शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कामोठेजवळील रखडलेल्या मार्गाला ३१ मार्चची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:35 IST

मागील पाच वर्षांपासून सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे शहरालगत रखडलेली मार्गिका ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन या ठिकाणच्या रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी ६ फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.

पनवेल : मागील पाच वर्षांपासून सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे शहरालगत रखडलेली मार्गिका ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन या ठिकाणच्या रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी ६ फेब्रुवारीलामुंबईत झालेल्या बैठकीत दिले.भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, शेकाप आमदार बाळाराम पाटील यांच्या शिष्टमंडळाने जोशी यांच्या घेतलेल्या वेगवेगळ्या भेटीदरम्यान कामोठ्यातील चार मीटरच्या रखडलेल्या रस्त्यासंदर्भात जोशी यांनी, सात दिवसांत निविदा काढली जाईल. त्यानंतर १ मार्चपर्यंत वर्क आॅर्डर काढून ३१ मार्चपर्यंत हा रस्ता कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कामोठे शहराजवळ रखडलेल्या मार्गिकेमुळे अनेक अपघात झाले आहेत. चार वर्षांच्या कालावधीत २८ जणांना आपले प्राण अपघातात गमवावे लागले आहेत. या रखडलेल्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी आजवर सह्यांची मोहीम, निदर्शने, मोर्चे काढण्यात आले. ३ फेब्रुवारी रोजीदेखील कामोठ्यातील रहिवाशांनी सायन-पनवेल महामार्ग रोखून धरला होता.राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत कार्य व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील मल्हार महोत्सवाला आले असता, आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठेतून मुंबईकडे जाणाºया रखडलेल्या मार्गाची व्यथा त्यांच्याकडे मांडली.रस्ते (बांधकाम) विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांच्यासोबत घेतलेल्या वेगवेगळ्या बैठकीत भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, शेकाप आमदार बाळाराम पाटील, आमदार पंडित पाटील, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, आरपीआय जिल्हाअध्यक्ष जगदीश गायकवाड, कफ संस्थेचे अध्यक्ष अरु ण भिसे, भाजपा ओबीसी सेलचे रायगड जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, नगरसेवक प्रमोद भगत आदी उपस्थित होते.>मृत्यूच्या सापळ्यातून सुटकासायन-पनवेल महामार्गाच्या रुं दीकरणाच्या कामामुळे कामोठे शहरातून मुंबईकडे जाणाºया रस्त्याच्या दिशेने थेट जोडणी अस्तित्वात नसल्यामुळे कामोठे शहरातून येणाºया वाहनांना कळंबोली सर्कलपर्यंत जाऊन यू-टर्न घेऊन पुन्हा मुंबईकडे जावे लागत असल्यामुळे वेळ व लाखो लिटर इंधन वाया जात असून, दररोज होणाºया वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या अडचणींमुळे अपघात झाले आहेत. चार वर्षांत २८ जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तसेच नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रस्त्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास मृत्यूच्या सापळ्यातून आमची सुटका होईल, अशी भावना या ठिकाणी ये-जा करणारे नागरिक व वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Mumbaiमुंबई