शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ब्रह्मांड कट्टयावर मानसून स्पेशल गाण्याचा कार्यक्रम संपन्न, 'कारवाँ सुरीली यादोंका...' मध्ये रंगले कट्टेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 15:36 IST

पावसाची गाणी ऐकण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम टाळ्या, डान्स, वन्समोरच्या जल्लोषात मोठ्या दिमाखात पार पडला.

ठळक मुद्देब्रह्मांड कट्टयावर मानसून स्पेशल गाण्याचा कार्यक्रम संपन्न'कारवाँ सुरीली यादोंका...' मध्ये रंगले कट्टेकरी आषाढी एकादशीचे औचित्य साधून पांडुरंगाचे नामस्मरण

ठाणे : ब्रह्मांड कट्टयावर सांज-स्नेह सभागृह, ब्रह्मांड पोलीस चौकी मागे,  आझादनगर, ठाणे येथे हिंदी मराठी रोमंन्टीक गीतांचा सुरीला नजराणा.. भरत तांबे प्रस्तुत , इंडियन कराओके क्लब व प्रतिबिंब निर्मित'कारवाँ सुरीली यादोंका... '(मानसून स्पेशल) हा गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. 

      गायक संदीप पेडणेकर ,.समीर कुलकर्णी भूषण लघाळे,  संजय तिवारी भास्कर सोमनाथ,  युसूफ खान,प्रदीप सोनसूरकर,  राहूल भाटवडेकर तर गायिका अंजली बोरोले,  माधुरी चोरगे अनघा देशपांडे,  शीला फर्नांडिस भूमी जनबंधू,  मिताली वसाडा यांनी सादर केला. कार्यक्रमाची संकल्पना संदीप पेडणेकर,  तृप्ती चव्हाण तर खुमासदार निवेदक पंकज गुजराथी यांचे होते. कट्टयाच्या प्रथे प्रमाणे प्रथम स्थानिक रहीवाशांना त्यांच्या वैयक्तिक कलेचे सादरी करण करण्याची संधी देण्यात  येते. त्या प्रमाणे सदाबहार व्यक्तिमत्व अरविंद विंचुरे काका यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून पांडुरंगाचे नामस्मरण केले. जादूगर मधुगंधा हीन् कलासंस्कारच्या अध्यक्षा वर्षा गंद्रे यांच्यावतीने परिसरात इको फ्रेंडली गणेशाची उपयुक्त माहीती दिली व शाडूमातूचे गणपती घ्या असे आवाहन केले तर मुलुंडच्या रसिक ग्रुपचे व विरंगुळा या सिनियर सिटीझन केंद्राचे ८० वर्षे वय असलेले श्री. हरिश्चद्र चाचड यांनी ब्रह्मांड कट्टयावर  हजेरी लावली. त्यांचे ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव व अध्यक्ष महेश जोशी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. चाचड यांनी सुध्दा त्यांच्या स्वरचित कवितांचा काव्यसंग्रह ब्रह्मांड कट्ट्यास भेट केला व आषाढी एकादशी निमित्ताने एक सुंदर अभंग सादर केला आणि महम्मद रफी यांच्या पुण्यतिथीचे स्मरण म्हणून "ओ दुनिया के रखवाले" हे गीत पेश करुन रसिकांची वाहवा मिळवली. 

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला निर्माता भरत तांबे यांचे स्वागत करुन निवेदक पंकज गुजराथी यांनी अत्यंत शांत, संयमी व धिरगंभीर स्वरात सर्व उपस्थितांचे आभार मानून सर्वप्रथम गणेशवंदनेने कार्यक्रम सुरु  झाला. तद्नंतर रीमझीम रुमझुम ह्या सुंदर अशा गाण्याने पाऊस गीतांना सुरुवात झाली. बाहेर पावसाची रिपरिप थांबली होती. पाऊस जवळजवळ थांबला होता पण आत सभागृहामध्ये सुंदर सुंदर गाण्यांची स्वरांची बरसात मात्र अविरतपणे होत होती. रसिक त्यात न्हाऊन निघत होते. ये रे घना ये रे घना, रीमझीम गिरे सावन, जिंदगी भर नही भूलेगी वो बरसात की रात, सावन का महिना, रीमझीम के गीत सावन गाये,इक लडकी भिगी भागीसी,  मेघा छाये आधूरात,  बोल रे पपीहरा,  ये रात भिगी भिगी,  तुम जो मिल गये हो,  आज रपट जीये तो अशा एकापेक्षाएक अवीट गोडीच्या गाण्यांची बरसात सुरु होती. मध्येच प्रिती नांवाच्या ब्रह्मांडच्या बाल कलाकार मुलीने अजिब दास्तां है ये हे सदाबहार गीत सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. शेवटी शेवटी दिल तेरा दिवाना व डम डम डीगा डीगा  या सारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना ताल धरायला लावला. रसिकांचे पाय ह्या गाण्यांवर थिरकले. शेवटी ब्रह्मांड कट्टयाचे आयोजक राजेश जाधव यांनी आभार प्रदर्शन केले तर महेश जोशी यांनी पाहुणे कलाकारांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सांगता केली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई