शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सेवा सक्षम करण्याचे महापौरांचे आदेश

By admin | Updated: December 17, 2015 01:54 IST

ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची देणी बाकी असून त्यांनी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सध्या परिवहनच्या बसची संख्या कमी झाल्याने प्रवाशांचेही हाल होत आहेत.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची देणी बाकी असून त्यांनी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सध्या परिवहनच्या बसची संख्या कमी झाल्याने प्रवाशांचेही हाल होत आहेत. या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, त्याची दखल घेऊन महापौरांनी बुधवारी परिवहनच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन ही व्यवस्था सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत. परिवहनच्या ताफ्यात ३१३ बस असतानादेखील प्रत्यक्षात १९० च्या आसपासच बस रस्त्यावर धावत आहेत. थकीत वेतनासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी येत्या २६ जानेवारीला उपोषणाची हाक दिली आहे. या बैठकीत महापौर संजय मोरे यांनी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी बेस्ट परिवहन सेवेकडून किंवा राज्य परिवहन मंडळाकडून प्रतिनियुक्तीवर व्यवस्थापकासह वाहतूक सल्लागार नियुक्त करणे, यासाठी बैठक आयोजित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सर्वच शहरांतील परिवहन सेवांमध्ये ईटीआयएम मशीन वापरल्या जात आहेत. मात्र, ठाणे परिवहन सेवेत आजही मानवी पद्धतीने तिकीट सेवा सुरू आहे. त्यामुळे एसआरटीयूच्या दरकरारानुसार मायक्र ोफॅक्स या कंपनीच्या ईटीआयएम मशिन्सच्या माध्यमातून तिकीट सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी जानेवारी महिन्यात होणाऱ्या महासभेत आणण्याचे आदेशही त्यांनी दिले. बसगाड्यांचे वेळापत्रक, चालक, वाहक हे कोणत्या मार्गावरच्या बसमध्ये काम करीत आहेत, याची माहिती मिळण्यासाठी अद्ययावत संगणकप्रणाली विकसित करण्यासंबंधीही बैठकीत चर्चा करण्यात आली. बेस्टमध्ये विलीन करा : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात बसची संख्या अपुरी असल्यामुळे अतिरिक्त फेऱ्या वाढविणे शक्य नसल्याचे पत्र महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांना परिवहन प्रशासनाने पाठविले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी परिवहन प्रशासनाला पुन्हा एक पत्र पाठविले असून त्यामध्ये परिवहन सेवेचे बेस्टमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे. ठाणे शहरातील विविध मार्गांवर प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यासाठी परिवहन सक्षम नसेल तर परिवहन सेवेचे बेस्टमध्ये विलीनीकरण करा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.