शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

तोट्याअभावी लाखो लीटर पाणी जातेय गटारात

By admin | Updated: May 3, 2017 05:31 IST

शहरात तोटयाविना नळातून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. काही प्रभागात नगरसेवकांनी स्वखर्चाने नळाच्या तोटया लावल्या असून

उल्हासनगर : शहरात तोटयाविना नळातून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. काही प्रभागात नगरसेवकांनी स्वखर्चाने नळाच्या तोटया लावल्या असून पाणीटंचाईच्या निषेधार्थ भारिपाच्या नगरसेविका कविता बागूल यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा पालिका आयुक्तांना दिला आहे. पालिकेचा पाणी पुरवठा विभाग नसल्यातच जमा असल्याची टीका होत आहे.उल्हासनगरचे पाणीटंचाईचे ग्रहण सुटता सुटत नाही. पालिकेने पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी एमआयडीसीकडे वाढीव पाण्याची मागणी केली. तर दुसरीकडे नियोजनाअभावी लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. शहरात ३०० कोटीच्या पाणीपुरवठा योजनेतंर्गत नवीन जलवाहिन्या टाकून प्रत्येक घरी, दुकान व कारखान्यांना निळया रंगाच्या पाईपमधून नळजोडण्या दिल्या आहेत. पालिकेने निळया रंगाच्या पाईपमधून नळजोडणी दिल्यावर जुन्या नळजोडण्या खंडीत करणे गरजे होते. मात्र तसे पालिकेने केले नाही. जुन्या व नवीन जलवाहिन्यांतून पुरवठा करीत आहे. नागरिक दोघांचाही उपयोग करीत आहेत. तर काही नागरिकांनी जुन्या नळजोडणीतून पाणीपुरवठा होत असल्याने नवीन जोडण्या घेतल्या नाहीत. अशा हजारो बेवारस तोटयाविना असलेल्या निळया रंगाच्या पाईपमधून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. तत्कालिन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दौरा केला असता हा प्रकार उघड झाला. त्यांनी अशा नळजोडण्या बंद करण्याच्या अथवा त्यांना तोटया बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही विभागाने तोटया लावलेल्या नाहीत. अथवा नळजोडण्या खंडित केलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)स्वखर्चातून बसविल्या तोट्या प्रभाग क्रमांक १८ च्या भारिपच्या नगरसेविका कविता बागूल यांनी पती व समाजसेवक सुधीर बागूल यांच्यासह कार्यकर्त्यांच्या मदतीने सुभाष टेकडी परिसरातील निळया पाईपला तोटया बसविल्या आहेत. तसेच प्रभाग ११ च्या नगरसेविका कविता पंजाबी, लाल पंजाबी यांनीही नळांना तोटया बसविल्या. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाचून, परिसरात पाणीसंकट कमी झाल्याचे पंजाबी यांनी सांगितले. आरोग्याला धोका : सुभाष टेकडी परिसरात दिवसाआड पाणी पुरवठा होण्याऐवजी आठवडयाला दोन दिवस पाणीपुरवठा होतो. तसेच पाणी सोडण्याची वेळ वेळोवेळी बदलत असल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे महिला पिण्यासाठी हातपंपाच्या पाण्याचा उपयोग करीत असल्याने, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.