शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात कबरस्थानच्या विरोधात मोर्चा; शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले निवेदन

By सदानंद नाईक | Updated: November 29, 2022 16:50 IST

दरम्यान महापालिकेने कबरस्थान भूखंडा भोवती संरक्षण भिंतीचे काम सुरू केले.

उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील कबरस्थानच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनेने कैलास कॉलनी ते महापालिका दरम्यान मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन देऊन कबरस्थान रद्द करण्याची मागणी केली.

 उल्हासनगर पूर्वेला कबरस्थान नसल्याने, शहरातील मुस्लिम बांधवाना दफन विधीसाठी कल्याण व अंबरनाथ येथे जावे लागत होते. मात्र तेथील स्थानिक नागरिकांकडून दफनविधीला विरोध करीत असल्याने, शहरातील मुस्लिम बांधवांची कुचंबणा होत होती. कबरस्थानसाठी लढा दिल्यावर, सुरवातीला महापालिकेने कॅम्प नं-१ येथील उल्हास नदी शेजारी आयडीआय कंपनी जवळील भूखंड कबरस्थानसाठी दिला. यामध्ये काहीजण न्यायालयात गेलेतरी कबरस्थान सुरू आहे. त्यानंतर कॅम्प नं-५ येथील कैलास कॉलनी मध्ये कबरस्थानची मागणी मुस्लिम संघटनेने लावून धरल्यावर, त्याठिकाणीही कबरस्थान साठी भूखंड देण्यात आला.

दरम्यान महापालिकेने कबरस्थान भूखंडा भोवती संरक्षण भिंतीचे काम सुरू केले. या कबरस्थान पासून काही मीटर अंतरावर अंबरनाथचे जुने प्रसिद्ध शिवमंदिर आहे. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात कबरस्थान नको. दुसरीकडे द्या, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनेने घेतली. यामध्ये बजरंग दल सारख्या संघटनेचा समावेश आहे. सोमवारी काही संघटनेच्या नेत्यांनी आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन कबरस्थान बाबत चर्चा केली. तसेच आयुक्तांनी कबरस्थानच्या संरक्षण भिंतीचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले.

शासनाने कबरस्थान बाबत अहवाल मागितला असून तो पाठविल्याची माहिती आयुक्त अजीज शेख व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. मंगळवारी विविध हिंदुत्ववादी संघटना, स्थानिक नागरिकांनी कैलास कॉलनी शिवमंदिर ते महापालिका मुख्यालय असा भव्य मोर्चा काढला. साधू संतासह नागरिकांनी मोर्चात सहभाग घेऊन कबरस्थानला भूसखंड देण्याला विरोध केला. महापालिकेने शासनाने मागितल्या प्रमाणे कबरस्थान बाबत अहवाल पाठविला असून शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे डोळे लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर