शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा आरक्षकांच्या भरतीवर महापौर नाराज

By admin | Updated: May 31, 2017 05:46 IST

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील आरक्षकांच्या भरतीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आक्षेप घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील आरक्षकांच्या भरतीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आक्षेप घेतला आहे. महापालिका आस्थापनेवर झालेल्या आरक्षकांच्या नियुक्तीमध्ये ठाणे शहरातील केवळ दोन जणांचा समावेश आहे. यामुळे ठाण्यात सुशिक्षित मुले नाहीत का, असा संतप्त सवाल महापौरांनी केला आहे. ठामपातील विविध पदांच्या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देणे आवश्यक असून ही प्रक्रियाच संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठामपाच्या आस्थापनेवर विविध पदांकरिता भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते. नुकतीच महापालिका आस्थापनेवर सुमारे ३२७ आरक्षकांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातून १८ जण त्यात असून शहरातील केवळ दोघांची नियुक्ती करून स्थानिकांना डावलल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. आरक्षक पदाच्या निवड यादीतील उमेदवारांची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे : सोलापूर (८), जळगाव (५०), अहमदनगर (३५), औरंगाबाद (१३), परभणी (१०), अकोला (२), नाशिक (२५), जालना (१५), नांदेड (२५), लातूर (९), पुणे (९), हिंगोली (७), ठाणे (१८), बीड (२३), रायगड (२), डोंबिवली (१), सिंधुदुर्ग (२), धुळे (७), सांगली (७), यवतमाळ (५), जिल्हा नमूद न केलेले उमेदवार (६), वाशीम (६), मुंबई (५) सातारा (२), नेरूळ (१), गोंदिया (१), नंदुरबार (११), बुलडाणा (९), रत्नागिरी (१), अमरावती (७), उस्मानाबाद (२), भंडारा (३) अशी एकूण ३२७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत अधिक बोलताना महापौर म्हणाल्या की, या नियुक्ती प्रक्रियेत कोणते निकष लावले, हे मला माहीत नाही. परंतु, ५० टक्के स्थानिक मुलांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. इतर मनपामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाते. परंतु, ही नियुक्ती पाहता बाहेरील राज्यांतील मुलांची संख्या अधिक आहे. या पदावर भरण्यात आलेल्या मुलांना नीट मराठी बोलता येत नाही. बाहेरील जिल्ह्यातील मनपामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाते, मग इथल्या महापालिकेत का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, त्यांनी या भरतीसाठी झालेल्या आॅनलाइन परीक्षेच्या फी वरदेखील हरकत घेतली आहे. इतर महापालिका १५० रुपये फी आकारत असताना ठाणे महापालिकेने ८५० रुपये फी का आकारली? भरती प्रक्रियेचे आॅनलाइन काम हे खाजगी संस्थेकडे का दिले? ठाणे महापालिकेत तितके सक्षम अधिकारी, कर्मचारी नाहीत का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहे. याबाबत, त्यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.