शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तोट्याअभावी लाखो लीटर पाणी जातेय गटारात

By admin | Updated: May 3, 2017 05:31 IST

शहरात तोटयाविना नळातून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. काही प्रभागात नगरसेवकांनी स्वखर्चाने नळाच्या तोटया लावल्या असून

उल्हासनगर : शहरात तोटयाविना नळातून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. काही प्रभागात नगरसेवकांनी स्वखर्चाने नळाच्या तोटया लावल्या असून पाणीटंचाईच्या निषेधार्थ भारिपाच्या नगरसेविका कविता बागूल यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा पालिका आयुक्तांना दिला आहे. पालिकेचा पाणी पुरवठा विभाग नसल्यातच जमा असल्याची टीका होत आहे.उल्हासनगरचे पाणीटंचाईचे ग्रहण सुटता सुटत नाही. पालिकेने पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी एमआयडीसीकडे वाढीव पाण्याची मागणी केली. तर दुसरीकडे नियोजनाअभावी लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. शहरात ३०० कोटीच्या पाणीपुरवठा योजनेतंर्गत नवीन जलवाहिन्या टाकून प्रत्येक घरी, दुकान व कारखान्यांना निळया रंगाच्या पाईपमधून नळजोडण्या दिल्या आहेत. पालिकेने निळया रंगाच्या पाईपमधून नळजोडणी दिल्यावर जुन्या नळजोडण्या खंडीत करणे गरजे होते. मात्र तसे पालिकेने केले नाही. जुन्या व नवीन जलवाहिन्यांतून पुरवठा करीत आहे. नागरिक दोघांचाही उपयोग करीत आहेत. तर काही नागरिकांनी जुन्या नळजोडणीतून पाणीपुरवठा होत असल्याने नवीन जोडण्या घेतल्या नाहीत. अशा हजारो बेवारस तोटयाविना असलेल्या निळया रंगाच्या पाईपमधून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. तत्कालिन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दौरा केला असता हा प्रकार उघड झाला. त्यांनी अशा नळजोडण्या बंद करण्याच्या अथवा त्यांना तोटया बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही विभागाने तोटया लावलेल्या नाहीत. अथवा नळजोडण्या खंडित केलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)स्वखर्चातून बसविल्या तोट्या प्रभाग क्रमांक १८ च्या भारिपच्या नगरसेविका कविता बागूल यांनी पती व समाजसेवक सुधीर बागूल यांच्यासह कार्यकर्त्यांच्या मदतीने सुभाष टेकडी परिसरातील निळया पाईपला तोटया बसविल्या आहेत. तसेच प्रभाग ११ च्या नगरसेविका कविता पंजाबी, लाल पंजाबी यांनीही नळांना तोटया बसविल्या. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाचून, परिसरात पाणीसंकट कमी झाल्याचे पंजाबी यांनी सांगितले. आरोग्याला धोका : सुभाष टेकडी परिसरात दिवसाआड पाणी पुरवठा होण्याऐवजी आठवडयाला दोन दिवस पाणीपुरवठा होतो. तसेच पाणी सोडण्याची वेळ वेळोवेळी बदलत असल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे महिला पिण्यासाठी हातपंपाच्या पाण्याचा उपयोग करीत असल्याने, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.