शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमीतकमी करा - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 19:26 IST

नियोजन भवन सभागृहात येथील परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. एसटी बस चालकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. रस्त्यामध्ये मध्येच बस थांबवून प्रवाशाना उतरविणे धोक्याचे आहे. त्यामुळे तसे करू नये. महाविद्यालयीन तरूणही दुचाकी चालवितांना हेल्मेट न घालताना दिसतात, त्यमुळे ते स्वत:लाआणि कुटुंबाना देखील संकटात टाकतात

ठळक मुद्देजिल्ह्यातून विविध मार्ग आणि महामार्ग जातात,साहजिकच राज्यात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक अपघातांचे प्रमाणपरवना म्हणजे गाडी चालविण्याचा हक्क नाही तर केवळ सुविधा आहे

ठाणे : जिल्ह्यातून विविध मार्ग आणि महामार्ग जातात, दळणवळण मोठ्या प्रमाणावर होते . साहजिकच राज्यात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक अपघातांचे प्रमाण असून ते कमीतकमी कसे होईल, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. विशेषत: दुचाकींचे वाढते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने कसोशीने प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.नियोजन भवन सभागृहात येथील परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. एसटी बस चालकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. रस्त्यामध्ये मध्येच बस थांबवून प्रवाशाना उतरविणे धोक्याचे आहे. त्यामुळे तसे करू नये. महाविद्यालयीन तरूणही दुचाकी चालवितांना हेल्मेट न घालताना दिसतात, त्यमुळे ते स्वत:लाआणि कुटुंबाना देखील संकटात टाकतात. त्यामुळे आम्ही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी हेल्मेट आवश्यक केले आहे. वाहनचालकांनी हे लक्षात घ्यावे की त्यांना मिळालेला परवना म्हणजे गाडी चालविण्याचा हक्क नाही तर केवळ सुविधा आहे. रस्त्याचा उपयोग करण्याचा पादचारी व इतर लोकांचा हक्क तितकाच महत्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले.रस्ते आणि वाहने सुरक्षित करणे , हे आव्हान आम्हाला पार पाडावे लागते. अगदी मुक्या जनावरांचे बळी सुद्धा गेले नाही पाहिजेत. वाहने चालवितांना आपण ते व्यवस्थित चालवीत असलो तरी इतर वाहनचालक तसे चालवीत असतीलच असे नाही, त्यमुळे आपण नेहमी काळजी घेऊन वाहन चालवावे, असे मार्गदर्शन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी उपस्थित चालकाना दिले. याप्रसंगी एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पवार म्हणाले की, त्यांनी जास्तीत जास्त वेळा अपघातात मरण पावलेल्या तरूणांचे शव विच्छेदन केले आहे, त्यांच्या परिवारांचा आक्र ोश आपण पाहिला आहे. अपघातस्थळी १०८ रु ग्णवाहिका तातडीने अपघातग्रासताना मदत देण्यात नेहमीच आघाडीवर असतात असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिलीप दळवी, रोड सेफ्टी एनजीओचे विलास पवार यांनी देखील आपले विचार मांडले.* ट्रेफिक कीर्तन -यावेळी अभिनय कट्यायाचे किरण नाकती व त्यांच्या कलाकारांनी ट्रेफिक कीर्तन सादर करून वाहतूक नियमांची रंजकपद्धतीने माहिती दिली. याप्रसंगी वाहतूक नियमांची माहिती देणारी स्टीकर्स, पुस्तिका, पताका यांचे अनावरण करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीcollectorजिल्हाधिकारी