शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मानवाच्या चांद्रअभियानाचा विद्यार्थ्यांकडून जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:30 IST

अंबरनाथमध्ये कार्यक्रम : दा. कृ. सोमण यांनी चित्रफितीद्वारे दिली माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा

अंबरनाथ : चंद्रावर मानवाने २० जुलै १९६९ रोजी पहिले पाऊल ठेवले. त्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी ५० वर्षांपूर्वीचा अनुभव चित्रफितीद्वारे सादर केला. यावेळी दी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रफीत पाहून जल्लोष केला. आयुष्यात सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन सोमण यांनी यावेळी केले.

५० वर्षांनंतर विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय चांगला सुवर्णयोग जुळून आला आहे. तो म्हणजे ५० वर्षांपूर्वी म्हणजे २० जुलै १९६९ रोजी अपोलो यान चंद्रावर उतरले व मानवाने पहिले पाऊल ठेवले. येत्या सोमवारी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार आहे. इस्रोच्या स्थापनेला १५ ऑगस्ट रोजी ५० वर्षे होत आहेत. या गोष्टी भारतीयांची मान उंचावणाऱ्या असल्याने जल्लोष करण्याचे आवाहन त्यांनी केले.चंद्रावर दिवस हा १४ दिवसांचा असतो. तसेच वातावरणाच्या पलीकडे गेलो, तर आकाश काळे दिसते. इस्रोने गेल्या ५० वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे. चांद्रयान-१, मंगळयान, एकावेळी १०४ उपग्रह सोडले आणि आता चांद्रयान-२ सोडण्यात येणार आहे. त्यामुळे साºया जगाचे लक्ष लागले असल्याचे सोमण यांनी सांगितले. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व प्रगती कमी वेळेत व अत्यंत कमी खर्चात केली असल्याने इस्रोच्या कार्याचा भारतीय म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटतो, असेही सोमण यांनी सांगितले.

आपल्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, अलीकडेच चंद्रग्रहण होते. ग्रहणाच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. चमत्कार हा कधीही नसतो. चमत्कारामागील विज्ञानाचा अभ्यास केला की, खरे ज्ञान मिळते, असेही त्यांनी सांगितले.

भाऊसाहेब परांजपे विद्यालयात नेत्रा चव्हाण यांनी स्वागत केले. तर महात्मा गांधी विद्यालयात अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगावकर यांनी स्वागत केले. नरेंद्र कुलकर्णी, डॉ. गौतम जटाले, डॉ. झरना जटाले, शैलेश रायकर, पंकज भालेराव, संतोष भणगे आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2