शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
5
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
6
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
7
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
8
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
9
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
10
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
11
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
12
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
13
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
14
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
15
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
16
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
17
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
18
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
19
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
20
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?

एमआयडीसीच्या निवासी भागात दहापट करवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:11 IST

डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागातील रहिवाशांच्या मालमत्ताकरात कल्याण-डोंबिवली महापालिकेने तब्बल आठ ते दहापट वाढ केली आहे. ही करवाढ नियमाला धरून नसल्याचा दावा करत नागरिकांनी या करवाढीस विरोध केला आहे.

कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागातील रहिवाशांच्या मालमत्ताकरात कल्याण-डोंबिवली महापालिकेने तब्बल आठ ते दहापट वाढ केली आहे. ही करवाढ नियमाला धरून नसल्याचा दावा करत नागरिकांनी या करवाढीस विरोध केला आहे. या करवाढीविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा निवासी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे गुरुवारी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना दिला.औद्योगिक वसाहतीमधील निवासी भागात ४०० सोसायट्या व ३०० बंगले आहे. या सगळ्यांच्या मालमत्ताकरात आठ ते दहापट वाढ केली आहे. निवासी भाग हा १९८३ पासून महापालिका हद्दीत होता. २००२ साली महापालिकेतून २७ गावे वगळण्यात आली. त्यामुळे हा निवासी भाग ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेला. २००२ ते २०१५ पर्यंत ग्रामपंचायतीने एक चौरस फुटाला एक रुपया या दराने मालमत्ताकराची आकारणी केली. जून २०१५ साली २७ गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट केली गेली. त्यामुळे निवासी भाग पुन्हा महापालिकेत समाविष्ट झाला. गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यावर सरकारच्या नियमानुसार तीन वर्षांत कोणत्याही प्रकारची करवाढ लागू करता येत नाही. या नियमानुसारच महापालिकेने २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षात कोणत्याही प्रकारची मालमत्ताकरवाढ केली नाही. तीन वर्षांनंतर २० टक्के मालमत्ताकरवाढ अपेक्षित आहे. महापालिकेने निवासी भागातील नागरिकांना जी मालमत्ताकराची बिले पाठवली आहेत, त्यामधील वाढ ही २० टक्के नसून आठ ते दहापट आहे. टक्केवारीनुसार या वाढीचा विचार केल्यास महापालिकेने मालमत्ताकरात २५.५० टक्के वाढ केली आहे. सामान्यकरात केलेली वाढ नागरिक एकवेळ मान्य करतील. मात्र, अन्य करातही आठ ते दहापटीने वाढ केल्याने नागरिकांमध्ये महापालिकेविरोधात असंतोषाचे वातावरण आहे. महापालिका २७ गावांना व्यवस्थित पाणीपुरवठा करत नाही. २७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याच्या दरात वाढ करून ती मालमत्ताकराच्या बिलात दाखवल्याचा आरोप आहे.आदेश धाब्यावर : वाढीव मालमत्ताकराची बिले पाठवली जाऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना एका मंत्रालयातील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनास दिल्या आहेत. मात्र, महापालिकेचा ठराव आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवण्याचे काम प्रशासनाकडून केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महापालिकेने कोलब्रो कंपनीला मालमत्ता सर्वेक्षणाचे काम दिले आहे. जोपर्यंत करआकारणीचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत या कंपनीच्या सर्वेक्षणाला स्थगिती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. महापालिका निवासी भागात सोयीसुविधा पुरवत नाही. त्यामुळे ‘सेवा नाही तर कर नाही’ या धर्तीवर येत्या १५ दिवसांत आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका