शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

अनेक कार्यालये ठाण्यातच

By admin | Updated: October 17, 2015 01:38 IST

३१ आॅक्टोबर २०१५ रोजी राज्य शासनास एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जलयुक्त शिवार

पालघर : ३१ आॅक्टोबर २०१५ रोजी राज्य शासनास एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जलयुक्त शिवार, ग्रामपंचायत ५ टक्के निधी, मध्यवर्ती स्वयंपाकगृह, जिल्हा पर्यटन कार्यक्रम इ. जुन्याच योजनांची कॅसेट पत्रकार परिषदेत वाजविली. मात्र, पालघर जिल्ह्यातील काही कार्यालयांचा कारभार अजूनही ठाण्यातूनच चालतो, याबाबत पत्रकारांनी छेडले असता ते निरुत्तर झाले. विद्यमान राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गुरुवारी पालघर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबले इ. अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर शासनाने नुकतीच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेस मान्यता दिल्याने पालघरसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी ठरणार असल्याचे सवरा यांनी सांगितले. आदिवासी विभागातर्फे विविध उपक्रम राबविताना आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण, पोषण आहारापेक्षा कायद्यांतर्गत ग्रामपंचायतींना मिळणारा ५ टक्के निधी मिळावा, यासाठी २५८ कोटींची तरतूद, ५१ गावांमध्ये राबविण्यात येणारी जलयुक्त शिवार योजना, कौशल्य विकास योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे, जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा, कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी उभारलेले जीवनज्योत अभियान इ. कार्यक्रम आपण हाती घेतले असल्याची जुनीच कॅसेट पत्रकार परिषदेत वाजविली. तर, पालघर जिल्ह्याची प्रशासकीय इमारत होण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत कोणत्या विभागाकडे काम देण्यात येणार आहे, याची पुरेशी माहिती पालकमंत्र्यांजवळ उपलब्ध नव्हती. परंतु, हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले. जिल्हानिर्मितीनंतर अभिलेख कार्यालय, कुपोषण रोखण्यासंदर्भातही उपमुख्य कार्यकारी बालविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा उपनिबंधक, सामाजिक वनीकरण, जिल्हा उद्योग अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, सहा. संचालक नगररचना, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग इ. अनेक कार्यालये सुरुच झालेली नाहीत. तसेच जिल्हा न्यायालय, औद्योगिक कामगार न्यायालय, जिल्हा ग्राहक संरक्षण मंच इ. महत्त्वपूर्ण न्यायालये सुरू होण्याच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसून येत नसून निधी उपलब्ध असताना ही सर्व कार्यालये सुरु करण्याच्या दृष्टीने पालकमंत्र्यांचे वजन कमी पडते का, असा प्रश्न आता यानिमित्ताने उभा राहिला आहे. (वार्ताहर)