शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची चाळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 17:17 IST

हा महामार्ग चिंचोटी येथे मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडत असून मानकोली येथे मुंबई नाशिक महामार्गाला जोडला जातो.

नितीन पंडित

भिवंडी- भिवंडीतील मानकोली चिंचोटी महामार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अंजुरफाटा ते खारबावपर्यंत या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालवितांना वाहन चालकांना अनेक अडचणी येत आहेत . विशेष म्हणजे हा रस्ता बीओटी तत्वावर देण्यात आला असून सुप्रीम कंपनीतर्फे सध्या या रस्त्याची देखभाल दुरुस्ती व टोल वसुली करण्यात येत आहे. हा महामार्ग चिंचोटी येथे मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडत असून मानकोली येथे मुंबई नाशिक महामार्गाला जोडला जातो.तसेच भिवंडीत या मार्गावर गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात विकसित झाला असल्याने या चिंचोटी मानकोली महामार्गावर अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ सुरु असते. या माध्यमातून टोल कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असतो मात्र आर्थिक फायदा होऊनही टोल वासून करणाऱ्या सुप्रीम कंपनीचे रस्त्याच्याया देखभाल दुरुस्तीकडे पुरता दुर्लक्ष होत आहे. 

या रस्त्यावर नेहमीच मोठमोठे खड्डे असल्याने या महामार्गावर नेहमीच अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र या रस्त्याची देखभाल करणाऱ्या सुप्रीम कंपनी त्यासंदर्भात काहीच देणं घेणं नसून केवळ आर्थिक नफा मिळविणे हे एकमेव उद्देश या टोल वसूल करणाऱ्या कंपनीने ठेवले आहे. विशेष म्हणजे राजकीय वरदहस्तामुळे सुप्रीम कंपनी स्थानिकांच्या गंभीर समस्येकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुचनांकडे नेहमीच दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश शासनाने त्वरित सुप्रीम कंपनीला द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.