शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

महापौरांची दुटप्पी भूमिका , शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:29 IST

शहरातील बेकायदा बांधकामांबाबत महापौर मीना आयलानी यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करा तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कब्रस्तानाच्या भूखंडावरील बांधकामांना महापौर पाठिशी घालत

उल्हासनगर : शहरातील बेकायदा बांधकामांबाबत महापौर मीना आयलानी यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करा तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कब्रस्तानाच्या भूखंडावरील बांधकामांना महापौर पाठिशी घालत असल्याची टीका सेनेने केली. आयुक्तांनी मात्र बेकायदा बांधकामांबाबत तलवार म्यान केल्याने त्यांच्यावर खापर फोडले जात आहे.उल्हासनगरमध्ये बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला असून याप्रकरणी महापौर आयलानी यांना जबाबदार धरण्यात आले. अखेर महापौरांनी २९ सप्टेंबरला आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना निवेदन देत बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली. अशा बांधकामांमुळे पालिकेसह शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचे निवेदनात महापौरांनी म्हटले. तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कैलास कॉलनी येथील कब्रस्तानाच्या आरक्षित भूखंडावरील दुकानदारांना पाठिशी घालत आहे, अशी दुटप्पी भूमिका महापौर घेत असल्याचा आरोप शिवसेनेसह इतर पक्षांनी व सामाजिक संघटनांनी केला आहे.कब्रस्तानाच्या आरक्षित भूखंडावरील दुकानदारांकडे मालमत्ता कर पावती असली तरी मालकी हक्काचे पुरावे नाहीत, अशी माहिती प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली. आयुक्तांच्या आदेशानुसार एक महिन्यापूर्वीच दुकानदारांना भूखंड रिकामा करण्याच्या नोटीसा दिल्याचे सांगितले.मात्र पुढील आयुक्तांचे आदेश न आल्याने दुकानांवरील कारवाई लांबल्याची कबूली शिंपी यांनी दिली. नोटीसमुळे घाबरलेल्या दुकानदारांनी महापौरांकडे धाव घेतली. महापौरांनी कोणताही विचार न करता २६ सप्टेंबरला आयुक्तांना पत्र पाठवून कारवाईपूर्वी कागदपत्र तपासण्याचे सांगून बेकायदा दुकानदारांना अप्रत्यक्ष पाठिशी घातले आहे.महापालिका क्षेत्रात आयुक्तांच्या दुर्लक्षतेमुळे नव्याने बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. गेल्या महिन्यात पोलीस संरक्षात पाडण्यात आलेली बांधकामे कुणाच्या आशीर्वादाने उभी राहिली? असा प्रश्न शिवसेनेने केला आहे. आयुक्त निंबाळकर यांच्यासह उपायुक्त संतोष देहरकर, प्रभाग अधिकारी यांना महासभेत याबाबतचे उत्तर द्यावे लागणार आहे. तसा प्रश्न महासभेत करणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.आयुक्तांनी राजकीय दडपण झुगारून बेकायदा बांधकामांवर कारवाई करून शहर विकास कामाला गती देण्याचे काम करावे, असे मतही चौधरी यांनी व्यक्त केले. यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.