शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

महापौरांची दुटप्पी भूमिका , शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:29 IST

शहरातील बेकायदा बांधकामांबाबत महापौर मीना आयलानी यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करा तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कब्रस्तानाच्या भूखंडावरील बांधकामांना महापौर पाठिशी घालत

उल्हासनगर : शहरातील बेकायदा बांधकामांबाबत महापौर मीना आयलानी यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करा तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कब्रस्तानाच्या भूखंडावरील बांधकामांना महापौर पाठिशी घालत असल्याची टीका सेनेने केली. आयुक्तांनी मात्र बेकायदा बांधकामांबाबत तलवार म्यान केल्याने त्यांच्यावर खापर फोडले जात आहे.उल्हासनगरमध्ये बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला असून याप्रकरणी महापौर आयलानी यांना जबाबदार धरण्यात आले. अखेर महापौरांनी २९ सप्टेंबरला आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना निवेदन देत बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली. अशा बांधकामांमुळे पालिकेसह शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचे निवेदनात महापौरांनी म्हटले. तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कैलास कॉलनी येथील कब्रस्तानाच्या आरक्षित भूखंडावरील दुकानदारांना पाठिशी घालत आहे, अशी दुटप्पी भूमिका महापौर घेत असल्याचा आरोप शिवसेनेसह इतर पक्षांनी व सामाजिक संघटनांनी केला आहे.कब्रस्तानाच्या आरक्षित भूखंडावरील दुकानदारांकडे मालमत्ता कर पावती असली तरी मालकी हक्काचे पुरावे नाहीत, अशी माहिती प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली. आयुक्तांच्या आदेशानुसार एक महिन्यापूर्वीच दुकानदारांना भूखंड रिकामा करण्याच्या नोटीसा दिल्याचे सांगितले.मात्र पुढील आयुक्तांचे आदेश न आल्याने दुकानांवरील कारवाई लांबल्याची कबूली शिंपी यांनी दिली. नोटीसमुळे घाबरलेल्या दुकानदारांनी महापौरांकडे धाव घेतली. महापौरांनी कोणताही विचार न करता २६ सप्टेंबरला आयुक्तांना पत्र पाठवून कारवाईपूर्वी कागदपत्र तपासण्याचे सांगून बेकायदा दुकानदारांना अप्रत्यक्ष पाठिशी घातले आहे.महापालिका क्षेत्रात आयुक्तांच्या दुर्लक्षतेमुळे नव्याने बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. गेल्या महिन्यात पोलीस संरक्षात पाडण्यात आलेली बांधकामे कुणाच्या आशीर्वादाने उभी राहिली? असा प्रश्न शिवसेनेने केला आहे. आयुक्त निंबाळकर यांच्यासह उपायुक्त संतोष देहरकर, प्रभाग अधिकारी यांना महासभेत याबाबतचे उत्तर द्यावे लागणार आहे. तसा प्रश्न महासभेत करणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.आयुक्तांनी राजकीय दडपण झुगारून बेकायदा बांधकामांवर कारवाई करून शहर विकास कामाला गती देण्याचे काम करावे, असे मतही चौधरी यांनी व्यक्त केले. यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.