शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पारा ४४ अंशांवर!

By admin | Updated: March 28, 2017 06:01 IST

यंदाचा उन्हाळा तीव्र असेल आणि सूर्य विषुववृत्तावर असल्याने तापमानात मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात असतानाच

लोकमत टीम / ठाणेयंदाचा उन्हाळा तीव्र असेल आणि सूर्य विषुववृत्तावर असल्याने तापमानात मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात असतानाच ठाणे जिल्ह्यात सोमवारी पारा ४४ अंशांवर पोहोचला आणि जनजीवन विस्कळीत झाले. उत्तरेकडून येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे उष्णतेच्या लाटेत भर पडली आहे आणि ती अजून आठवडाभर कायम राहण्याची चिन्हे आहेत. ठाणे जिल्ह्यात बदलापूर, भिवंडी आणि शहापूरमध्ये तापमान सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्याखालोखाल ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, भार्इंदर, उल्हासनगर आदी प्रमुख शहरांत ते ४३ अंशांवर गेले होते. दुपारी १२ ते ४ या चार तासांत तापमानाची तीव्रता वाढली होती. आठवडाभर ही तापमानवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवस वातावरण काहीसे ढगाळ राहील. त्यामुळे तापमानात माफक घसरण होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान वाढत असतानाच वाऱ्याची मंद गती आणि हवेतील आर्द्रतेचे कमी झालेले प्रमाण यामुळे उन्हाच्या झळा अधिक जाणवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) काय काळजी घ्याल?आवश्यकता नसेल तर दुपारच्या उन्हात शक्यतो बाहेर पडू नका. स्कार्फ, सनकोट यांनी अंग झाकून घ्या. घाम शोषून घेतील, असे कॉटनचे (सुती) कपडे वापरा.बाहेर पडण्यापूर्वी किमान दोन ग्लास पाणी पिऊनच बाहेर पडा.कोल्ंिड्रकचा मोह टाळा. त्याऐवजी वाळायुक्त सरबत, ताक, पन्हे, शहाळ्याचे पाणी प्या. त्यात बर्फाचा वापर शक्यतो नको. पाणी पितानाही माठातील प्या. फ्रीजमधील पाणी किंवा थेट बर्फाचे पाणी पिऊ नका. पाण्यात ग्लुकोन डी, इलेक्ट्रॉल पावडर घालावी किंवा साखर-मिठाच्या जलसंजीवनीचा वापर करावा.उन्हातून आल्यावर लगेचच पाणी पिऊ नका किंवा थेट एसीत जाणे टाळा. मध्ये काही काळ जाऊ द्या.उन्हात फिरल्यामुळे तापही आल्यास त्वरित रुग्णालयात न्यावे. तोवर, रु ग्णाच्या अंगावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या. ‘पशुपक्ष्यांची काळजी घ्या’तलखीचा फटका पक्ष्यांनाही बसतो आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने उडणारे पक्षी अचानक कोसळण्याच्या घटना घडत आहेत. शिवाय, प्राणीही पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी ठेवावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. उन्हामुळे छत्र्या, गॉगल, टोप्या, स्कार्फ घातलेले नागरिक दिसत होते. ताक, पन्हे, शहाळ््याचे पाणी पिण्यास गर्दी झाली होती.स्वागतयात्राही लवकरसकाळी साडेआठ-नऊ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत असल्याने त्याचा परिणाम स्वागतयात्रांवरही होण्याची शक्यता आहे.सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान या यात्रा सुरू होतात आणि सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांची मार्गक्रमणा सुरू असते. पण, उन्हाच्या काहिलीमुळे यंदा स्वागतयात्रेच्या मार्गांवर पिण्याच्या पाण्याची, सरबत-ताकाची व्यवस्थाही केली जाणार आहे. शिवाय, यात्रा लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीनेही आयोजकांची आखणी सुरू आहे.