शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

मिनी विधानसभेची तयारी , भाजपाच्या कोंडीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:52 IST

दोन वर्षांनी होणाºया विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण मतदार, शेतकरी आणि आदिवासींचा कल स्पष्ट करणा-या आणि त्यामुळेच मिनी विधानसभा म्हणून

ठाणे : दोन वर्षांनी होणाºया विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण मतदार, शेतकरी आणि आदिवासींचा कल स्पष्ट करणा-या आणि त्यामुळेच मिनी विधानसभा म्हणून चर्चेत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या १३ डिसेंबरच्या निवडणुकीत पुन्हा भाजपाच्या कोंडीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ग्रामीण राजकारणात आपले अस्तित्त्व कायम रहावे म्हणून कोणताही पक्ष युती करण्याची शक्यता नसली आणि स्वबळाचीच भाषा सुरू असली, तरी भाजपाविरोध हा छुपा अजेंडा राबवला जाण्याच्या हालचाली सुरू आहेत.ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांची निवडणूकही होणार आहे. त्यातही भिवंडी, शहापूर आणि मुरबाडवरच सर्व पक्षांचे लक्ष केंद्रित आहे. भाजपाची थेट लढत शिवसेनेशी होईल. पण ग्रामीण राजकारणात अजूनही पाय रोवून असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कितपत लढत देऊ शकतील यावर निवडणुकीची रंगत अवलंबून आहे.खासदार कपिल पाटील यांचा राजकीय प्रभाव भिवंडी महापालिका निवडणुकीत फारसा जाणवला नव्हता. त्यामुळे शहरी राजकारणापेक्षा ग्रामीण राजकारणावरील त्यांच्या प्रभावाचा अंदाज भाजपाला घेता येणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण भागाचा कल समजून घेता येणार आहे.तीन वर्षांपूर्वी १ आॅगस्टला पालघर जिल्हा अस्तित्त्वात आल्यानंतर ठाण्याची जिल्हा परिषद बरखास्त झाली. त्यावेळेपासून नवी जिल्हा परिषद स्थापन करण्याचे प्रयत्न झाले. आता निवडणूक घोषित झाल्याने भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांच्या ग्रामीण भागातील राजकारण तापले आहे. भिवंडी, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातच सर्वाधिक जागा असल्याने भिवंडी ग्रामीणचे शिवसेनेचे शांताराम मोरे, मुरबाडमधील भाजपाचे आमदार किसन कथोरे आणि शहापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग बरोरा यांचे राजकारण पणाला लागणार आहे. खास करून भिवंडीत भाजपाचे खासदार आणि शिवसेनेचे आमदार असा संघर्ष आहे.राष्ट्रवादीतून भाजपात आलेले कपिल पाटील यांनी आधीपासूनच फोडाफोडी करत ही निवडणूक किती प्रतिष्ठेची आहे त्याची चुणूक दाखवली आहे. त्यांच्यासोबत भाजपात आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच संधी देणे ही त्यांची राजकीय गरज आहे. पण तसे झाले तर डावलल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांतील नाराजी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.शहापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला अस्तित्व टिकवण्याची शेवटची संधी आहे. तर शिवसेनेला पाय रोवण्याची. मुरबाडमध्ये भाजपातील गट-तट सांभाळून घेण्याची कसरत किसन कथोरे यांना पार पाडावी लागेल. सोबतच त्यांचे राजकीय विरोधक म्हणून कार्यरत असलेले गोटीराम पवार, प्रमोद हिंदुराव यांच्या राजकीय ताकदीचा अंदाजही येईल.शिवसेना-भाजपातील तणाव, राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेनेने घेतलेली भेट आणि शिवसेनेला काँग्रेस करत असलेली मदत यांचा विचार करता या जिल्हा परिषद निवडणुकीत वेगवेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. छोट्या पक्षांची भूमिकाही यात महत्वाची ठरेल.समृद्धीच गाजणार : समृद्धी महामार्गाचे भूसंपादन, त्याला भाजपाचा पाठिंबा आणि शिवसेनेची दुटप्पी भूमिका हा मुद्दा शहापूर तालुक्याच्या प्रचारात गाजेल. तर बडोदा महामार्गासाठीचे भूसंपादन, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या भूसंपादनाचा असंतोष हा मुद्दा अन्य तालुक्यांत गाजण्याची चिन्हे आहेत. अंबरनाथ तालुक्यात नेवाळीच्या आंदोलकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.रणमैदान भिवंडीतच : जिल्हा परिषेदच्या ५३ जागांपैकी २७ जागांचे काठावरचे बहुमत मिळवण्यासाठी ही लढाई आहे. भिवंडी तालुक्यात २१ असल्याने तो तालुका निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. १४ जागा असलेला शहापूर त्या खालोखाल, तर आठ जागा असलेला मुरबाडच्या तालुका तिसºया क्रमांकाचा महत्वाचा तालुका आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक