शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ बैठक म्हणजे बैल गेला आणि झोपा केला!, राज्यमंत्र्यांवर मनसेची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:11 IST

कल्याण-डोंबिवली शहरांतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी केडीएमसीतील अधिकाऱ्यांबरोबर मंत्रालयात बैठक घेतली होती.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी केडीएमसीतील अधिकाऱ्यांबरोबर मंत्रालयात बैठक घेतली होती. विधानसभा निवडणुका जवळ येताच राज्यमंत्र्यांना समस्यांची जाणीव झाल्याचा आरोप मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. बैल गेला आणि झोपा केला, असेच मंत्रालयातील बैठकीबाबत बोलणे उचित ठरेल. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले असूनही शहरात विकासाची गंगा आणण्यात चव्हाण अपयशी ठरले आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर बैठकांचा दिखावा सुरू असल्याकडेही कदम यांनी लक्ष वेधले.मनसेच्या पत्रकार परिषदेला कदम यांच्यासह केडीएमसीतील मनसेचे गटनेते मंदार हळबे, डोंबिवली शहर महिलाध्यक्ष मंदा पाटील, प्रतिभा पाटील, सुदेश चुडनाईक, सागर जेधे, निलेश भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. कदम पुढे म्हणाले की, राज्यमंत्री चव्हाण यांनी साडेनऊ वर्षांत शहरात कोणतीच विकासाची कामे केली नाहीत. महापालिका, राज्यात आणि देशात सत्ता असतानाही बंद पडलेले सूतिकागृह, २७ गावांमधील अपुरा पाणीपुरवठा, प्रदूषण, खड्डेमय रस्ते, अनधिकृत बांधकामे, रिक्षाचालकांची मुजोरी, वाहतूककोंडी, ट्रेनमधली गर्दी, रखडलेले प्रकल्प अशा विषयांकडे डोळेझाक करत केवळ मी डोंबिवलीकरची टूम चव्हाण वाजवत राहिले. महापालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत असतानाही शुक्रवारी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीला महापौर, सभापती, आमदार यांना का बोलावले नाही. एकतर्फी बैठक घेण्यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल कदम यांनी केला. राज्यमंत्र्यांनी १० वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीत किती निधी विकासकामांसाठी दिला, याचा लेखाजोखा मांडावा, अशीही मागणी यावेळी केली. तर, वाढत असलेली अनधिकृत बांधकामे, गुन्हेगारी, प्रकल्पांमधील भ्रष्टाचार याबाबत आवाज उठवण्याऐवजी राज्यमंत्र्यांनी चुप्पी साधली असल्याचा आरोप मंदार हळबे यांनी केला. दरम्यान, मनसेच्या आरोपांसंदर्भात ‘लोकमत’ने राज्यमंत्री चव्हाण यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही....तर ५०१ रुपयांचे बक्षीस देऊराज्यमंत्र्यांनी आमदारकीच्या आतापर्यंतच्या साडेनऊ वर्षांच्या कालावधीत एकही विकासाचे काम केलेले नाही. त्यांनी एखादा प्रकल्प दाखवावा, ज्यात गैरव्यवहार अथवा चौकशी सुरू नाही आणि तो पूर्ण झाला आहे. असा एखादा तरी प्रकल्प दाखवल्यास मनसेतर्फे त्यांना ५०१ रुपयांचे बक्षीस देऊ, असे आव्हान कदम यांनी यावेळी दिले. शिवसेना पदाधिकारी आणि राज्यमंत्र्यांच्या वादामुळे सहा वर्षे बंद असलेल्या सूतिकागृहाचे काम सुरू होत नसल्याचा आरोपही कदम यांनी यावेळी केला. शास्त्रीनगर रुग्णालयात पोस्टमार्टमची व्यवस्था करणे व महापालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरती करणे, असा घाट सध्या घातला जात आहे. एकीकडे महापालिकेची रुग्णालये सरकारकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असताना हा खाजगीकरणाचा घाट कशासाठी, असा सवालही कदम यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणे