शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तोट्याअभावी लाखो लीटर पाणी जातेय गटारात

By admin | Updated: May 3, 2017 05:31 IST

शहरात तोटयाविना नळातून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. काही प्रभागात नगरसेवकांनी स्वखर्चाने नळाच्या तोटया लावल्या असून

उल्हासनगर : शहरात तोटयाविना नळातून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. काही प्रभागात नगरसेवकांनी स्वखर्चाने नळाच्या तोटया लावल्या असून पाणीटंचाईच्या निषेधार्थ भारिपाच्या नगरसेविका कविता बागूल यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा पालिका आयुक्तांना दिला आहे. पालिकेचा पाणी पुरवठा विभाग नसल्यातच जमा असल्याची टीका होत आहे.उल्हासनगरचे पाणीटंचाईचे ग्रहण सुटता सुटत नाही. पालिकेने पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी एमआयडीसीकडे वाढीव पाण्याची मागणी केली. तर दुसरीकडे नियोजनाअभावी लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. शहरात ३०० कोटीच्या पाणीपुरवठा योजनेतंर्गत नवीन जलवाहिन्या टाकून प्रत्येक घरी, दुकान व कारखान्यांना निळया रंगाच्या पाईपमधून नळजोडण्या दिल्या आहेत. पालिकेने निळया रंगाच्या पाईपमधून नळजोडणी दिल्यावर जुन्या नळजोडण्या खंडीत करणे गरजे होते. मात्र तसे पालिकेने केले नाही. जुन्या व नवीन जलवाहिन्यांतून पुरवठा करीत आहे. नागरिक दोघांचाही उपयोग करीत आहेत. तर काही नागरिकांनी जुन्या नळजोडणीतून पाणीपुरवठा होत असल्याने नवीन जोडण्या घेतल्या नाहीत. अशा हजारो बेवारस तोटयाविना असलेल्या निळया रंगाच्या पाईपमधून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. तत्कालिन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दौरा केला असता हा प्रकार उघड झाला. त्यांनी अशा नळजोडण्या बंद करण्याच्या अथवा त्यांना तोटया बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही विभागाने तोटया लावलेल्या नाहीत. अथवा नळजोडण्या खंडित केलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)स्वखर्चातून बसविल्या तोट्या प्रभाग क्रमांक १८ च्या भारिपच्या नगरसेविका कविता बागूल यांनी पती व समाजसेवक सुधीर बागूल यांच्यासह कार्यकर्त्यांच्या मदतीने सुभाष टेकडी परिसरातील निळया पाईपला तोटया बसविल्या आहेत. तसेच प्रभाग ११ च्या नगरसेविका कविता पंजाबी, लाल पंजाबी यांनीही नळांना तोटया बसविल्या. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाचून, परिसरात पाणीसंकट कमी झाल्याचे पंजाबी यांनी सांगितले. आरोग्याला धोका : सुभाष टेकडी परिसरात दिवसाआड पाणी पुरवठा होण्याऐवजी आठवडयाला दोन दिवस पाणीपुरवठा होतो. तसेच पाणी सोडण्याची वेळ वेळोवेळी बदलत असल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे महिला पिण्यासाठी हातपंपाच्या पाण्याचा उपयोग करीत असल्याने, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.