शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

उल्हासनगर रिपाइंच्या बैठकीत शहर जिल्हाध्यक्षला डावलले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:44 IST

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका निवडणुकीपूर्वी निवड समितीची स्थापना करण्यासाठी रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष बी. ...

सदानंद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीपूर्वी निवड समितीची स्थापना करण्यासाठी रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष बी. बी. मोरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बैठक झाली. मात्र, शहर जिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव बैठकीला नसल्याने, निवडणुकीपूर्वी पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली.

उल्हासनगरात रिपाइंची ताकद चांगल्या प्रमाणात असून महापालिकेत पक्षाचे ३ नगरसेवक आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष व गटनेते भगवान भालेराव हे उपमहापौर असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम चालते. महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता असल्याने पक्षाचे पदाधिकारी बी. बी. मोरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. निवडणुकीपूर्वी निवड समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिका निवडणुकीत पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मोरे म्हणाले, तसेच निवड समितीस पक्षप्रमुख व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्याकडून मान्यता घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. बैठकीला प्रदेश सचिव नाना पवार, माजी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक राजू सोनवणे, जे. के. ढोके, माजी नगरसेवक शांताराम निकम, शहर जिल्हा महासचिव गंगाधर मोहोड, अंबादास गायकवाड, किशोर पवार आदी उपस्थित होते. प्रत्यक्षात पक्षाची जबाबदारी भगवान भालेराव यांच्याकडे दिल्याने, पक्षप्रमुख आठवले निवड समितीला मान्यता देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच उल्हासनगरमधील पक्षांतर्गत वादावर काय निर्णय घेतात? याकडेही पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

---------

शहर रिपाइंची जबाबदारी माझ्याकडे

शहरात रिपाइंची ताकद वाढविण्याची जबाबदारी शहराध्यक्ष म्हणून पक्षप्रमुख रामदास आठवले यांनी माझ्याकडे दिली, अशी प्रतिक्रिया भालेराव यांनी दिली. येत्या दोन दिवसांत नव्या दमाची निवड समिती स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले.