शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

मीरा-भार्इंदरला चार दिवसांनी पाणी

By admin | Updated: February 23, 2016 02:23 IST

दोन दिवसांची पाणीकपात संपत नाही, तोच एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मीरा-भार्इंदरमध्ये तब्बल चार दिवसांनी पाणी आले. तेही कमी दाबाने असल्याने सर्वांना

मीरा रोड : दोन दिवसांची पाणीकपात संपत नाही, तोच एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मीरा-भार्इंदरमध्ये तब्बल चार दिवसांनी पाणी आले. तेही कमी दाबाने असल्याने सर्वांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यातच, बुधवारी मध्यरात्रीपासून पुन्हा दोन दिवसांची पाणीकपात असल्याने आठवडा कोरडा जाणार आहे. मीरा-भार्इंदरला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लीटर तर एमआयडीसीकडून ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. लघुपाटबंधारे विभागाने सुरुवातीला ३० टक्के लागू केलेली पाणीकपात आता ४० टक्के केली आहे. शहरातील पाण्याची समस्या पाहता भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या मागणीनंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्टेम प्राधिकरणाची पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. भाजपाने त्याचा राजकीय लाभ घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. परंतु, स्टेमची पाणीकपात सुरूच असल्याने भाजपा अडचणीत आली. मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणीयोजनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधी पाणीपुरवठा बंद, त्यात खिडकाळीजवळ जलवाहिनी फुटल्याने या पाणीटंचाईत भर पडली. त्यानंतरही कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. तो पूर्ववत होईपर्यंत पुन्हा पुढील आठवड्यातील पाणीकपात सुरू होणार आहे. एमआयडीसीमुळे फटकादोन दिवसांच्या कपातीनंतर शुक्र वारी मध्यरात्रीपासून स्टेम व एमआयडीसीचे पाणी सुरू व्हायला हवे होते. परंतु, ते रविवारी दुपारी सुरू झाल्याने शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा १०५ तासांवर गेला. नियमानुसार पुन्हा बुधवारपासून दोन दिवस कपात आहे. - सुरेश वाकोडे (कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग)९३ तासांनी मिळाले पाणी१७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता पाणी आले होते. त्यानंतर, चार दिवसांनी म्हणजेच ९३ तासांनी रविवारी दुपारी १२ वाजता पाणी आले. पाण्याचा दाब कमी असल्याने आमच्या तीन विंगमधील रहिवाशांना अपुरे पाणी मिळाले. त्यातून वाद निर्माण होत आहेत. चौकशीसाठी आम्ही पाण्याच्या टाकीवर गेलो. आमच्यासाठी पाणी सोडण्याच्या वेळेला आमचे पाणी दुसऱ्याच भागाला दिल्याचा घोटाळा तेथे समोर आला. - निलेश चौधरी (अध्यक्ष, साई विकास सोसायटी, साईबाबानगर)