शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

‘मराठी बोला’ चळवळीने जोडले ७० नवे कार्यकर्ते

By admin | Updated: February 5, 2017 03:14 IST

केंद्र शासनाची धोरणे हिंदीधार्जिणी आहेत. त्यांचा इतर भारतीय भाषांनादेखील धोका आहे. मराठी भाषेची होणारी गळचेपी पाहून तिला मानाचे स्थान मिळावे, यासाठी ‘मराठी बोला’ चळवळीने

- जान्हवी मोर्ये,  पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)

केंद्र शासनाची धोरणे हिंदीधार्जिणी आहेत. त्यांचा इतर भारतीय भाषांनादेखील धोका आहे. मराठी भाषेची होणारी गळचेपी पाहून तिला मानाचे स्थान मिळावे, यासाठी ‘मराठी बोला’ चळवळीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यंदाच्या साहित्य संमेलनात मराठी बोला चळवळीने पहिल्यांदाच स्टॉल लावला आहे. साहित्य संमेलनातून ‘मराठी बोला’ चळवळीची माहिती मिळाल्याने आता ६० ते ७० लोक या चळवळीशी जोडले जाणार आहेत. विशाल नवेकर आणि प्रसन्न कुलकर्णी यांनी मराठीची गळचेपी होत असल्याची आणि मराठीला स्वतंत्र स्थान दिले जात नाही, हे लक्षात आल्यावर २००२ मध्ये ‘मराठी बोला’ चळवळीचा प्रारंभ केला. त्यानंतर, ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे धनराज पवार यांनी फेसबुकवर एक ग्रुप तयार केला. त्याला लाइक जास्त मिळाले. त्याची सदस्यसंख्या वाढत आहे. त्यातून याची चळवळ उदयास आली. या चळवळीच्या माध्यमातून कौशिक लेले यांनी इतर भाषेतील ज्ञान मराठीत आणण्यासाठी युनिकोडिंग सुरू केले. या उपक्रमांतर्गत लोकांना भाषांतर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून लोकांचे गट तयार केले आहेत. इतर भाषिक साहित्य मराठी भाषेत आणण्यासाठी त्यांच्यामार्फत प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यांचा वापर शोध निबंध भाषांतरित करण्यासाठी होऊ शकतो. या चळवळीचा सर्व कारभार फेसबुक व टिष्ट्वटर यांच्यामार्फत चालतो. मराठीची गळचेपी होत आहे, हे लक्षात आल्यावर त्या ठिकाणी पत्रव्यवहार करण्याचे काम चळवळीमार्फत केले जाते. त्यामुळे नया अमरावती या शहराचे नाव बदलून नवीन अमरावती, नेरूळचे नेरूळ, तर ब्रांदाचे वांद्रे असे नामकरण केले आहे. कौशिक लेले यांनी अमराठी आणि परदेशी नागरिकांना मराठी शिकवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांनी दोन ब्लॉग तयार केले आहेत. हे काम त्यांनी २ वर्षांपासून सुरू केले आहे. या माध्यमातून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त विदेशी नागरिक मराठी बोलू लागले आहेत. कोणत्याही शिक्षकांविना हे अमराठी नागरिक उत्तम मराठी बोलू लागले आहेत. हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य दिले जाते.