शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पासचा जुगाड करून अनेकांचा रेल्वेने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकांत सर्वसामान्य प्रवाशांना बंदी असतानाही अनेक प्रवासी पासचा जुगाड करून थेट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकांत सर्वसामान्य प्रवाशांना बंदी असतानाही अनेक प्रवासी पासचा जुगाड करून थेट रेल्वेने प्रवास करीत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी नसतानाही अनेक कर्मचारी रेल्वेने प्रवास करताना दिसत आहेत.

अनेक प्रवाशांनी तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून बनावट आयडी कार्डही तयार केले आहेत. याच आयडी कार्डच्या आधारावर पास काढून थेट रेल्वेने प्रवास करीत आहेत; तर काही प्रवासी ओळखीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पास काढून रेल्वेने प्रवास करीत आहेत. पास मिळाला तर सर्व काही ठीक होते, अशी धारणा या जुगाड करणाऱ्या नोकरदारांची आहे. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकांत सकाळच्या वेळेस सर्वच कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तपासले जात नसल्याने त्याच संधीचा लाभ घेत अन्य प्रवासी लोकलने प्रवास करीत आहेत. नियमित प्रवास करण्यासाठी तिकीट परवडत नसल्याने ते कर्मचारी पासचा जुगाड करीत आहेत; तर काही कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित बनावट ओळखपत्र तयार करून त्या ओळखपत्राच्या आधारावर पास काढले आहेत.

महिन्याभरात अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांत तब्बल ४५ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही संख्या अल्प असून पोलिसांची तपासणी होत नसल्याने कोणी कर्मचारी सापडत नसल्याची बाब समोर आली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रेल्वेबंदीच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळत आहे. अंबरनाथ आणि बदलापुरात एकूण प्रवाशांपैकी २० टक्के कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील नसल्याचा अंदाज आहे.

-------------------------

नोकरी आहे तर घर चालणार; त्यामुळे थोडीशी रिस्क घ्यावीच लागते. पासचा जुगाड झाला तर रेल्वेच्या कारवाईला न घाबरता प्रवास करावा लागतो. त्याशिवाय आम्हांला पर्याय नाही.

- रोशनी पवार, रेल्वे प्रवासी, बदलापूर.