शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

महापौरांची दुटप्पी भूमिका , शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:29 IST

शहरातील बेकायदा बांधकामांबाबत महापौर मीना आयलानी यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करा तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कब्रस्तानाच्या भूखंडावरील बांधकामांना महापौर पाठिशी घालत

उल्हासनगर : शहरातील बेकायदा बांधकामांबाबत महापौर मीना आयलानी यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करा तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कब्रस्तानाच्या भूखंडावरील बांधकामांना महापौर पाठिशी घालत असल्याची टीका सेनेने केली. आयुक्तांनी मात्र बेकायदा बांधकामांबाबत तलवार म्यान केल्याने त्यांच्यावर खापर फोडले जात आहे.उल्हासनगरमध्ये बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला असून याप्रकरणी महापौर आयलानी यांना जबाबदार धरण्यात आले. अखेर महापौरांनी २९ सप्टेंबरला आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना निवेदन देत बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली. अशा बांधकामांमुळे पालिकेसह शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचे निवेदनात महापौरांनी म्हटले. तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कैलास कॉलनी येथील कब्रस्तानाच्या आरक्षित भूखंडावरील दुकानदारांना पाठिशी घालत आहे, अशी दुटप्पी भूमिका महापौर घेत असल्याचा आरोप शिवसेनेसह इतर पक्षांनी व सामाजिक संघटनांनी केला आहे.कब्रस्तानाच्या आरक्षित भूखंडावरील दुकानदारांकडे मालमत्ता कर पावती असली तरी मालकी हक्काचे पुरावे नाहीत, अशी माहिती प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली. आयुक्तांच्या आदेशानुसार एक महिन्यापूर्वीच दुकानदारांना भूखंड रिकामा करण्याच्या नोटीसा दिल्याचे सांगितले.मात्र पुढील आयुक्तांचे आदेश न आल्याने दुकानांवरील कारवाई लांबल्याची कबूली शिंपी यांनी दिली. नोटीसमुळे घाबरलेल्या दुकानदारांनी महापौरांकडे धाव घेतली. महापौरांनी कोणताही विचार न करता २६ सप्टेंबरला आयुक्तांना पत्र पाठवून कारवाईपूर्वी कागदपत्र तपासण्याचे सांगून बेकायदा दुकानदारांना अप्रत्यक्ष पाठिशी घातले आहे.महापालिका क्षेत्रात आयुक्तांच्या दुर्लक्षतेमुळे नव्याने बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. गेल्या महिन्यात पोलीस संरक्षात पाडण्यात आलेली बांधकामे कुणाच्या आशीर्वादाने उभी राहिली? असा प्रश्न शिवसेनेने केला आहे. आयुक्त निंबाळकर यांच्यासह उपायुक्त संतोष देहरकर, प्रभाग अधिकारी यांना महासभेत याबाबतचे उत्तर द्यावे लागणार आहे. तसा प्रश्न महासभेत करणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.आयुक्तांनी राजकीय दडपण झुगारून बेकायदा बांधकामांवर कारवाई करून शहर विकास कामाला गती देण्याचे काम करावे, असे मतही चौधरी यांनी व्यक्त केले. यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.