शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘तेजस्विनी’तून पुरूषांची स्वारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एकीकडे राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना दुसरीकडे स्थानिक केडीएमटी उपक्रमाला मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : एकीकडे राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना दुसरीकडे स्थानिक केडीएमटी उपक्रमाला मात्र त्याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसते आहे. महिलांसाठी विशेष धावणाऱ्या तेजस्विनी बसमधून आता पुरूषांनादेखील प्रवास करण्याची मुभा दिली गेली आहे. डोंबिवली पुर्वेकडील स्व. इंदिरा गांधी चौकात तेजस्विनी बसमधून अनेक पुरूष मंडळी प्रवास करताना दिसून आले. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने महिलांसाठी तेजस्विनी बस हा उपक्रम सुरू केला होता. परंतु त्या बसमधील सध्याचे चित्र पाहता भविष्यात एखादी अनुचित घटना घडली, तर याला जबाबदार कोण? असा सवाल महिलांकडून केला जात आहे.

राज्य सरकारकडून केडीएमटी उपक्रमासाठी चार तेजस्विनी बस मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी येणारा भांडवली खर्च म्हणून सरकारकडून उपक्रमाला एक कोटी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून या बस खरेदी करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या लेडीज स्पेशल बसमध्ये वाहक म्हणून १२ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. ज्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी या बस चालविल्या जात आहेत. कल्याण-रिंगरूट (बिर्ला कॉलेज मार्गे), कल्याण-मोहना कॉलनी, डोंबिवली-लोढा हेवन, डोंबिवली-निवासी विभाग या महत्त्वाच्या मार्गांचा यात समावेश आहे. दरम्यान महिलांसाठी सुरू केलेल्या बसचा वापर पुरूष प्रवासी देखील करू लागल्याने राज्य सरकारच्या ‘महिला सुरक्षित’तेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसत आहे.

-----------------------------------------------

अनुचित प्रकार घडण्याची शक्यता

राज्य सरकारने महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या बस चालू केल्या आहेत. त्याप्रमाणेच त्या चालविल्या गेल्या पाहिजेत. जेव्हा लेडीज स्पेशल ट्रेन धावते, तेव्हा त्याठिकाणी पुरूषांना प्रवास करण्यास मनाई असते. परंतु महिला प्रवासी उपलब्ध होत नाहीत, या कारणाखाली तेजस्विनी बसमधून पुरूषांनाही प्रवास करण्यास मुभा देणे हे कितपत योग्य आहे. या बस केवळ महिलांसाठीच असणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. केडीएमसी प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे - भाग्यश्री वाघमारे, महिला प्रवासी

------------------------------------------------

महिलांनाच प्राधान्य असणार

सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत महिलांनाच बसमधून प्रवास करता येणार आहे. सध्या कोरोना काळात महिला प्रवासी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना ठरवून दिलेल्या कालावधी व्यतिरिक्त जर बस रिकामी फिरत असेल तर पुरूषांना गरजेनुसार प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. कोविड काळात हे चित्र नवी मुंबई, ठाणे शहरात सुध्दा दिसत आहे. परंतु जर महिला प्रवासी आल्यास तिला सीटवर बसण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

- संदीप भोसले आगार व्यवस्थापक , केडीएमटी उपक्रम

(फोटो आहे)