शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

मानवाच्या चांद्रअभियानाचा विद्यार्थ्यांकडून जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:30 IST

अंबरनाथमध्ये कार्यक्रम : दा. कृ. सोमण यांनी चित्रफितीद्वारे दिली माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा

अंबरनाथ : चंद्रावर मानवाने २० जुलै १९६९ रोजी पहिले पाऊल ठेवले. त्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी ५० वर्षांपूर्वीचा अनुभव चित्रफितीद्वारे सादर केला. यावेळी दी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रफीत पाहून जल्लोष केला. आयुष्यात सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन सोमण यांनी यावेळी केले.

५० वर्षांनंतर विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय चांगला सुवर्णयोग जुळून आला आहे. तो म्हणजे ५० वर्षांपूर्वी म्हणजे २० जुलै १९६९ रोजी अपोलो यान चंद्रावर उतरले व मानवाने पहिले पाऊल ठेवले. येत्या सोमवारी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार आहे. इस्रोच्या स्थापनेला १५ ऑगस्ट रोजी ५० वर्षे होत आहेत. या गोष्टी भारतीयांची मान उंचावणाऱ्या असल्याने जल्लोष करण्याचे आवाहन त्यांनी केले.चंद्रावर दिवस हा १४ दिवसांचा असतो. तसेच वातावरणाच्या पलीकडे गेलो, तर आकाश काळे दिसते. इस्रोने गेल्या ५० वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे. चांद्रयान-१, मंगळयान, एकावेळी १०४ उपग्रह सोडले आणि आता चांद्रयान-२ सोडण्यात येणार आहे. त्यामुळे साºया जगाचे लक्ष लागले असल्याचे सोमण यांनी सांगितले. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व प्रगती कमी वेळेत व अत्यंत कमी खर्चात केली असल्याने इस्रोच्या कार्याचा भारतीय म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटतो, असेही सोमण यांनी सांगितले.

आपल्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, अलीकडेच चंद्रग्रहण होते. ग्रहणाच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. चमत्कार हा कधीही नसतो. चमत्कारामागील विज्ञानाचा अभ्यास केला की, खरे ज्ञान मिळते, असेही त्यांनी सांगितले.

भाऊसाहेब परांजपे विद्यालयात नेत्रा चव्हाण यांनी स्वागत केले. तर महात्मा गांधी विद्यालयात अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगावकर यांनी स्वागत केले. नरेंद्र कुलकर्णी, डॉ. गौतम जटाले, डॉ. झरना जटाले, शैलेश रायकर, पंकज भालेराव, संतोष भणगे आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2