शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

श्रमजीवी संघटनेचा शहापूर तहसील कार्यालयावर माेर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:44 IST

भातसानगर : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आदिवासी समाजाला मूलभूत अधिकार मिळत नसल्याच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने साेमवारी शहापूर तहसील कार्यालयावर मोर्चा ...

भातसानगर : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आदिवासी समाजाला मूलभूत अधिकार मिळत नसल्याच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने साेमवारी शहापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र, या देशातील गरीब आदिवासींना अजून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नसल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे.

अनेक सुविधांपासून व मूलभूत हक्कांपासून आदिवासी वंचित आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे श्रमजीवींनी सांगितले. संघटनेने १ ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक ठिकाणी जाऊन गरीब कातकरी आदिम जमातीत कुटुंबांचा सर्व्हे केला असता अनेक कुटुंबांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, घरकुल जॉब कार्ड, मतदान ओळखपत्र, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा आजपर्यंत पोहोचल्या नाहीत. रोजगार नसल्यामुळे त्यांना पोटभर अन्न मिळत नाही, त्यांना किमान मूलभूत सुविधा देणे हे सरकार व प्रशासनाचे कर्तव्य आहे. हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा अधिकार मिळाला नाही तर येत्या काळात अहिंसेच्या मार्गाने आंदोलन, मोर्चे उपोषण करून तो मिळवून घेण्याचे काम श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी ठाणे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष राजेंद्र महस्कर, प्रकाश खोडक व शेकडो मोर्चेकरी उपस्थित होते.

या आहेत प्रलंबित मागण्या

आदिम जमातीच्या प्रत्येक कुटुंब व इतर आदिवासींमधील विधवा अपंग यांना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना याचा लाभ देण्यात यावा. प्रत्येक आदिवासी कुटुंबाचा सर्व्हे करून आधार कार्ड जातीच्या दाखल्यासाठी शोधमोहीम घेऊन प्रत्येक गावात घेऊन जातीचे दाखले आधार कार्ड देण्यात यावेत. आदिवासी विशेषतः आदिम जमातीच्या कुटुंबांना शासनाच्या सुविधा देण्यात याव्यात.