शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

२७ गाव कर्मचा-यांना मिळणार किमान वेतन, महासभेत प्रस्ताव, वर्षाला ९ कोटी १३ लाखांचा बोजा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:21 IST

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांतील कर्मचा-यांना किमान वेतन मिळावे ही मागणी अंमलात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून यासंदर्भातला प्रस्ताव बुधवारी पार पडणाºया महासभेत दाखल करण्यात आला आहे. ४९४ कर्मचा-यांना या निर्णयाचा लाभ होणार असून महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाकाठी ९ कोटी १३ लाख ८६ हजार २४० ...

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांतील कर्मचा-यांना किमान वेतन मिळावे ही मागणी अंमलात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून यासंदर्भातला प्रस्ताव बुधवारी पार पडणाºया महासभेत दाखल करण्यात आला आहे. ४९४ कर्मचा-यांना या निर्णयाचा लाभ होणार असून महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाकाठी ९ कोटी १३ लाख ८६ हजार २४० रूपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.दि. १ जून २०१५ रोजी २७ गावांचा केडीएमसीत पुन्हा समावेश करण्यात आला. येथील कर्मचाºयांना प्रथम ६ महिन्यांच्या कालावधीसाठी महापालिकेच्या सेवेत रूजू करून घेण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी त्यांना मुदतवाढ देण्यात आली. कायद्यानुसार त्यांना किमान वेतन मिळावे ही मागणी स्थानिक लोक प्रतिनिधींकडून वारंवार होत होती. कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी अलीकडेच आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेऊन किमान वेतनाच्या मुद्याकडे लक्ष वेधले होते. तेव्हा २७ गावातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया आणि आता महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांना शासन निर्णयानुसार देय असणारे किमान वेतन लागू होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. महापालिका प्रशासनाने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता बुधवारी होणाºया महासभेत प्रस्ताव दाखल केला आहे.या निर्णयाचा लाभ मिळणाºया ४९९ कर्मचाºयांपैकी ४ जण हे किमान वेतनापेक्षा जास्त वेतन असलेले असून १ कर्मचारी मृत झालेला आहे. त्यामुळे किमान वेतन देय असलेल्या कर्मचाºयांची संख्या ४९४ इतकी आहे. त्यांची प्रभाग निहाय आकडेवारी पाहता ‘आय’ प्रभागक्षेत्रात २२७ तर ‘ई’प्रभागात २६७ कर्मचारी आहेत. यात १५८ कुशल, अर्धकुशल १२ तसेच ३२४ कर्मचारी हे अकुशल आहेत. २७ गावांमध्ये ग्रामपंचायतींची संख्या २६ इतकी होती. परंतु गावांची संख्या २७ आहे. भोपर आणि देसलेपाडा या दोन गावांची एकच ग्रामपंचायत होती. ज्या कर्मचाºयांना किमान वेतन देय आहे त्यांना ३ हजार ८० इतका विशेष भत्ता लागू आहे.मोजावे लागणार ७६ लाख १५ हजार ५२०किमान वेतनाप्रमाणे आता कुशल कर्मचाºयांना १७ हजार ८० रूपये, अर्धकुशल कर्मचाºयांना १६ हजार ८० तर अकुशल कर्मचाºयांना १४ हजार ५८० रूपये वेतन मिळणार आहे. कुशल कर्मचाºयांवर महिन्याकाठी २६ लाख ९८ हजार ६४०, अर्धकुशल कर्मचाºयांसाठी १ लाख ९२ हजार ९६० तसेच अकुशल कर्मचाºयांवर ४७ लाख २३ हजार ९२० रूपये असे एकूण ७६ लाख १५ हजार ५२० रूपये खर्च होणार आहेत.