शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भिवंडी महानगरपालिकेचा पगार घेऊन कर्मचारी काम करतात मंत्रालयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 13:30 IST

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेतून कोट्यावधी रूपयांचा पगार घेऊन पालिकेचे सात कर्मचारी गेल्या चार ते अकरा वर्षापासून मंत्रालयात कार्यरत असुन त्यांच्या गैरहजेरीचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे.त्याचबरोबर त्याचबरोबर पालिकेचे आर्थिक नुकसान व नागरिकांच्या पैश्याचा गैरवापर होत असल्याचे दिसुन येत असल्याने पालिका आयुक्त योगेश म्हसे यांनी या कर्मचाºयांच्या सेवा महापालिकेत वर्ग करून ...

ठळक मुद्देपालिकेचे आर्थिक नुकसान व नागरिकांच्या पैश्याचा गैरवापरमंत्रालयातील कर्मचाºयांना आजतागायत पालिकेने दिले सुमारे १ कोटी ३७ लाख ५३ हजार ९९२ रूपये वेतनशासन सेवेत नियमीत करावे अन्यथा महानगरपालिका सेवेत रूजू करावे अशी मागणी

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेतून कोट्यावधी रूपयांचा पगार घेऊन पालिकेचे सात कर्मचारी गेल्या चार ते अकरा वर्षापासून मंत्रालयात कार्यरत असुन त्यांच्या गैरहजेरीचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे.त्याचबरोबर त्याचबरोबर पालिकेचे आर्थिक नुकसान व नागरिकांच्या पैश्याचा गैरवापर होत असल्याचे दिसुन येत असल्याने पालिका आयुक्त योगेश म्हसे यांनी या कर्मचाºयांच्या सेवा महापालिकेत वर्ग करून घ्याव्यात ,अशी मागणी भाजपाच्या पदाधिका-याने केली आहे.उमेश काशिनाथ भोई(लिपीक),बसप्पा दुदप्पा चिकोडी(रोड कामगार),किशोर श्रीधर कदम(लिपीक),सचीन दत्तात्रय महांकाळ(लिपीक), अनिल लहिरे(लिपीक),गणपती मारूती शेषनाईक(बाग कामगार), संदिप कमलाकर पेडणेकर(सफाई कामगार) हे सात कर्मचारी पालिकेच्या आस्थापनात स्थायीपदावर काम करणारे असुन ते सध्या मंत्रालयांत काम करीत आहेत. गेल्या १ वर्षापासून ते ११ वर्षापर्यंत त्यांनी मंत्रालयांत सेवा दिली आहे. त्यांना पालिका प्रशासन २० हजार ते ३४ हजार रूपये पर्यंत मासिक पगार देत असुन आजतागायत त्यांच्यावर पालिकेने सुमारे १ कोटी ३७ लाख ५३ हजार ९९२ रूपये खर्च केले आहेत. पालिकेत काही महिन्यापासून कर्मचा-यांना मुळ पदावर काम करण्याची सक्ती केली जात आहे. शासनाचे कोणतेही धोरण नसताना केवळ राजकीय वरदहस्तामुळे मंत्रालयांत जाणे सोयीचे ठरावे या करीता त्यांना मंत्रालयांत पाठविले आहे. पालिकेतून मासिक वेतन मिळण्यासाठी सर्व कर्मचा-यांना बायोमेट्रीक मशीनवर आंगठा लावणे सक्तीचे केले आहे. मात्र प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने या सात कर्मचा-यांची सेवा केवळ मंत्रालयीन दुरध्वनी संदेशान्वये वर्ग करण्यात आली आहे. या बाबत लेखा परिक्षकांनी देखील आपला अभिप्राय नोांदविलेला नाही. अशा कर्मचा-यांना शासन सेवेत नियमीत करून पालिका आस्थापनावर नवीन नेमणूक करावी अन्यथा या सात कर्मचा-यांना माघारी बोलावून महानगरपालिका सेवेत रूजू करावे,अशी मागणी भाजपाचे जिल्हा विभागीय सरचिटणीस आनंद गद्रे यांनी आयुक्तांकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCorruptionभ्रष्टाचार