शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कामोठेजवळील रखडलेल्या मार्गाला ३१ मार्चची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:35 IST

मागील पाच वर्षांपासून सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे शहरालगत रखडलेली मार्गिका ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन या ठिकाणच्या रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी ६ फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.

पनवेल : मागील पाच वर्षांपासून सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे शहरालगत रखडलेली मार्गिका ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन या ठिकाणच्या रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी ६ फेब्रुवारीलामुंबईत झालेल्या बैठकीत दिले.भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, शेकाप आमदार बाळाराम पाटील यांच्या शिष्टमंडळाने जोशी यांच्या घेतलेल्या वेगवेगळ्या भेटीदरम्यान कामोठ्यातील चार मीटरच्या रखडलेल्या रस्त्यासंदर्भात जोशी यांनी, सात दिवसांत निविदा काढली जाईल. त्यानंतर १ मार्चपर्यंत वर्क आॅर्डर काढून ३१ मार्चपर्यंत हा रस्ता कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कामोठे शहराजवळ रखडलेल्या मार्गिकेमुळे अनेक अपघात झाले आहेत. चार वर्षांच्या कालावधीत २८ जणांना आपले प्राण अपघातात गमवावे लागले आहेत. या रखडलेल्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी आजवर सह्यांची मोहीम, निदर्शने, मोर्चे काढण्यात आले. ३ फेब्रुवारी रोजीदेखील कामोठ्यातील रहिवाशांनी सायन-पनवेल महामार्ग रोखून धरला होता.राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत कार्य व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील मल्हार महोत्सवाला आले असता, आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठेतून मुंबईकडे जाणाºया रखडलेल्या मार्गाची व्यथा त्यांच्याकडे मांडली.रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांच्यासोबत घेतलेल्या वेगवेगळ्या बैठकीत भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, शेकाप आमदार बाळाराम पाटील, आमदार पंडित पाटील, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, आरपीआय जिल्हाअध्यक्ष जगदीश गायकवाड, कफ संस्थेचे अध्यक्ष अरु ण भिसे, भाजपा ओबीसी सेलचे रायगड जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, नगरसेवक प्रमोद भगत आदी उपस्थित होते.>मृत्यूच्या सापळ्यातून सुटकासायन-पनवेल महामार्गाच्या रुं दीकरणाच्या कामामुळे कामोठे शहरातून मुंबईकडे जाणाºया रस्त्याच्या दिशेने थेट जोडणी अस्तित्वात नसल्यामुळे कामोठे शहरातून येणाºया वाहनांना कळंबोली सर्कलपर्यंत जाऊन यू-टर्न घेऊन पुन्हा मुंबईकडे जावे लागत असल्यामुळे वेळ व लाखो लिटर इंधन वाया जात असून, दररोज होणाºया वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या अडचणींमुळे अपघात झाले आहेत. चार वर्षांत २८ जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तसेच नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रस्त्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास मृत्यूच्या सापळ्यातून आमची सुटका होईल, अशी भावना या ठिकाणी ये-जा करणारे नागरिक व वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Mumbaiमुंबई