शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अनेक शाळांना शिक्षकच नाहीत

By admin | Updated: October 16, 2015 01:53 IST

मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १५९ शाळा असून तालुक्यातील शाळांत २२ मुख्याध्यापक, ६३ पदवीधर, ३४५ उपशिक्षक, असे मिळून ४३० शिक्षक कार्यरत आहेत

रवींद्र साळवे, मोखाडामोखाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १५९ शाळा असून तालुक्यातील शाळांत २२ मुख्याध्यापक, ६३ पदवीधर, ३४५ उपशिक्षक, असे मिळून ४३० शिक्षक कार्यरत आहेत, तर ४० पदे रिक्त असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. गंभीर बाब म्हणजे, कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये अधिक शिक्षक कार्यरत आहेत, तर जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये कमी शिक्षक अशी धक्कादायक माहिती लोकमतच्या हाती आली आहे. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असून सगळा सावळा गोंधळ सुरू आहे.तालुक्यातील कळमगाव जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण दिले जात असून येथे एकच शिक्षक कार्यरत आहे. तर, भोईपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीचा वर्ग असून १८ मुलांचा पट आहे. परंतु, या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत. तसेच कुंडाचापाडा येथे पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून ५९ मुलांचा पट आहे. शिक्षक मात्र एकच. याउलट करोळ येथील जि.प शाळेत १३ मुलांचा पट असतानादेखील दोन शिक्षक आहेत. यामुळे ४७ मुले एकाच शिक्षकाकडून ज्ञानार्जन करीत असतील तर त्या मुलांची गुणवत्ता कशी वाढेल, असा प्रश्न पालक विचारत आहेत. पिंपळपाडा येथील जि.प. शाळेत ४२ मुलांची पटसंख्या असून एकच शिक्षक असल्याने ग्रामस्थांनी अनेकदा शिक्षकांची मागणी करूनदेखील तिच्याकडे अधिकारीवर्गाकडून दुर्लक्ष होत आहे. अशीच काहीशी अवस्था मडक्यांची मेट जि.प. शाळेतदेखील आहे. या शाळेत पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असून ११० विद्यार्थी आहेत. त्यासाठी चार शिक्षक कार्यरत असून चारपैकी एक शिक्षक आजारी असल्याने रजेवर आहे, तर उर्वरित तीन शिक्षकांपैकी एका शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा पदभार असल्याने शालेय कामासाठी वारंवार तालुक्याला यावे लागते. त्यामुळे ११० विद्यार्थ्यांना केवळ दोन शिक्षक ज्ञान देण्याचे काम करत असून गटशिक्षणाधिकारी प्रशांत जाधव यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे शासनाने प्राथमिक शिक्षण हक्काचे व सक्तीचे करणारी तरतूद भारतीय संविधानात केलेली असली तरी या आदिवासी भागात त्यांची अंमलबजावणी स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे होतांना दिसत नाही.तसेच दहा ते पंधरा मुलांचा पट असल्यास गटशिक्षणाधिकारी यांनी समायोजन करणे आवश्यक आहे. परंतु, या बाबीकडे शिक्षण खात्याचे साफ दुर्लक्ष होत आहे. याबाबत, गटशिक्षण अधिकारी प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कॉल उचलला नाही.