र माथेरानमध्ये आणि चाचणी नेरळमध्ये असा विरोधाभास सुरू आहे. पावसाळ्यात डागडुगीसाठी मिनीट्रेन दरवर्षी बंद असते, मात्र यावर्षी आधीच बंद होऊनदेखील डागडुगी मात्र बंदच होती. त्यामुळेच या हंगामामध्ये तरी ही सेवा सुरू होणार का असा प्रश्न माथेरानकरांना पडला आहे. जर या हंगामापूर्वी रेल्वे सुरू झाली नाही तर त्याचा फटका येथील पर्यटन हंगामावर निश्चित होणार असून उपासमारीचे संकट ओढावणार आहे.