शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नाराजांच्या डब्यांना मनसेचे इंजिन

By admin | Updated: May 1, 2017 06:11 IST

भिवंडी पालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राजकीय व्यूहरचना आखायला सुरूवात झाली आहे.

रोहिदास पाटील / अनगावभिवंडी पालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राजकीय व्यूहरचना आखायला सुरूवात झाली आहे. मनसेकडून मागील पाच दिवसात ५० जणांनी अर्ज नेले आहेत. अन्य पक्षातील अनेक इच्छुकांनी संपर्क साधला आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यास मनसे उमेदवारी देईल. यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसे अन्य पक्षांना धक्का देईल असा दावा जिल्हाध्यक्ष मदन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. जिथे मनसेचा उमेदवार नसेल तेथे मनसे अपक्षाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीत मनसे कुणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. रविवारी झालेल्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. काहींच्या मुलाखती घेतल्या आहेत. पक्ष कार्यालयात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. भाजपा, शिवसेना समाजवादी, काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी संपर्क साधला आहे. त्यांना सहा मे रोजी उमेदवारी जाहीर करून धक्का देणार असल्याची माहिती शहरअध्यक्ष प्रदीप बोडके व अफसर खान यांनी दिली. मनसेने ५० अर्जांचे वाटप केले आहे. मनसेची ताकद शहरात आहे. निवडणूक प्रचाराकरिता मनसेचे नेते बाळ नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्या सभा होणार असल्याची माहिती शहरसचिव शैलेश करले यांनी दिली. सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार हाच मुद्दा रविवारपासून प्रभागानुसार बैठकांवर भर देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव यांनी दिली. सत्ताधाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार हा प्रचाराचा प्रमुख मुद्द असेल असे त्यांनी सांगितले. रस्ते, पाणी, गटारे, करमूल्यांकनामध्ये लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या संगनमताने सावळागोंधळ झाला आहे. या सर्वांची माहिती मतदारांना देण्यात येणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.आघाडीसाठी स्थानिकांची नकारघंटा  पंकज रोडेकर / ठाणेभिवंडी महापालिकेत सध्या एक नंबरचा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी अशी आघाडी व्हावी अशी इच्छा आहे. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आघाडीबाबत नकारघंटा सुरू केली आहे. आघाडी न केल्यास काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भिवंडी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी करून त्यामधून उमेदवार निवड प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. याचदरम्यान, भिवंडीत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे अपयश लक्षात घेता काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून आगामी निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत सूतोवाच केले आहे. फायदा पाहून निर्णयस्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आघाडी करण्यास नकार असल्याने भिवंडीत आघाडी होणार की नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. एखाद्या पक्षाच्या आघाडीबाबत प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करून तो किती फायद्याचा आहे हे पाहून निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात येत आहे.