शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पुरुषांचे प्रबोधन करणे गरजेचे - पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:44 IST

आजच्या महिला अबला नसून त्यांच्यात भरपूर कौशल्य आहे. परंतु पुरु ष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना आजही अपेक्षित स्वातंत्र्य पुरूषांनी दिलेले नाही

भिवंडी: आजच्या महिला अबला नसून त्यांच्यात भरपूर कौशल्य आहे. परंतु पुरु ष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना आजही अपेक्षित स्वातंत्र्य पुरूषांनी दिलेले नाही. अनेक प्रगतीशील महिलांचे आवाज या संस्कृतीमध्ये पुरु षांनीच दाबल्याची उदाहरणे आपण बघतो. त्यामुळेच सबला असणाऱ्या महिलांचे खºया अर्थाने सबलीकरण करायचे असेल, तर आधी पुरु षांचे प्रबोधन करण्याची गरज आहे, असे मत भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.तालुक्यातील पिंपळास ग्रामपंचायत हद्दीत भूमी वर्ल्ड कॉम्प्लेक्समध्ये कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन खासदार पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे आदी उपस्थित होते. वस्त्रोेद्योग मंत्रालयातंर्गत एईपीसी पुरस्कृत एटीडीसी, जिल्हाधिकारी आणि भूमी वर्ल्ड यांच्या वतीने कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आले आहे.पाटील म्हणाले की, महाराष्ट्राला थोर स्त्रियांची मोठी परंपरा लाभली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी अशा महिलांनी महाराष्ट्राच्या भूमीत कार्य केले. नवरात्रीत नऊ दिवस फक्त उत्सव साजरा करतो. पण एरव्ही महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आता राजकीय क्षेत्रातही महिलांना आरक्षण मिळाल्याने त्यांना विविध पदेही मिळाली. त्यामुळेच महिलांना सर्व क्षेत्रात मुक्तपणे भरारी घेण्यासाठी सर्व पुरु षांनीच पुढाकार घायला हवा. तरच खºया अर्थाने महिलांची प्रगती होऊ शकेल, असे ते म्हणाले.