शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाराजांच्या डब्यांना मनसेचे इंजिन

By admin | Updated: May 1, 2017 06:11 IST

भिवंडी पालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राजकीय व्यूहरचना आखायला सुरूवात झाली आहे.

रोहिदास पाटील / अनगावभिवंडी पालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राजकीय व्यूहरचना आखायला सुरूवात झाली आहे. मनसेकडून मागील पाच दिवसात ५० जणांनी अर्ज नेले आहेत. अन्य पक्षातील अनेक इच्छुकांनी संपर्क साधला आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यास मनसे उमेदवारी देईल. यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसे अन्य पक्षांना धक्का देईल असा दावा जिल्हाध्यक्ष मदन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. जिथे मनसेचा उमेदवार नसेल तेथे मनसे अपक्षाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीत मनसे कुणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. रविवारी झालेल्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. काहींच्या मुलाखती घेतल्या आहेत. पक्ष कार्यालयात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. भाजपा, शिवसेना समाजवादी, काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी संपर्क साधला आहे. त्यांना सहा मे रोजी उमेदवारी जाहीर करून धक्का देणार असल्याची माहिती शहरअध्यक्ष प्रदीप बोडके व अफसर खान यांनी दिली. मनसेने ५० अर्जांचे वाटप केले आहे. मनसेची ताकद शहरात आहे. निवडणूक प्रचाराकरिता मनसेचे नेते बाळ नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्या सभा होणार असल्याची माहिती शहरसचिव शैलेश करले यांनी दिली. सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार हाच मुद्दा रविवारपासून प्रभागानुसार बैठकांवर भर देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव यांनी दिली. सत्ताधाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार हा प्रचाराचा प्रमुख मुद्द असेल असे त्यांनी सांगितले. रस्ते, पाणी, गटारे, करमूल्यांकनामध्ये लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या संगनमताने सावळागोंधळ झाला आहे. या सर्वांची माहिती मतदारांना देण्यात येणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.आघाडीसाठी स्थानिकांची नकारघंटा  पंकज रोडेकर / ठाणेभिवंडी महापालिकेत सध्या एक नंबरचा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी अशी आघाडी व्हावी अशी इच्छा आहे. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आघाडीबाबत नकारघंटा सुरू केली आहे. आघाडी न केल्यास काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भिवंडी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी करून त्यामधून उमेदवार निवड प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. याचदरम्यान, भिवंडीत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे अपयश लक्षात घेता काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून आगामी निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत सूतोवाच केले आहे. फायदा पाहून निर्णयस्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आघाडी करण्यास नकार असल्याने भिवंडीत आघाडी होणार की नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. एखाद्या पक्षाच्या आघाडीबाबत प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करून तो किती फायद्याचा आहे हे पाहून निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात येत आहे.