शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

आयुक्तबदलाची नोंद गिनीज बुकमध्ये करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 03:18 IST

पवार यांच्या निर्णयामुळे सत्ताधारी नेत्यांचे हितसंबंध दुखावल्याची शिक्षा त्यांना केल्याचा आरोप त्यांनी केला.

भार्इंदर : राज्यातील भाजपा सत्ताकाळात चार वर्षांत चार आयुक्त, त्यांचा कार्यकाळ पूर्ण न करताच बदलल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी दिली.यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांची शहरात येजा होत नसली, तरी शहराचा विकास मात्र होत होता. परंतु, भाजपाच्या सत्ताकाळात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शहरात सतत राबता असल्याने त्यांचे शहराकडे अधिकच बारीक लक्ष असल्याचा टोला सावंत यांनी लगावला. तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या बदलीसाठी भाजपा लोकप्रतिनिधींनी आपली कार्यालये बंद ठेवून जनतेला वेठीस धरले होते. त्यानंतर, आयुक्तापदावर विराजमान झालेल्या बळीराम पवार यांची तर अवघ्या दोन महिन्यांतच उचलबांगडी करण्यात आली. पवार यांच्या निर्णयामुळे सत्ताधारी नेत्यांचे हितसंबंध दुखावल्याची शिक्षा त्यांना केल्याचा आरोप त्यांनी केला. असे सुडाचे राजकारण करणाऱ्या सत्ताधाºयांनी पालिकेत आयुक्त नियुक्त न करता स्वत:च प्रशासन चालवावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी भाजपाला दिला.रखडलेला उत्तन घनकचरा प्रकल्प, तीव्र पाणीटंचाई, ठप्प झालेली विकासकामे, कोलमडलेली परिवहनसेवा, पालिका शाळांची दुरवस्था, वाढलेली अनधिकृत बांधकामे, रद्द झालेला विकास आराखडा, रेंगाळलेली पंतप्रधान आवास योजना, अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या आदी प्रश्नांमुळे शहरातील जनता त्रस्त असताना क्षुल्लक कारणास्तव आयुक्त बदलणे हा जनतेवर अन्याय आहे, असे सावंत म्हणाले. भाजपाच्या सत्ताकाळात गेल्या चार वर्षांत चार आयुक्तांचा राजकीय बळी घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला....तर रस्त्यावर उतरणारशहराच्या विकासाकरिता स्थानिक नेत्याच्या मर्जीतील नव्हे तर एक सक्षम आयुक्त मुख्यमंत्र्यांनी द्यावा. सरकारने या गोंधळात लक्ष घातले नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून भाजपाच्या प्रशासकीय कारभारातील हस्तक्षेपाचा तीव्र विरोध करील.

टॅग्स :commissionerआयुक्त