शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

मीरा-भार्इंदरला चार दिवसांनी पाणी

By admin | Updated: February 23, 2016 02:23 IST

दोन दिवसांची पाणीकपात संपत नाही, तोच एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मीरा-भार्इंदरमध्ये तब्बल चार दिवसांनी पाणी आले. तेही कमी दाबाने असल्याने सर्वांना

मीरा रोड : दोन दिवसांची पाणीकपात संपत नाही, तोच एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने मीरा-भार्इंदरमध्ये तब्बल चार दिवसांनी पाणी आले. तेही कमी दाबाने असल्याने सर्वांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यातच, बुधवारी मध्यरात्रीपासून पुन्हा दोन दिवसांची पाणीकपात असल्याने आठवडा कोरडा जाणार आहे. मीरा-भार्इंदरला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लीटर तर एमआयडीसीकडून ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. लघुपाटबंधारे विभागाने सुरुवातीला ३० टक्के लागू केलेली पाणीकपात आता ४० टक्के केली आहे. शहरातील पाण्याची समस्या पाहता भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या मागणीनंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्टेम प्राधिकरणाची पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. भाजपाने त्याचा राजकीय लाभ घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. परंतु, स्टेमची पाणीकपात सुरूच असल्याने भाजपा अडचणीत आली. मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणीयोजनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधी पाणीपुरवठा बंद, त्यात खिडकाळीजवळ जलवाहिनी फुटल्याने या पाणीटंचाईत भर पडली. त्यानंतरही कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. तो पूर्ववत होईपर्यंत पुन्हा पुढील आठवड्यातील पाणीकपात सुरू होणार आहे. एमआयडीसीमुळे फटकादोन दिवसांच्या कपातीनंतर शुक्र वारी मध्यरात्रीपासून स्टेम व एमआयडीसीचे पाणी सुरू व्हायला हवे होते. परंतु, ते रविवारी दुपारी सुरू झाल्याने शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा १०५ तासांवर गेला. नियमानुसार पुन्हा बुधवारपासून दोन दिवस कपात आहे. - सुरेश वाकोडे (कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग)९३ तासांनी मिळाले पाणी१७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता पाणी आले होते. त्यानंतर, चार दिवसांनी म्हणजेच ९३ तासांनी रविवारी दुपारी १२ वाजता पाणी आले. पाण्याचा दाब कमी असल्याने आमच्या तीन विंगमधील रहिवाशांना अपुरे पाणी मिळाले. त्यातून वाद निर्माण होत आहेत. चौकशीसाठी आम्ही पाण्याच्या टाकीवर गेलो. आमच्यासाठी पाणी सोडण्याच्या वेळेला आमचे पाणी दुसऱ्याच भागाला दिल्याचा घोटाळा तेथे समोर आला. - निलेश चौधरी (अध्यक्ष, साई विकास सोसायटी, साईबाबानगर)