शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

भिवंडीत साहित्य गेले चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : शहरात दुसऱ्या कोरोना लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना सुसज्य आरोग्य यंत्रणा उभी करण्यात भिवंडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : शहरात दुसऱ्या कोरोना लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना सुसज्य आरोग्य यंत्रणा उभी करण्यात भिवंडी मनपा प्रशासनास आजही अपयश आल्याने शहरातील गरीब रुग्णांनाही खासगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याची वेळ आली आहे. पालिकेने गेल्यावर्षी पहिल्या कोरोना लाटेत कोट्यवधींचा खर्च करून उभारलेली आरोग्य यंत्रणा आजही कार्यान्वित न केल्याने ही यंत्रणा धूळ खात पडून आहे, तर साहित्यही चोरीला गेल्याच्या तक्रारी नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केल्या आहेत. दुसऱ्या लाटेत फक्त खुदाबक्ष हॉल व वऱ्हाळादेवी हॉल येथील केंद्रे सुरू केली आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाही मनपाकडे आज फक्त खुदाबक्ष हॉल व वऱ्हाळादेवी हॉल ही दोनच कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. यापैकी खुदाबक्ष हॉल येथे १३४ बेडचे, तर वऱ्हाळादेवी हॉल येथे १०० बेडचे अशी २३४ बेडची कोविड सेंटर मनपाने उभारली आहेत. भिवंडीत लोकसंख्या पाहता मनपाने केवळ २३४ बेडची दोनच कोविड सेंटर सुरू ठेवल्याने नागरिकांकडून मनपा प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. भिवंडीत मागच्या लाटेत सुरुवातीला मृत्यूचे प्रमाण वाढले होते. मागील मे, जूनमध्ये मृत्युदरही १२ टक्के एवढा होता. रुग्णसंख्या व मृत्युदरात वाढ झाल्याने मागील वर्षी शहरात इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयीसुविधांसह कोविड रुग्णालय सुरू केले होते. त्याचबरोबर शहरात खुदाबक्ष हाॅल, टाटा आमंत्रण, रईस हायस्कूल व वऱ्हाळदेवी हाॅल, ओसवाल हॉल येथेही सुसज्य कोविड सेंटर सुरू केले होते. या सेंटरच्या उभारणीसाठी त्यावेळी कोट्यवधींचा खर्च मनपा प्रशासनाने केला होता. मात्र, त्याचा फायदा झाल्याने त्यावेळी शहरातील मृत्युदर अवघ्या तीन टक्क्यांपर्यंत खाली आला होता.

गेल्यावर्षी सुरू केलेली ही यंत्रणा या वर्षी मनपा प्रशासनाने आजही राबविलेली दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असतानाही गेल्या वर्षात सुरू केलेल्या कोविड सेंटरमधील साहित्य धूळ खात पडून आहे, तर अनेक साहित्य चोरी व गायब झाले आहे. एकीकडे ऑक्सिजनविना आज अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत असताना आयजीएम रुग्णालयाबाहेर कोट्यवधी रुपयांचे ऑक्सिजन टँक फक्त काय शोभेसाठी लावले आहेत का, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत. आयजीएम रुग्णालयात ४५ व्हेंटिलेटर व टेली आयसीयूसारख्या अत्याधुनिक सुविधा असताना त्या यंत्रणा धूळ खात आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत पालिकेने टाटा आमंत्रण येथील विलगीकरणसह भिवंडी शहरात खुदाबक्ष हॉल, रईस हायस्कूल ,वऱ्हाळदेवी हॉल असे मिळून तब्बल एक हजार बेड रुग्णांसाठी उपलब्ध ठेवले होते .

-------------------------------------

पुरेसे बेड असल्याचा दावा

खासगी रुग्णालयांमध्ये सध्या बेड व ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने रुग्णांची उपचाराविना तडफड होत आहे. भिवंडीत ८२० रुग्णसंख्या असतानाही मनपाचे २३४ बेडचे फक्त दोन कोविड सेंटर शहरात अस्तित्वात आहेत. मात्र, एवढे सर्व असतानाही मनपा प्रशासनाकडे पुरेसे बेड उपलब्ध असल्याचा दावा मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडून केला जात आहे. रुग्णसंख्या वाढली तर गेल्यावर्षी सुरू केलेले कोविड सेंटर मनपा पुन्हा सुरू करेल, अशी ग्वाहीही आयुक्तांनी दिली आहे.