शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

२७ गाव कर्मचा-यांना मिळणार किमान वेतन, महासभेत प्रस्ताव, वर्षाला ९ कोटी १३ लाखांचा बोजा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:21 IST

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांतील कर्मचा-यांना किमान वेतन मिळावे ही मागणी अंमलात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून यासंदर्भातला प्रस्ताव बुधवारी पार पडणाºया महासभेत दाखल करण्यात आला आहे. ४९४ कर्मचा-यांना या निर्णयाचा लाभ होणार असून महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाकाठी ९ कोटी १३ लाख ८६ हजार २४० ...

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांतील कर्मचा-यांना किमान वेतन मिळावे ही मागणी अंमलात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून यासंदर्भातला प्रस्ताव बुधवारी पार पडणाºया महासभेत दाखल करण्यात आला आहे. ४९४ कर्मचा-यांना या निर्णयाचा लाभ होणार असून महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाकाठी ९ कोटी १३ लाख ८६ हजार २४० रूपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.दि. १ जून २०१५ रोजी २७ गावांचा केडीएमसीत पुन्हा समावेश करण्यात आला. येथील कर्मचाºयांना प्रथम ६ महिन्यांच्या कालावधीसाठी महापालिकेच्या सेवेत रूजू करून घेण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी त्यांना मुदतवाढ देण्यात आली. कायद्यानुसार त्यांना किमान वेतन मिळावे ही मागणी स्थानिक लोक प्रतिनिधींकडून वारंवार होत होती. कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी अलीकडेच आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेऊन किमान वेतनाच्या मुद्याकडे लक्ष वेधले होते. तेव्हा २७ गावातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया आणि आता महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांना शासन निर्णयानुसार देय असणारे किमान वेतन लागू होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. महापालिका प्रशासनाने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता बुधवारी होणाºया महासभेत प्रस्ताव दाखल केला आहे.या निर्णयाचा लाभ मिळणाºया ४९९ कर्मचाºयांपैकी ४ जण हे किमान वेतनापेक्षा जास्त वेतन असलेले असून १ कर्मचारी मृत झालेला आहे. त्यामुळे किमान वेतन देय असलेल्या कर्मचाºयांची संख्या ४९४ इतकी आहे. त्यांची प्रभाग निहाय आकडेवारी पाहता ‘आय’ प्रभागक्षेत्रात २२७ तर ‘ई’प्रभागात २६७ कर्मचारी आहेत. यात १५८ कुशल, अर्धकुशल १२ तसेच ३२४ कर्मचारी हे अकुशल आहेत. २७ गावांमध्ये ग्रामपंचायतींची संख्या २६ इतकी होती. परंतु गावांची संख्या २७ आहे. भोपर आणि देसलेपाडा या दोन गावांची एकच ग्रामपंचायत होती. ज्या कर्मचाºयांना किमान वेतन देय आहे त्यांना ३ हजार ८० इतका विशेष भत्ता लागू आहे.मोजावे लागणार ७६ लाख १५ हजार ५२०किमान वेतनाप्रमाणे आता कुशल कर्मचाºयांना १७ हजार ८० रूपये, अर्धकुशल कर्मचाºयांना १६ हजार ८० तर अकुशल कर्मचाºयांना १४ हजार ५८० रूपये वेतन मिळणार आहे. कुशल कर्मचाºयांवर महिन्याकाठी २६ लाख ९८ हजार ६४०, अर्धकुशल कर्मचाºयांसाठी १ लाख ९२ हजार ९६० तसेच अकुशल कर्मचाºयांवर ४७ लाख २३ हजार ९२० रूपये असे एकूण ७६ लाख १५ हजार ५२० रूपये खर्च होणार आहेत.