शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

‘एमआयएम’चा फटका युतीला

By admin | Updated: July 16, 2016 01:52 IST

आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्याने निवडणुक आयोगाने ओवैसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची नोंदणी रद्द केली आहे

ठाणे : आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्याने निवडणुक आयोगाने ओवैसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची नोंदणी रद्द केली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत एमआयएमच्या आड मतांची गोळा बेरीज जुळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना, भाजपला याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर दुसरीकडे याचा फायदा उठविण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीने मुस्लिमबहुल वस्तीत पुन्हा मोर्चे बांधणी सुरु केली आहे.एमआयएम ठाण्यातील काही मुस्लिमबहुल वस्तीत चमत्कार घडवू शकतो अशी चर्चा होती. त्यानुसार कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी या पक्षात जाहीर प्रवेशही केला होता. मुंब्य्रात तर या पक्षाचा चांगलाच बोलबाला सुरु झाला होता. तसेच, समाजवादीमधील देखील काही महत्वाची मंडळी या पक्षाच्या संपर्कात होती. एमआयएमच्या या वाढत्या जोरावरच मुब्ंय्रात शिवसेनेने अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली होती. एमआयएम हे भाजपाचेच पिल्लु असल्याची चर्चाही रंगली होती. एमआयएम रिंगणात नसल्याचा फटका बसेल ही बाब शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनीही मान्य केली आहे. ही नोंदणी रद्द केल्याचा फायदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीलाच अधिक होईल असा त्यांचा दावा आहे. एमआयएम हे भाजपाचे पिल्लू असल्याची बाब मात्र त्यांनी अमान्य केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपा सहानभुती मिळविण्यासाठी एमआयएमची मान्यता पुन्हा मिळवून देईल, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तर कॉंग्रेसने देखील भाजपावर याच मुद्यावरुन आगपाखड केली आहे.