शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

वृक्ष प्राधिकरण सदस्य निवडीचा विषय मागे

By admin | Updated: April 19, 2017 00:29 IST

ठाणे महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले किंवा पक्षाने उमेदवारी न दिलेल्या माजी नगरसेवकांचे पुनर्वसन वृक्ष प्राधिकरणात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले किंवा पक्षाने उमेदवारी न दिलेल्या माजी नगरसेवकांचे पुनर्वसन वृक्ष प्राधिकरणात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून याठिकाणी आपली निवड व्हावी म्हणून अनेकांनी अर्ज भरले होते. त्यानुसार या सदस्यांची निवड येत्या २० एप्रिलच्या महासभेत होणार होती. परंतु, प्रशासनाने हा विषयच मागे घेऊन पुणे महापालिकेच्या धर्तीवर सुधारीत प्रस्ताव आणण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या आहेत. पुण्याच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने निर्णय घेतल्यास विविध राजकीय पक्षातील सात तर अध्यक्ष म्हणून आयुक्त एक असे आठ आणि तज्ज्ञ मंडळींमधून सात जणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक माजी नगरसेवकांना यामुळे धक्का बसला आहे.वृक्ष प्राधिकरण समितीत शिवसेनेने पूजा वाघ, नम्रता भोसले यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसने अमति सरैय्या या माजी नगरसेवकांचे अर्ज वृक्षतज्ज्ञ म्हणून भरले असून उर्वरीत ४० ते ४२ अर्जांमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचाच भरणा जास्त आहे.वृक्ष प्राधिकरणाचा कारभार वादग्रस्त ठरू लागल्यानंतर या समितीवर १५ नगरसेवकांसह किमान पाच आणि कमाल १३ वृक्ष तज्ज्ञांची निवड करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी झाला होता. या तज्ज्ञांची निवड करताना ती ठाण्यात वास्तव्याला असावीत अशी पहिली अट घालून शहराबाहेरील तज्ज्ञांच्या निविडचा मार्ग बंद केला आहे. त्यानुसार अनेक अर्ज आल्यानंतर सोमवारी त्याबाबतची छाननी झाली असून जवळपास ४२ जणांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत. त्यात चक्क तीन माजी नगरसेवकांसह सेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचाही भरणा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे वृक्ष प्राधिकरणातील तज्ज्ञ समितीच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान प्रशासनाने आता हा विषयच मागे घेतला असून नव्याने सुधारीत प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुणे महापालिकेत झालेल्या निर्णयाचा आधार घेऊन त्यानुसार आता नव्याने सदस्यांची निवड करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या धर्तीवर उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय राज्यातील सर्वच महापालिकांना लागू होत असल्याने त्याचा आधार घेऊन हा विषय मागे घेतला आहे. आता सुधारीत प्रस्ताव तयार करुन तो सादर केला जाईल. (प्रतिनिधी)