शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

बारवी धरणग्रस्तांचे कोट्यवधी लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 03:00 IST

निम्म्याहून अधिक ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि उंची वाढूनही धरणग्रस्तांचे पुनर्वसन न झाल्याने पाणी साठवण्यात अडथळा उभा राहिलेल्या बारवी

मुरबाड : निम्म्याहून अधिक ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि उंची वाढूनही धरणग्रस्तांचे पुनर्वसन न झाल्याने पाणी साठवण्यात अडथळा उभा राहिलेल्या बारवी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या रकमेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. लाभार्थ्यांच्या यादीत बनावट नावे घुसडून कोट्यवधी रूपये हडपल्याचे प्रकरण समोर आले असून त्याची चौकशी करावी आणि त्यात संगनमत करणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे केली आहे.ठाणे जिल्हात पाणीपुरवठ्यात बारवी धरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले असले, तरी जोवर बुडिताखाली जाणाºयांचे पुनर्वसन होत नाही, तोवर गावे न सोडण्याच्या निर्णयामुळे गेली दोन वर्षे ठाणे जिल्ह्याची पाणीटंचाई कमी झालेली नाही. मानिवली, मोहघर, तोंडली, काचकोळी, जांभूळवाडी, कोळेवडखळ, सुकाळवाडी अशी सुमारे बारा गावे आणि वाड्या पाण्याखाली जात असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बाधित शेतकºयांची घरे, जमिनी, शेती, झाडे यांची मोजणी केली. त्यांचे मूल्यांकन करु न त्यांना भरपाई देण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्या पालिका धरणातून पाणी उचलतात, त्या पालिकांत या बाधित कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचा, तसेच ज्यांना भरपाईची रक्कम हवी आहे, त्यांना रक्कम देण्याचा पाठपुरावा करण्यात आला. आमदार किसन कथोरे यांनी त्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर अनेक कुटुंबांनी भरपाईची रक्कम स्वीकारली. दरम्यानच्या काळात प्रकल्पग्रस्तांना मिळणाºया रकमेवर डोळा ठेवत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी लाभार्थींची बोगस नावे घुसवली. त्यांच्या नावावर कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले. त्याचाच पाठपुरावा आमदारांनी सुरू केला आहे.काही लाभार्थींचे बारवी धरण परिसरात घर नसताना त्यांचे मूल्यांकन केल्याचे दाखवून, तसेच एका घराची चार-चार घरे दाखवून त्यांना पन्नास लाखांपर्यंत भरपाई दिली, असा आक्षेप घेत एमआयडीसीचे उपअभियंता बाळू राऊतराय यांनी सरकारी तिजोरी लुटल्याचा आक्षेप या पत्रात घेण्यात आला आहे.काही धरणग्रस्तांनी अधिकाºयांना टक्केवारी न दिल्यामुळे त्यांना सरकारी नियमानुसार दिली जाणारी भरपाई मिळालेली नाही. परिणामी, त्यांच्यात तीव्र नाराजी असल्याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. दोषी अधिकारी, लाभार्थी यांची यादी आणि ज्यांना नियमानुसार भरपाई मिळालेली नाही, त्याचा संदर्भ यात देण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराबद्दल अधिकाºयांची विभागीय चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, असा आग्रहही कथोरे यांनी उद्योग राज्यमंत्र्यांकडे धरला आहे. या बोगस लाभार्थी प्रकरणाबाबत बारवी धरण विभागाचे उप अभियंता बाळू राऊतराय आणि कार्यकारी अभियंता ननावरे यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी काही बोलण्यास नकार दिला.