शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मानवाच्या चांद्रअभियानाचा विद्यार्थ्यांकडून जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:30 IST

अंबरनाथमध्ये कार्यक्रम : दा. कृ. सोमण यांनी चित्रफितीद्वारे दिली माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा

अंबरनाथ : चंद्रावर मानवाने २० जुलै १९६९ रोजी पहिले पाऊल ठेवले. त्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी ५० वर्षांपूर्वीचा अनुभव चित्रफितीद्वारे सादर केला. यावेळी दी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रफीत पाहून जल्लोष केला. आयुष्यात सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन सोमण यांनी यावेळी केले.

५० वर्षांनंतर विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय चांगला सुवर्णयोग जुळून आला आहे. तो म्हणजे ५० वर्षांपूर्वी म्हणजे २० जुलै १९६९ रोजी अपोलो यान चंद्रावर उतरले व मानवाने पहिले पाऊल ठेवले. येत्या सोमवारी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार आहे. इस्रोच्या स्थापनेला १५ ऑगस्ट रोजी ५० वर्षे होत आहेत. या गोष्टी भारतीयांची मान उंचावणाऱ्या असल्याने जल्लोष करण्याचे आवाहन त्यांनी केले.चंद्रावर दिवस हा १४ दिवसांचा असतो. तसेच वातावरणाच्या पलीकडे गेलो, तर आकाश काळे दिसते. इस्रोने गेल्या ५० वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे. चांद्रयान-१, मंगळयान, एकावेळी १०४ उपग्रह सोडले आणि आता चांद्रयान-२ सोडण्यात येणार आहे. त्यामुळे साºया जगाचे लक्ष लागले असल्याचे सोमण यांनी सांगितले. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व प्रगती कमी वेळेत व अत्यंत कमी खर्चात केली असल्याने इस्रोच्या कार्याचा भारतीय म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटतो, असेही सोमण यांनी सांगितले.

आपल्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, अलीकडेच चंद्रग्रहण होते. ग्रहणाच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. चमत्कार हा कधीही नसतो. चमत्कारामागील विज्ञानाचा अभ्यास केला की, खरे ज्ञान मिळते, असेही त्यांनी सांगितले.

भाऊसाहेब परांजपे विद्यालयात नेत्रा चव्हाण यांनी स्वागत केले. तर महात्मा गांधी विद्यालयात अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगावकर यांनी स्वागत केले. नरेंद्र कुलकर्णी, डॉ. गौतम जटाले, डॉ. झरना जटाले, शैलेश रायकर, पंकज भालेराव, संतोष भणगे आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2