शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा खर्च खड्ड्यांत

By admin | Updated: April 17, 2017 04:49 IST

भिवंडीतील विविध विकासकामांसाठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून भिवंडी महापालिकेस २००६ ते २०१३ या सात वर्षांसाठी एक अब्ज ३३ कोटी १५ लाख ५६ हजार २७२

रोहिदास पाटील, अनगावभिवंडीतील विविध विकासकामांसाठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून भिवंडी महापालिकेस २००६ ते २०१३ या सात वर्षांसाठी एक अब्ज ३३ कोटी १५ लाख ५६ हजार २७२ रुपये इतका निधी देण्यात आला. याच काळात रस्त्याच्या कामासाठी २६ कोटींचे अनुदान राज्य आणि केंद्र सरकारकडून पालिकेला मिळाले होते. कोट्यवधी खर्चूनही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांना खड्डे वाचवत वाहने चालवावी लागतात. मग, रस्त्यासाठी आलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न भिवंडीचे नागरिक विचारत आहे. भिवंडी नगरपालिका असताना कामकाजावर जिल्हाधिकारी, कोेकण आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष असायचे. पण, महापालिकेत रूपांतर झाल्यामुळे अधिकारी व नगरसेवकांचे चांगलेच फावले. अनेक कामे न करताच कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवत भ्रष्टाचार केल्यामुळे आज पालिका डबघाईस आली आहे.विद्यमान आयुक्तांच्या मते ८०० कोटींची देणी असल्याचे यावर्षीच्या अर्थसंकल्पात नमूद केले आहे. १५ वर्षांत प्रशासनाने सुचवलेल्या करवाढीचे प्रस्ताव महासभेने फेटाळले. परिणामी, उत्पन्नात वाढ होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगारच वेळेत देता येत नसल्याने विकासकामांना पैसे कुठून आणणार, असा प्रशासनापुढे प्रश्न असल्याने विकासकामे खोळंबली आहेत.चौदाव्या वित्त आयोगातून अंजूरफाटा ते वंजारपट्टीनाका रस्त्याच्या डांबरीकरणासाठी साडेआठ कोटी २०१६ मध्ये खर्च करण्यात आले. तरीही, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शांतीनगर रस्त्याची दुरवस्था झाल्याने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिनाभरापूर्वी रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. सहा महिन्यांतच रस्ता खराब होत असेल, तर नागरिकांनी कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न रिक्षा युनियनने केला आहे. कल्याणनाका ते साईबाबा पाइपलाइन रस्त्याच्या डांबरीकरणाकरिता साडेतीन कोटी खर्च करण्यात आले. आज या रस्त्यात खड्डे पडले आहेत.सध्या या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.अंजूरफाटा ते वंजारपट्टीनाका रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेत २० वर्षांपासून रस्ते, भुयारी गटारांची कामे बुबेरे असोसिएट, कचेरनाथ मजूर संस्था, कांबे आदिवासी मजूर संस्था करत आहे. अनेक कामांचे कंत्राट याच संस्थांना दिले जात आहे. यांची चौकशी केल्यास कोट्यवधींचा भ्रष्टाचार समोर येईल, अशी माहिती भिवंडी विकास मंचचे अध्यक्ष शरद पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.जुना आग्रा रोड ते शांतीनगर पाइपलाइन रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्तीसाठी पालिकेने ७२ कोटी १७ हजार ६८६ इतका निधी खर्च केला आहे. प्रत्यक्षात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मग, हा निधी गेला कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे. विविध विकासकामांसाठी सात वर्षांत महापालिकेस अब्जावधींचे अनुदान मिळाले आहे. तो निधी खर्चही करण्यात आला आहे. तरीही, विकासकामे झालेली नाहीत. तो निधी कुठे खर्च झाला, याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र जनरल युनियनचे अध्यक्ष महेंद्र कुंभारे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.