शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

खरेदीसाठी गर्दी झाल्याने व्यवस्थापनाने डी-मार्ट केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:37 IST

कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागू केला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनच्या ...

कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागू केला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनच्या भीतीपोटी खरेदीसाठी नागरिकांनी कल्याणच्या डी-मार्टमध्ये मंगळवारी एकच गर्दी केली होती. त्यामुळे डी-मार्ट व्यवस्थापनाने मॉल बंद करण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने वीकेंड लॉकडाऊन लागू केला. पहिला वीकेंड लॉकडाऊन लावूनसुद्धा रुग्णांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे १४ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत सरकार आहे. लॉकडाऊन लागण्याआधीच घरात लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी मंगळवारी डी-मार्टबाहेर एकच गर्दी झाली. याच डी-मार्टवर महापालिका व पोलीस प्रशासनाने यापूर्वी दोन वेळा कारवाई केली आहे. त्यामुळे आजची गर्दी पाहून कारवाई होण्याआधीच डी-मार्टच्या प्रशासनाने डी-मार्ट बंद केले. मात्र, प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली आहे. प्रशासनाकडून डी-मार्टच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. सोमवारी महापालिका प्रशासनाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणारी चार दुकाने सील केली होती. लक्ष्मी मार्केटमधील एक दुकान, बाजारपेठ हद्दीतील पानेरी आणि बाबला साडी सेंटर, नांदिवली रोडवरील एक इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आणि एका भाड्याच्या दुकानाविरोधात कारवाई करण्यात आली होती. वीकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी कल्याण कोळसेवाडी परिसरात खरेदीसाठी महिलांची गर्दी होती. त्याचबरोबर आंबिवली परिसरातील दुकानातही खरेदीसाठी गर्दी दिसून आली. कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. मात्र, काही नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्याने त्याचा फटका नियम पाळणाऱ्यांनाही बसत आहे.

-----------------------------