शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

राष्ट्रवादीमुळेच म्हस्के बिनविरोध महापौर झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:43 IST

ठाणे : महापालिकेत आमची एक हाती सत्ता आहे. पूर्ण बहुमत आहे, त्यामुळे अशी आंदोलनं करायची असतील तर ...

ठाणे : महापालिकेत आमची एक हाती सत्ता आहे. पूर्ण बहुमत आहे, त्यामुळे अशी आंदोलनं करायची असतील तर आम्हाला तुमची गरज नसल्याचा टोला मंगळवारी महापौर नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना लगावला होता. महापौरांच्या या वक्तव्यावर पलटवार करताना माजी खासदार तथा राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीमुळेच ते बिनविरोध महापौर झाल्याचे स्मरण करून दिले.

आनंद परांजपे यांनी सांगितले की, विस्मृती ही देवाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याचे महापौर! ज्यावेळी महापौरपदाची निवडणूक झाली, त्यावेळी शिवसेनेचे नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांना फोन करून शिवसेनेचा महापौर बिनविरोध व्हावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर १७ नोव्हेंबर २०१९ रोजी एकनाथ शिंदे आणि उमेदवार म्हणून नरेश म्हस्के हे तत्कालीन विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनात आले. त्यावेळी गटनेते नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकदेखील उपस्थित होते. त्यावेळी शिंदे आणि म्हस्के यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे; त्यामुळे ठाण्यातही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती केली. त्यावेळी राष्ट्रवादीने मोठ्या दिलाने निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेला महापौरपद बिनविरोध दिले. राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करीत असतानाही राष्ट्रवादीने ठाण्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. त्यावर परांजपे म्हणाले की, ठामपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. शिवसेनेच्या राजवटीत जी काही अनागोंदी चालली आहे, त्याची पोलखोल महासभा आणि ठाणेकरांसमोर करावी लागणारच आहे. कोविडच्या काळात ठामपा प्रशासनाकडून अनागोंदी कारभार करण्यात आला. शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नव्हता. सत्ताधारी शिवसेना दुटप्पी भावनेने वागत आहे; लसीकरण, विकासनिधीमध्ये सेनेकडून राजकारण केले जात आहे. याचा आक्रोश कधी ना कधी होणारच होता. कालच्या महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे बोलणे सुरू असताना सचिवांकडून महापौरांच्या इशाऱ्यावरून आवाज म्यूट केले गेले. म्हणून त्यांचा आवाज महासभेपर्यंत पोहोचावा, यासाठी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक घुसले होते. महापौरांनी विकासनिधी रोखला होता, यासाठीही हे आंदोलन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परिवहनची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना परिवहनची पाच कोटींची एफडी तोडून ठेकेदाराला बिले देण्यात आली, असा अनागोंदी कारभार आयुक्त डॉ. विपीन शर्मा करीत असल्याचा आरोप परांजपे यांनी केला.