शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जिल्ह्यात आता यांत्रिक भातशेती

By admin | Updated: July 16, 2016 01:45 IST

जिल्ह्यातील भातपीक हे शेतीतील प्रमुुख उत्पादन आहे. उत्पन्नाच्या ९० टक्के खर्च यासाठी काम करणाऱ्या मजुरांवर असे. पण, हा खर्च सध्या परवडणारा नाही

ठाणे : जिल्ह्यातील भातपीक हे शेतीतील प्रमुुख उत्पादन आहे. उत्पन्नाच्या ९० टक्के खर्च यासाठी काम करणाऱ्या मजुरांवर असे. पण, हा खर्च सध्या परवडणारा नाही. यामुळे जिल्ह्यात भातरोवणी, मळणी आणि कापणीसाठी आता खास यांत्रिक पद्धतीचा वापर केला जात असून जिल्हा परिषदेकडून महिला बचत गटांना यासाठी यंत्रे उपलब्ध करून दिली जात आहेत. अशाच एका यंत्रावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भातरोवणी करून या फायदेशीर भातशेती व बारमाही शेतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सूतोवाच केले. कृषी विभागाद्वारे जिल्हा कृषी अधिकारी महावीर जंगटे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्यातील तळवली येथे सिमेंटचा बंधारा बांधला आहे. त्यातील पाण्याचे शिंदे यांनी जलपूजन करून वडवली येथे भातरोवणी यंत्रावर बसून चिखलणीत प्रत्यक्ष भातरोवणी केली. जमीन तयार करणे, चिखलणी, लावणी, काढणी, मळणी या प्रत्येक कामासाठी मजूर लागतात. मात्र, या यंत्रामुळे लावणीच्या खर्चात ५० टक्के, तर मजुरीच्या ७५ टक्के खर्चात बचत होते. एका दिवसात तीन एकरमध्ये या यंत्राद्वारे लावणी केली असून अर्धा लीटर डिझेलमध्ये एक तास भातरोवणी केली जात असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या वेळी सांगितले.भातलावणीपासून ते काढणीपर्यंत एकंदर ८७ मजूर प्रतिदिन लागतात. ३५० रुपये प्रतिदिन मजुरीप्रमाणे एका दिवसासाठी या मजुरांचा खर्च हेक्टरी ३० हजार ४५० रु पये येतो. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ६० हजार ७१७ हेक्टर जमिनीवर भाताची लागवड केली जाते. उत्पादन खर्चाच्या ९० टक्के खर्च हा मजुरीवर जातो. तो कायमस्वरूपी टाळण्यासाठी या यंत्राचा वापर करून महिला बचत गटांच्या ग्रामसंघांना रोजगार मिळवून दिल्याचे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी प्रफुल्ल बनसोडे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने आपल्या सेस निधीतून औजारे बँक ही नावीन्यपूर्ण योजना जिल्ह्यात आणली आहे. ग्रामीण भागातील नोंदणीकृत महिला बचत गटांचे ग्रामसंघ निवडून त्यांना जास्तीतजास्त सात लाख रु पयांपर्यंत अनुदान देऊन औजारे उपलब्ध करून दिली जातात. यंदाही दोन कोटी खर्चून या यंत्रांची खरेदी केली जाणार आहे.