शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
7
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
8
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
9
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
10
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
11
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
12
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
13
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
14
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
15
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
16
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
17
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
19
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
20
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

कामोठेजवळील रखडलेल्या मार्गाला ३१ मार्चची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:35 IST

मागील पाच वर्षांपासून सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे शहरालगत रखडलेली मार्गिका ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन या ठिकाणच्या रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी ६ फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.

पनवेल : मागील पाच वर्षांपासून सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे शहरालगत रखडलेली मार्गिका ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन या ठिकाणच्या रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी ६ फेब्रुवारीलामुंबईत झालेल्या बैठकीत दिले.भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, शेकाप आमदार बाळाराम पाटील यांच्या शिष्टमंडळाने जोशी यांच्या घेतलेल्या वेगवेगळ्या भेटीदरम्यान कामोठ्यातील चार मीटरच्या रखडलेल्या रस्त्यासंदर्भात जोशी यांनी, सात दिवसांत निविदा काढली जाईल. त्यानंतर १ मार्चपर्यंत वर्क आॅर्डर काढून ३१ मार्चपर्यंत हा रस्ता कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कामोठे शहराजवळ रखडलेल्या मार्गिकेमुळे अनेक अपघात झाले आहेत. चार वर्षांच्या कालावधीत २८ जणांना आपले प्राण अपघातात गमवावे लागले आहेत. या रखडलेल्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी आजवर सह्यांची मोहीम, निदर्शने, मोर्चे काढण्यात आले. ३ फेब्रुवारी रोजीदेखील कामोठ्यातील रहिवाशांनी सायन-पनवेल महामार्ग रोखून धरला होता.राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत कार्य व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील मल्हार महोत्सवाला आले असता, आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठेतून मुंबईकडे जाणाºया रखडलेल्या मार्गाची व्यथा त्यांच्याकडे मांडली.रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांच्यासोबत घेतलेल्या वेगवेगळ्या बैठकीत भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, शेकाप आमदार बाळाराम पाटील, आमदार पंडित पाटील, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, आरपीआय जिल्हाअध्यक्ष जगदीश गायकवाड, कफ संस्थेचे अध्यक्ष अरु ण भिसे, भाजपा ओबीसी सेलचे रायगड जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, नगरसेवक प्रमोद भगत आदी उपस्थित होते.>मृत्यूच्या सापळ्यातून सुटकासायन-पनवेल महामार्गाच्या रुं दीकरणाच्या कामामुळे कामोठे शहरातून मुंबईकडे जाणाºया रस्त्याच्या दिशेने थेट जोडणी अस्तित्वात नसल्यामुळे कामोठे शहरातून येणाºया वाहनांना कळंबोली सर्कलपर्यंत जाऊन यू-टर्न घेऊन पुन्हा मुंबईकडे जावे लागत असल्यामुळे वेळ व लाखो लिटर इंधन वाया जात असून, दररोज होणाºया वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या अडचणींमुळे अपघात झाले आहेत. चार वर्षांत २८ जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तसेच नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रस्त्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास मृत्यूच्या सापळ्यातून आमची सुटका होईल, अशी भावना या ठिकाणी ये-जा करणारे नागरिक व वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Mumbaiमुंबई