शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

‘तेजस्विनी’तून पुरूषांची स्वारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एकीकडे राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना दुसरीकडे स्थानिक केडीएमटी उपक्रमाला मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : एकीकडे राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना दुसरीकडे स्थानिक केडीएमटी उपक्रमाला मात्र त्याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसते आहे. महिलांसाठी विशेष धावणाऱ्या तेजस्विनी बसमधून आता पुरूषांनादेखील प्रवास करण्याची मुभा दिली गेली आहे. डोंबिवली पुर्वेकडील स्व. इंदिरा गांधी चौकात तेजस्विनी बसमधून अनेक पुरूष मंडळी प्रवास करताना दिसून आले. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने महिलांसाठी तेजस्विनी बस हा उपक्रम सुरू केला होता. परंतु त्या बसमधील सध्याचे चित्र पाहता भविष्यात एखादी अनुचित घटना घडली, तर याला जबाबदार कोण? असा सवाल महिलांकडून केला जात आहे.

राज्य सरकारकडून केडीएमटी उपक्रमासाठी चार तेजस्विनी बस मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी येणारा भांडवली खर्च म्हणून सरकारकडून उपक्रमाला एक कोटी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून या बस खरेदी करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या लेडीज स्पेशल बसमध्ये वाहक म्हणून १२ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. ज्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी या बस चालविल्या जात आहेत. कल्याण-रिंगरूट (बिर्ला कॉलेज मार्गे), कल्याण-मोहना कॉलनी, डोंबिवली-लोढा हेवन, डोंबिवली-निवासी विभाग या महत्त्वाच्या मार्गांचा यात समावेश आहे. दरम्यान महिलांसाठी सुरू केलेल्या बसचा वापर पुरूष प्रवासी देखील करू लागल्याने राज्य सरकारच्या ‘महिला सुरक्षित’तेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसत आहे.

-----------------------------------------------

अनुचित प्रकार घडण्याची शक्यता

राज्य सरकारने महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या बस चालू केल्या आहेत. त्याप्रमाणेच त्या चालविल्या गेल्या पाहिजेत. जेव्हा लेडीज स्पेशल ट्रेन धावते, तेव्हा त्याठिकाणी पुरूषांना प्रवास करण्यास मनाई असते. परंतु महिला प्रवासी उपलब्ध होत नाहीत, या कारणाखाली तेजस्विनी बसमधून पुरूषांनाही प्रवास करण्यास मुभा देणे हे कितपत योग्य आहे. या बस केवळ महिलांसाठीच असणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. केडीएमसी प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे - भाग्यश्री वाघमारे, महिला प्रवासी

------------------------------------------------

महिलांनाच प्राधान्य असणार

सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत महिलांनाच बसमधून प्रवास करता येणार आहे. सध्या कोरोना काळात महिला प्रवासी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना ठरवून दिलेल्या कालावधी व्यतिरिक्त जर बस रिकामी फिरत असेल तर पुरूषांना गरजेनुसार प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. कोविड काळात हे चित्र नवी मुंबई, ठाणे शहरात सुध्दा दिसत आहे. परंतु जर महिला प्रवासी आल्यास तिला सीटवर बसण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

- संदीप भोसले आगार व्यवस्थापक , केडीएमटी उपक्रम

(फोटो आहे)