शहरं
Join us  
Trending Stories
1
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
4
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
5
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
6
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
8
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
9
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
10
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
11
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
12
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
13
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
14
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
15
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
16
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
17
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
18
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
19
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
20
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?

नाराजांच्या डब्यांना मनसेचे इंजिन

By admin | Updated: May 1, 2017 06:11 IST

भिवंडी पालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राजकीय व्यूहरचना आखायला सुरूवात झाली आहे.

रोहिदास पाटील / अनगावभिवंडी पालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राजकीय व्यूहरचना आखायला सुरूवात झाली आहे. मनसेकडून मागील पाच दिवसात ५० जणांनी अर्ज नेले आहेत. अन्य पक्षातील अनेक इच्छुकांनी संपर्क साधला आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यास मनसे उमेदवारी देईल. यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसे अन्य पक्षांना धक्का देईल असा दावा जिल्हाध्यक्ष मदन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. जिथे मनसेचा उमेदवार नसेल तेथे मनसे अपक्षाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीत मनसे कुणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. रविवारी झालेल्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. काहींच्या मुलाखती घेतल्या आहेत. पक्ष कार्यालयात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. भाजपा, शिवसेना समाजवादी, काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी संपर्क साधला आहे. त्यांना सहा मे रोजी उमेदवारी जाहीर करून धक्का देणार असल्याची माहिती शहरअध्यक्ष प्रदीप बोडके व अफसर खान यांनी दिली. मनसेने ५० अर्जांचे वाटप केले आहे. मनसेची ताकद शहरात आहे. निवडणूक प्रचाराकरिता मनसेचे नेते बाळ नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्या सभा होणार असल्याची माहिती शहरसचिव शैलेश करले यांनी दिली. सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार हाच मुद्दा रविवारपासून प्रभागानुसार बैठकांवर भर देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव यांनी दिली. सत्ताधाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार हा प्रचाराचा प्रमुख मुद्द असेल असे त्यांनी सांगितले. रस्ते, पाणी, गटारे, करमूल्यांकनामध्ये लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या संगनमताने सावळागोंधळ झाला आहे. या सर्वांची माहिती मतदारांना देण्यात येणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.आघाडीसाठी स्थानिकांची नकारघंटा  पंकज रोडेकर / ठाणेभिवंडी महापालिकेत सध्या एक नंबरचा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी अशी आघाडी व्हावी अशी इच्छा आहे. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आघाडीबाबत नकारघंटा सुरू केली आहे. आघाडी न केल्यास काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भिवंडी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी करून त्यामधून उमेदवार निवड प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. याचदरम्यान, भिवंडीत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे अपयश लक्षात घेता काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून आगामी निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत सूतोवाच केले आहे. फायदा पाहून निर्णयस्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आघाडी करण्यास नकार असल्याने भिवंडीत आघाडी होणार की नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. एखाद्या पक्षाच्या आघाडीबाबत प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करून तो किती फायद्याचा आहे हे पाहून निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात येत आहे.