शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

ठाणे जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमीतकमी करा - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 19:26 IST

नियोजन भवन सभागृहात येथील परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. एसटी बस चालकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. रस्त्यामध्ये मध्येच बस थांबवून प्रवाशाना उतरविणे धोक्याचे आहे. त्यामुळे तसे करू नये. महाविद्यालयीन तरूणही दुचाकी चालवितांना हेल्मेट न घालताना दिसतात, त्यमुळे ते स्वत:लाआणि कुटुंबाना देखील संकटात टाकतात

ठळक मुद्देजिल्ह्यातून विविध मार्ग आणि महामार्ग जातात,साहजिकच राज्यात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक अपघातांचे प्रमाणपरवना म्हणजे गाडी चालविण्याचा हक्क नाही तर केवळ सुविधा आहे

ठाणे : जिल्ह्यातून विविध मार्ग आणि महामार्ग जातात, दळणवळण मोठ्या प्रमाणावर होते . साहजिकच राज्यात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक अपघातांचे प्रमाण असून ते कमीतकमी कसे होईल, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. विशेषत: दुचाकींचे वाढते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने कसोशीने प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.नियोजन भवन सभागृहात येथील परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. एसटी बस चालकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. रस्त्यामध्ये मध्येच बस थांबवून प्रवाशाना उतरविणे धोक्याचे आहे. त्यामुळे तसे करू नये. महाविद्यालयीन तरूणही दुचाकी चालवितांना हेल्मेट न घालताना दिसतात, त्यमुळे ते स्वत:लाआणि कुटुंबाना देखील संकटात टाकतात. त्यामुळे आम्ही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी हेल्मेट आवश्यक केले आहे. वाहनचालकांनी हे लक्षात घ्यावे की त्यांना मिळालेला परवना म्हणजे गाडी चालविण्याचा हक्क नाही तर केवळ सुविधा आहे. रस्त्याचा उपयोग करण्याचा पादचारी व इतर लोकांचा हक्क तितकाच महत्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले.रस्ते आणि वाहने सुरक्षित करणे , हे आव्हान आम्हाला पार पाडावे लागते. अगदी मुक्या जनावरांचे बळी सुद्धा गेले नाही पाहिजेत. वाहने चालवितांना आपण ते व्यवस्थित चालवीत असलो तरी इतर वाहनचालक तसे चालवीत असतीलच असे नाही, त्यमुळे आपण नेहमी काळजी घेऊन वाहन चालवावे, असे मार्गदर्शन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी उपस्थित चालकाना दिले. याप्रसंगी एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पवार म्हणाले की, त्यांनी जास्तीत जास्त वेळा अपघातात मरण पावलेल्या तरूणांचे शव विच्छेदन केले आहे, त्यांच्या परिवारांचा आक्र ोश आपण पाहिला आहे. अपघातस्थळी १०८ रु ग्णवाहिका तातडीने अपघातग्रासताना मदत देण्यात नेहमीच आघाडीवर असतात असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिलीप दळवी, रोड सेफ्टी एनजीओचे विलास पवार यांनी देखील आपले विचार मांडले.* ट्रेफिक कीर्तन -यावेळी अभिनय कट्यायाचे किरण नाकती व त्यांच्या कलाकारांनी ट्रेफिक कीर्तन सादर करून वाहतूक नियमांची रंजकपद्धतीने माहिती दिली. याप्रसंगी वाहतूक नियमांची माहिती देणारी स्टीकर्स, पुस्तिका, पताका यांचे अनावरण करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीcollectorजिल्हाधिकारी