शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

ठामपा आरक्षकांच्या भरतीवर महापौर नाराज

By admin | Updated: May 31, 2017 05:46 IST

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील आरक्षकांच्या भरतीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आक्षेप घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील आरक्षकांच्या भरतीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आक्षेप घेतला आहे. महापालिका आस्थापनेवर झालेल्या आरक्षकांच्या नियुक्तीमध्ये ठाणे शहरातील केवळ दोन जणांचा समावेश आहे. यामुळे ठाण्यात सुशिक्षित मुले नाहीत का, असा संतप्त सवाल महापौरांनी केला आहे. ठामपातील विविध पदांच्या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देणे आवश्यक असून ही प्रक्रियाच संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठामपाच्या आस्थापनेवर विविध पदांकरिता भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते. नुकतीच महापालिका आस्थापनेवर सुमारे ३२७ आरक्षकांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातून १८ जण त्यात असून शहरातील केवळ दोघांची नियुक्ती करून स्थानिकांना डावलल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. आरक्षक पदाच्या निवड यादीतील उमेदवारांची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे : सोलापूर (८), जळगाव (५०), अहमदनगर (३५), औरंगाबाद (१३), परभणी (१०), अकोला (२), नाशिक (२५), जालना (१५), नांदेड (२५), लातूर (९), पुणे (९), हिंगोली (७), ठाणे (१८), बीड (२३), रायगड (२), डोंबिवली (१), सिंधुदुर्ग (२), धुळे (७), सांगली (७), यवतमाळ (५), जिल्हा नमूद न केलेले उमेदवार (६), वाशीम (६), मुंबई (५) सातारा (२), नेरूळ (१), गोंदिया (१), नंदुरबार (११), बुलडाणा (९), रत्नागिरी (१), अमरावती (७), उस्मानाबाद (२), भंडारा (३) अशी एकूण ३२७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत अधिक बोलताना महापौर म्हणाल्या की, या नियुक्ती प्रक्रियेत कोणते निकष लावले, हे मला माहीत नाही. परंतु, ५० टक्के स्थानिक मुलांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. इतर मनपामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाते. परंतु, ही नियुक्ती पाहता बाहेरील राज्यांतील मुलांची संख्या अधिक आहे. या पदावर भरण्यात आलेल्या मुलांना नीट मराठी बोलता येत नाही. बाहेरील जिल्ह्यातील मनपामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाते, मग इथल्या महापालिकेत का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, त्यांनी या भरतीसाठी झालेल्या आॅनलाइन परीक्षेच्या फी वरदेखील हरकत घेतली आहे. इतर महापालिका १५० रुपये फी आकारत असताना ठाणे महापालिकेने ८५० रुपये फी का आकारली? भरती प्रक्रियेचे आॅनलाइन काम हे खाजगी संस्थेकडे का दिले? ठाणे महापालिकेत तितके सक्षम अधिकारी, कर्मचारी नाहीत का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहे. याबाबत, त्यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.