शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
3
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
4
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
6
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
7
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
8
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
9
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
10
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जीन्स कामगारांनी केले स्थलांतर, महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतरही निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:07 IST

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शेकडो जीन्स कारखाने बंद ठेवले आहेत. यामुळे हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी कामाच्या शोधात स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे. परिणामी जीन्स कारखान्याच्या परिसरात शुकशुकाट पसरला आहे.

उल्हासनगर : सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शेकडो जीन्स कारखाने बंद ठेवले आहेत. यामुळे हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी कामाच्या शोधात स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे. परिणामी जीन्स कारखान्याच्या परिसरात शुकशुकाट पसरला आहे.उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शेकडो जीन्स कारखाने असून ५० हजारापेक्षा अधिक कामगार कारखान्यात काम करतात. गेल्या महिन्यात सर्वाेच्च न्यायालयाने वालधुनी व उल्हास नदीला प्रदूषित करणाºया कारखान्यांची वीज व पाणी जोडणी खंडीत करण्याचे आदेश पालिकेला दिले. महावितरण व महापालिकेने वीज, पाणीपुरवठा खंडीत करण्यापूर्वीच कारखानदारांनी कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या प्रकारातून लवकरच तोडगा निघेल, असे आश्वासन स्थानिक नेते व कामगार संघटनेच्या नेत्यांनी कारखानदारांना दिले होते.शहरातील जीन्स कारखान्यांची महापालिका तसेच प्रदूषण मंडळाकडे नोंद नसून कारखाने बेकायदा सुरू होते. कारखान्यातील सांडपाणी थेट नाल्याद्वारे वालधुनी नदीत सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. तसेच वालधुनी नदी प्रदूषित झाल्याचा आरोप वनशक्ती सामाजिक संस्थेने करून नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न जनहित याचिकेद्बारे न्यायालयात नेला.हरित लवादाने वालधुनी व उल्हास नदीला प्रदूषित करणाºया उल्हासनगर महापालिकांसह संबंधितांना सुरूवातीला १०० कोटीचा दंड ठोठावला. त्यानंतरच जीन्स कारखाने व रासायनिक कारखान्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. उल्हास नदीत मिळणारा सांडपाण्याचा खेमानी नाल्याचा प्रवाह वळवण्याचे काम सुरू असून त्या योजनेवर ३७ कोटी खर्च येणार आहे. कामगारांच्या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे. अशीच परिस्थिती दोन ते तीन महिने राहिल्यास, बहुतांश जीन्स कामगार शहर सोडून जातील अशी प्रतिक्रीया कारखानदार देत आहेत.कलानी यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे-जीन्स कारखादारांनी अंबरनाथ एमआयडीसीमध्ये जागा मागितली आहे. तसेच ९ ते १० जीन्स कारखानदार एकत्र येऊन एटीपी प्लॅन्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही कोणताही निर्णय झाला नसल्याने जीन्स कारखान्यांवर गंडातर आहे. शिवसेनेने सुरूवातीला मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातल्यानंतर आता आमदार ज्योती कलानी यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना निवेदन देऊन जीन्स कारखान्याबाबत तोडगा काढण्यासाठी साकडे घातले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर