शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीच्या निवासी भागात दहापट करवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:11 IST

डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागातील रहिवाशांच्या मालमत्ताकरात कल्याण-डोंबिवली महापालिकेने तब्बल आठ ते दहापट वाढ केली आहे. ही करवाढ नियमाला धरून नसल्याचा दावा करत नागरिकांनी या करवाढीस विरोध केला आहे.

कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागातील रहिवाशांच्या मालमत्ताकरात कल्याण-डोंबिवली महापालिकेने तब्बल आठ ते दहापट वाढ केली आहे. ही करवाढ नियमाला धरून नसल्याचा दावा करत नागरिकांनी या करवाढीस विरोध केला आहे. या करवाढीविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा निवासी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे गुरुवारी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना दिला.औद्योगिक वसाहतीमधील निवासी भागात ४०० सोसायट्या व ३०० बंगले आहे. या सगळ्यांच्या मालमत्ताकरात आठ ते दहापट वाढ केली आहे. निवासी भाग हा १९८३ पासून महापालिका हद्दीत होता. २००२ साली महापालिकेतून २७ गावे वगळण्यात आली. त्यामुळे हा निवासी भाग ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेला. २००२ ते २०१५ पर्यंत ग्रामपंचायतीने एक चौरस फुटाला एक रुपया या दराने मालमत्ताकराची आकारणी केली. जून २०१५ साली २७ गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट केली गेली. त्यामुळे निवासी भाग पुन्हा महापालिकेत समाविष्ट झाला. गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यावर सरकारच्या नियमानुसार तीन वर्षांत कोणत्याही प्रकारची करवाढ लागू करता येत नाही. या नियमानुसारच महापालिकेने २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षात कोणत्याही प्रकारची मालमत्ताकरवाढ केली नाही. तीन वर्षांनंतर २० टक्के मालमत्ताकरवाढ अपेक्षित आहे. महापालिकेने निवासी भागातील नागरिकांना जी मालमत्ताकराची बिले पाठवली आहेत, त्यामधील वाढ ही २० टक्के नसून आठ ते दहापट आहे. टक्केवारीनुसार या वाढीचा विचार केल्यास महापालिकेने मालमत्ताकरात २५.५० टक्के वाढ केली आहे. सामान्यकरात केलेली वाढ नागरिक एकवेळ मान्य करतील. मात्र, अन्य करातही आठ ते दहापटीने वाढ केल्याने नागरिकांमध्ये महापालिकेविरोधात असंतोषाचे वातावरण आहे. महापालिका २७ गावांना व्यवस्थित पाणीपुरवठा करत नाही. २७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याच्या दरात वाढ करून ती मालमत्ताकराच्या बिलात दाखवल्याचा आरोप आहे.आदेश धाब्यावर : वाढीव मालमत्ताकराची बिले पाठवली जाऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना एका मंत्रालयातील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनास दिल्या आहेत. मात्र, महापालिकेचा ठराव आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवण्याचे काम प्रशासनाकडून केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महापालिकेने कोलब्रो कंपनीला मालमत्ता सर्वेक्षणाचे काम दिले आहे. जोपर्यंत करआकारणीचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत या कंपनीच्या सर्वेक्षणाला स्थगिती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. महापालिका निवासी भागात सोयीसुविधा पुरवत नाही. त्यामुळे ‘सेवा नाही तर कर नाही’ या धर्तीवर येत्या १५ दिवसांत आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका