शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

कोरोनाच्या प्रादुर्भावात ४०० लोकांची जेवणाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:42 IST

ठाणे : सध्याच्या कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन अशा प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यांची होणारी धावपळ, जीव ...

ठाणे : सध्याच्या कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन अशा प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यांची होणारी धावपळ, जीव वाचविण्यासाठी होणारी घालमेल, दिवसभर करावी लागणारी वणवण यामुळे दोनवेळच्या जेवणाचीही अनेकांची भ्रांत होत आहे. तर वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनाही उसंत मिळत नसल्याची परिस्थिती आहे. अशांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी श्यामलाल नायर चॅरिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधीचे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या विद्यमाने ठाण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्ण, त्यांचे नातेवाईक, लसीकरण केंद्र तसेच अँटिजेन टेस्टिंग केंद्र, अंगणवाडी सेविका, स्मशानभूमीतील कर्मचारी अशा ४०० लोकांची जेवणाची मोफत सुविधा करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.

ठाण्यातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात, तर काही नातेवाईक विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. अशा कुटुबियांना जेवणाची समस्या येऊ नये, यासाठी श्यामलाल नायर चॅरिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधीने मदतीचा हात पुढे केला आहे. याचबरोबर अंत्यसंस्कारासाठी असलेल्या जवाहर बाग स्मशानभूमी तसेच कळवातील मनीषानगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीमधील कर्मचाऱ्यांना गेल्या दहा दिवसांपासून जेवणाची सोय करून देण्यात येत आहे. याशिवाय ठाण्यातील लसीकरण केंद्रावर येणाऱ्या लोकांनादेखील पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आजघडीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिथे डॉक्टर्स, परिचारिका, स्मशानभूमीतील कर्मचारी तसेच इतर फ्रंटलाईन वर्कर्स स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहेत, अशा पालिका कर्मचाऱ्यांनाचा विचार मात्र पालिकेने केलेला नाही. केवळ विलगीकरण कक्षामध्येच जेवणाची सुविधा असून, अहोरात्र इतर ठिकाणी काम करणाऱ्यांचा मात्र विचार करायला प्रशासन विसरली आहे. या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून, जर कोणात्याही पॉझिटीव्ह किंवा विलगीकरण असलेल्या व्यक्तीला जेवणाची सुविधा आवश्यक असल्यास त्यांनी ९८९२०९०८४७ यावर संपर्क साधावा. आवश्यक त्या व्यक्तींना घरपोच मोफत जेवणाची सुविधा करून दिली जाईल, असे महिंद्रकर यांनी सांगितले.