शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

तहसीलवर मार्क्सवाद्यांचा मोर्चा

By admin | Updated: December 21, 2015 01:10 IST

विक्रमगड तालुक्यातील आदिवासींच्या विकासाचा समतोल ढासळलेला असून शासनाच्या उदासिन धोरणामुळे आदिवासी पाणी, वीज, रोजगार, निवारा, शिक्षण

तलवाडा: विक्रमगड तालुक्यातील आदिवासींच्या विकासाचा समतोल ढासळलेला असून शासनाच्या उदासिन धोरणामुळे आदिवासी पाणी, वीज, रोजगार, निवारा, शिक्षण, रस्ते, जमीन या मुलभूत सुविधा प्राप्त करून द्याव्यात या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयावर कॉ़ गोदावरी शामराव परुळेकर मार्क्सवादी विचारमंचच्या तालुका कमिटीतर्फे मोर्चा नेण्यात आला. या तालुक्याच्या निर्मितीस आज १६ वर्षाचा काळ लोटलेला आहे़ तरीही आदिवासी गाव पाडयातील नागरीक विविध सुविधांपासुन वंचित आहेत़ येथील आदिवासीं वनवासींना ते कसित असलेले वनपट्टे मिळावेत म्हणून वनदावे दाखल करुनही त्याना न्याय मिळत नसल्याने त्यांचेकडून संताप व्यक्त केला जात आहे़ ज्यांना जमीन मिळाली ती तुटपुंजी आहे़ त्यामुळे कुटुंबाच्या आवश्यकतेनुसार जमीन नांवे झाली पाहीजे़ रोजगारासाठी स्थानिक प्रशासनाकडून आतापासूनच कामांचा आराखडा तयार करुन त्वरीत कामे सुरु झाली पाहिजेत. प्रत्येकाच्या कुटुंबाला विभक्त व पिवळे रेशनकार्ड दिले गेले पाहिजे. आरोग्य विभागातील रिक्त पदेभरुन त्यांना ग्रामीण रुग्णालयासह इतर आरोग्य केंंद्रांत योग्य सुविधा पुरविल्या जाव्यात, एमआयडीसी सुरु करावी आदी विविध १४ मागण्यांचा समावेश असलेल निवेदन या वेळी देण्यात आले. मोर्चामध्ये कॉ़ परशुराम चव्हाण, कॉ. सजोत राउत, कॉ़ बळीराम चौधरी, कॉ़ राजेंद्र परांजपे, कॉ़ हरीभाउ वरठा आदिनी मार्गदर्शन केले़ तर यामार्चामध्ये असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़