शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

एमआयडीसी अधिकारी पाकिट घेतात

By admin | Updated: April 26, 2017 00:26 IST

प्रोबेस कंपनीत झालेला स्फोट हा आरडीएक्स क्षमतेचा होता ही बाब धक्कादायक आहे. रसायन साठवणूक, त्यावरील नियंत्रण आणि देखरेख

मुरलीधर भवार / डोंबिवलीप्रोबेस कंपनीत झालेला स्फोट हा आरडीएक्स क्षमतेचा होता ही बाब धक्कादायक आहे. रसायन साठवणूक, त्यावरील नियंत्रण आणि देखरेख याची जबाबदारी असलेल्या एमआयडीसी व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी त्रुटी लपवण्याकरिता पाकिटे घेतात, असा खळबळजनक आरोप कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी ‘लोकमत’कडे केला. राज्यातील सरकारमध्ये शिवसेना सहभागी असून, एमआयडीसी ज्या उद्योग खात्याशी संबंधित आहे त्याचे मंत्री हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आहेत. त्यामुळे महापौर देवळेकर यांनी घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.देवळेकर म्हणाले की, प्रोबेससारखे जीवघेणे स्फोट होऊन निष्पाप लोक मारले जातात. सरकारचे सरकारी यंत्रणांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. हे नियंत्रण ठेवणे महापालिकेचे काम नाही. या सगळ््यांचा गांभीर्याने विचार केला गेला नाही तर पुन्हा प्रोबेसच्या स्फोटाची पुनरावृत्ती होऊ शकते. महापौर म्हणाले की, प्रोबेसमध्ये घातक व अत्यंत ज्वलनशील रसायनाचे उत्पादन घेतले जात होते. त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, त्याची पाहणी करणे आणि काही अनियमितता आढळल्यास संबंधित कारखान्यावर वेळीच कारवाई करणे ही एमआयडीसी व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची जबाबदारी होती. त्यांनी ती पार पाडली असती तर ही दुर्घटना घडलीच नसती. एमआयडीसी कारखान्यांना परवानगी देते तर औद्योगिक संचालनालय देखरेख करते. घातक रसायनांचे उत्पादन करणारे कारखाने डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातून इतरत्र हलवण्यात यावेत, अशी मागणी यापूर्वी केली गेली. त्याला कारखानदारांनी विरोध केला. एका घटनेमुळे इतरांना वेठीस धरूनये. कारखाने हलवले तर अनेक लोक बेराजगार होतील, असे मुद्दे पुढे आले. कारखाने हलवण्याऐवजी त्यावर सरकारी यंत्रणानी योग्य प्रकारे नियंत्रण ठेवल्यास अशा प्रकारचे अपघात घडले नसते. प्राबेसच्या स्फोटानंतर महापालिकेच्या महासभेत कारखाने हलवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. हा ठराव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ज्या रासायनिक कारखान्यांकडून अटी शर्तींचे उल्लंघन केले जाते त्यांच्यावर तरी कारवाई व्हायला हवी, असे देवळेकर म्हणाले.स्फोटानंतर पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांनी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल तयार करण्यात अक्षम्य दिरंगाई केली जात आहे. अहवाल तयार करण्यास वर्ष लागते हेच मोठे आश्चर्य आहे. कारखान्यांना नियमावली घालून द्या व त्याचे पालन होते किंवा कसे त्याचे मॉनिटरिंग करण्याची बाब मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे मांडली होती. मात्र सरकारने काहीच केलेले नाही. यावरुन सरकारची उदासीनता दिसून येते, असे महापौरांनी स्पष्ट केले. प्रोबेसचा स्फोट हा आरडीएक्स क्षमतेचा होता व या रसायनाचा दहशतवाद्यांकडून वापर होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असल्याने याबाबत पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही केवळ आमची सूचना करू शकतो. आम्ही सरकार नाही. चुकीचे करणाऱ्याच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करतो.