शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ठामपा आरक्षकांच्या भरतीवर महापौर नाराज

By admin | Updated: May 31, 2017 05:46 IST

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील आरक्षकांच्या भरतीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आक्षेप घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील आरक्षकांच्या भरतीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आक्षेप घेतला आहे. महापालिका आस्थापनेवर झालेल्या आरक्षकांच्या नियुक्तीमध्ये ठाणे शहरातील केवळ दोन जणांचा समावेश आहे. यामुळे ठाण्यात सुशिक्षित मुले नाहीत का, असा संतप्त सवाल महापौरांनी केला आहे. ठामपातील विविध पदांच्या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देणे आवश्यक असून ही प्रक्रियाच संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठामपाच्या आस्थापनेवर विविध पदांकरिता भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते. नुकतीच महापालिका आस्थापनेवर सुमारे ३२७ आरक्षकांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातून १८ जण त्यात असून शहरातील केवळ दोघांची नियुक्ती करून स्थानिकांना डावलल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. आरक्षक पदाच्या निवड यादीतील उमेदवारांची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे : सोलापूर (८), जळगाव (५०), अहमदनगर (३५), औरंगाबाद (१३), परभणी (१०), अकोला (२), नाशिक (२५), जालना (१५), नांदेड (२५), लातूर (९), पुणे (९), हिंगोली (७), ठाणे (१८), बीड (२३), रायगड (२), डोंबिवली (१), सिंधुदुर्ग (२), धुळे (७), सांगली (७), यवतमाळ (५), जिल्हा नमूद न केलेले उमेदवार (६), वाशीम (६), मुंबई (५) सातारा (२), नेरूळ (१), गोंदिया (१), नंदुरबार (११), बुलडाणा (९), रत्नागिरी (१), अमरावती (७), उस्मानाबाद (२), भंडारा (३) अशी एकूण ३२७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत अधिक बोलताना महापौर म्हणाल्या की, या नियुक्ती प्रक्रियेत कोणते निकष लावले, हे मला माहीत नाही. परंतु, ५० टक्के स्थानिक मुलांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. इतर मनपामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाते. परंतु, ही नियुक्ती पाहता बाहेरील राज्यांतील मुलांची संख्या अधिक आहे. या पदावर भरण्यात आलेल्या मुलांना नीट मराठी बोलता येत नाही. बाहेरील जिल्ह्यातील मनपामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाते, मग इथल्या महापालिकेत का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, त्यांनी या भरतीसाठी झालेल्या आॅनलाइन परीक्षेच्या फी वरदेखील हरकत घेतली आहे. इतर महापालिका १५० रुपये फी आकारत असताना ठाणे महापालिकेने ८५० रुपये फी का आकारली? भरती प्रक्रियेचे आॅनलाइन काम हे खाजगी संस्थेकडे का दिले? ठाणे महापालिकेत तितके सक्षम अधिकारी, कर्मचारी नाहीत का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहे. याबाबत, त्यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.