शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मार्च महिन्यात २५ पक्ष्यांना उष्माघाताचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:40 IST

ठाणे : मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढला असून, त्याचा पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. ठाणे शहरात तब्बल २५ ...

ठाणे : मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढला असून, त्याचा पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. ठाणे शहरात तब्बल २५ पक्ष्यांना उष्माघाताचा फटका बसला असून, त्यांना ठाण्यातील सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल (एसपीसीए) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात घार, घुबड, ससाणा यांचा समावेश आहे. २५ पैकी काही पक्ष्यांना औषधोपचार करून सोडण्यात आले आहे.

मार्च महिना सुरू झाल्यापासून तपमानात कमालीची वाढ झाली आहे. सायंकाळीही उन्हाचे चटके लागत आहेत. या वाढलेल्या तापमानाची झळ पक्ष्यांसाठी घातक ठरत असून, उष्माघातामुळे जखमी अवस्थेत सापडणाऱ्या पक्ष्यांमध्ये वाढ झाली आहे. उन्हाळ्यात उष्माघाताने जखमी होण्याचे प्रमाण पक्ष्यांमध्ये अधिक असते. उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांना उन्हाची तीव्रता अधिक भासत असल्याने कबुतर, घार, घुबड, ससाणे, अशा पक्ष्यांचे रुग्णालयात भरती करण्याचे प्रमाण वाढते. या महिन्यात आतापर्यंत २५ पक्षी उष्माघातामुळे घायाळ व जखमी झाले आहेत. त्यात घार- ११, घुबड- ६, तर ससाणा- ८ इतके पक्षी आहेत. जे कमी जखमी झाले होते, त्यांना औषधोपचार करून सोडले आहे. ज्यांची गंभीर जखम आहे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे एसपीसीए रुग्णालयाचे विश्वस्त, सचिव डॉ. सुहास राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. घोडबंदर परिसरात जंगलतोडीमुळे उन्हाचा चटका तीव्र बसत असल्याने या परिसरात जखमी अवस्थेत सापडणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण जास्त असल्याचे ते पुढे म्हणाले.

तापमानात झालेली वाढ पक्ष्यांच्या जिवावर बेतत आहे. वाढत्या उष्माघातामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन हवेत उडतानाच जमिनीवर कोसळून ते जखमी होण्याचे प्रकार वाढत आहेत. यात पक्ष्यांचे पंख तुटणे, डोक्याला दुखापत होणे या उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, सध्या कडाक्याचा उन्हाळा आहे. त्यामुळे शक्य त्याठिकाणी नागरिकांनी पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे, असे आवाहन पक्षीप्रेमींनी केले आहे.