शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेचे सदस्यत्च रद्द करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:34 IST

केडीएमसी आयुक्त : शासनाकडे प्रस्ताव सादर

कल्याण : दोन वर्षांपासून एका प्रकरणावर आवाज उठवत असताना त्याला समाधानकारक उत्तर दिले नाही; कारवाई केली नाही. त्यामुळे संतापाच्या भरात भाजपा नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी भर महासभेत आयुक्त गोविंद बोडके यांच्या दिशेने बांगड्या भिरकावल्या होत्या. आयुक्तांनी चौधरी यांच्या गैरवर्तनप्र्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. सरकार या प्रस्तावावर काय निर्णय घेते, याविषयी महापालिका वर्तुळात चर्चा आहे.प्रमिला चौधरी यांच्याविरोधात आयुक्तांच्या वतीने सहायक संचालक नगररचनाकार व नगररचनाकार डोंबिवली यांनी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी चौधरी यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी अधिकारीवर्गाकडून करण्यात आली होती. त्यानुसार, पोलिसांनी चौधरी यांची चौकशी केली होती. या चौकशीला एक दिवस उलटत नाही, तोच ठाकुर्ली येथील चौधरी यांचे जनसंपर्क कार्यालय अधिकृत असल्याची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस पालिका प्रशासनाने प्रमिला चौधरी यांच्या पतीला धाडली होती. एवढ्यावर हा विषय थांबला नाही. महापालिका अधिनियमाचा आधार घेत आयुक्तांनी चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. या वृत्ताला सहायक आयुक्त मिलिंद धाट यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आयुक्तांनी उचललेली पावले ही लोकप्रतिनिधींविरोधातील आहे. लोकप्रतिनिधींच्या हक्क व स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहेत. महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे; मात्र या दोन्ही पक्षांनी चौधरी यांच्या कृत्याचे समर्थन केलेले नाही. त्यांना पाठिंबाही दिला नाही. ही वेळ प्रशासनाच्या दिरंगाई व चालढकलपणाच्या धोरणामुळे आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.सत्ताधारी शिवसेना-भाजपाने चौधरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, कारण आयुक्त भविष्यात चौधरी यांच्या प्रकरणात चुकीचा कारवाईचा पायंडा पाडत आहे. तीच वेळ अन्य सदस्यांवरही येऊ शकते. चौधरी यांच्या पाठीशी भाजपा उभा राहणार नसली, तरी मनसेने या प्रकरणात त्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. याविषयी चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचा प्रस्ताव सरकारकडे आयुक्तांनी पाठवला असेल, तर त्याला समर्पक उत्तर देऊ.एक नगरसेविका दोन वर्षांपासून एखाद्या मुद्यावर प्रश्न विचारत होती. तिला उत्तर दिले गेले नाही. म्हणून, तिने संतापाच्या भरात बांगड्या फेकल्या. तिच्या अधिकारावर आयुक्त कशी काय गदा आणू शकतात, असा प्रश्न या पार्श्वभूमिवर पालिका वर्तुळात उपस्थित केला जात आहे.