शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मंत्र्यांनीच केली दिशाभूल?

By admin | Updated: September 5, 2015 22:28 IST

ठाण्याचा विकास करण्यात अडथळा निर्माण करणारा ९ मीटर रस्त्याचा जीआर काढून शासनाने ठाणेकरांची घोर उपेक्षा केली असतानाच शासनानेच काढलेल्या जीआरला खोटे ठरवून

ठाणे : ठाण्याचा विकास करण्यात अडथळा निर्माण करणारा ९ मीटर रस्त्याचा जीआर काढून शासनाने ठाणेकरांची घोर उपेक्षा केली असतानाच शासनानेच काढलेल्या जीआरला खोटे ठरवून गृहनिर्माणमंत्र्यांनी ठाण्यात पाच लाख घरे बांधण्याची घोषणा केली आहे. त्यांची ही घोषणा निश्चितच ठाणेकरांची फसवणूक करणारी आहे. तरीही, शनिवारी ठाण्यात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माणमंत्र्यांची ही घोषणा खरी ठरविण्यासाठी प्रयत्न केले. तर, आम्ही त्यांचा सत्कार करू, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठामपातील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे. २८ आॅगस्ट २०१५ अन्वये ठाणे महानगरपालिकेमध्ये ०.३३ च्या नोटिफिकेशनची घोषणा केली आहे. शहरातील धोकादायक इमारतींचा विकास व्हावा व त्याकरिता कमी दराने टीडीआर मिळाला तर त्या ठिकाणी विकास करता येईल, अशी भावना असल्याने शासनाच्या या नोटिफिकेशनमुळे ठाणे शहरातील नागरिकांची घोर उपेक्षा झाली आहे. ठाण्यातील धोकादायक किंवा जीर्ण झालेल्या इमारतींबाबत राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून जी मागणी करीत होती, त्या मागण्यांनुसारच राज्याच्या गृहमंत्र्यांनी ठाण्यात ५ लाख घरे बांधण्याची घोषणा केली आहे. ठाण्यातील धोकादायक इमारतींची स्थिती पाहता क्लस्टरसाठी ४ नव्हे तर ६ एफएसआय देण्याची तयारी दाखवली आहे. घरांच्या बांधकामात पर्यावरणाचाही अडथळा येणार नाही, असेही गृहनिर्माणमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या विधानाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन ठाणेकरांच्या जीवितहानीचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, असे आवाहन करतानाच गृहनिर्माणमंत्र्यांच्या या वक्तव्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, असा टोलाही ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जगदाळे यांनी लगावला आहे. तर मंत्र्यांनी हा जीआर रद्द करून दाखवावाठाण्यातील धोकादायक, जीर्ण झालेल्या, तसेच अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवितहानीच्या संरक्षणार्थ ठाण्यात क्लस्टर योजना राबावावी, अशी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षांची मागणी आहे. तसा पाठपुरावाही शासनाकडे केलेला आहे. गेल्या अनेक वर्षांची हीच मागणी राष्ट्रवादीची आहे. असे असतानाच शासनाने काढलेला हा जीआर चुकून निघाला आहे, असे सांगून गुरुवारी राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी ठाण्याला भरभरून देत आहोत, असे सांगून शासनाचा क्लस्टरबाबतचा तो जीआर चुकून काढला आहे, असे म्हटले आहे. तर, त्यांनी हा जीआर रद्द करावा, अशी मागणी आ. आव्हाड यांनी केली आहे.