शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

'डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा बनवा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:17 IST

मंगेश पाटे यांची मागणी; हल्ले न थांबल्यास रुग्णांना तपासणार नाही

डोंबिवली : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी पुकारलेल्या बंदमध्ये शहरातील १०० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला. केंद्र सरकारने हे हल्ले तत्काळ रोखावेत, अन्यथा यापुढे अशा घटना घडल्यास पूर्णत: काम बंद आंदोलन केले जाईल. त्यात जर एखाद्या रुग्णाच्या जीवनमरणाचा प्रश्न उद्भवल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, याची नोंद सत्ताधाऱ्यांनी घ्यावी, असा इशारा संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. मंगेश पाटे यांनी केले. देशभरातील आंदोलनासंदर्भात माहिती देण्यासाठी आयएमएने सोमवारी डोंबिवली जीमखाना येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पाटे यांनी पश्चिम बंगालमधील घटनांची चित्रफीत दाखवत निषेध व्यक्त केला.डॉक्टर हादेखील माणूस आहे. कोणीही आमच्या जीवावर उठू नये. अन्यथा आम्हालाही पूर्णत: कामबंद आंदोलन करावे लागेल. डॉक्टर हा सामाजिक बांधिलकी जपून काम करतो. त्याला रुग्ण सेवा करताना मिळणारा आनंद मिळू द्या. क्षुल्लक कारणावरून त्याच्या जीवावर हल्ला करू नका. पण तरीही विविध राज्यांमध्ये डॉक्टरांवरील हल्ले कमी होत नाहीत, ही शोकांतिका आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे केंद्र सरकारने डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कायदा बनवावा अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात या आधीच्या केंद्र सरकारला माहिती दिली आहे. मात्र, हा कायदा अजूनही झालेला नाही. हे काही प्रमाणात देशभरातील खासदारांचेही अपयश आहे. आता पुन्हा केंद्रात मोदी सरकार आले आहे. त्यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. निदान या पाच वर्षांत तरी तसा कायदा तयार करावा. तो मंजूर करण्यासाठी विधेयक मंजूर करावे लागेल. त्यासाठी संस्थेने देशभरातील सर्व खासदारांना पुन्हा नव्याने निवदेन दिले आहे. पावसाळी अधिवेशनात हा विषय डॉक्टरांसाठी खासदारांनी मांडावा, आणि डॉक्टरांना लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी डॉ. अर्चना पाटे, मीना पृथ्वी, डॉ. वंदना धाकतोडे, डॉ. भक्ती लोटे, डॉ. विजयालक्ष्मी तसेच विविध डॉक्टर उपस्थित होते.डॉक्टरांच्या बंदला आयुर्वेदिक सेवा देणाºया वैद्यांनीही पाठिंबा दिला. त्यांनीही दिवसभर काळ्या फिती बांधून येणाºया प्रत्येक रुग्णाला डॉक्टरांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, या संदर्भात माहिती दिल्याचे वैद्य विनय वेलणकर यांनी सांगितले.कल्याणमध्ये आयएमए, आयुर्वेद व्यासपीठाकडून निषेधकल्याण : डॉक्टरांच्या बंदला कल्याणमधील ५०० डॉक्टरांनी पाठिंबा दर्शवला. तर, आयुर्वेद व्यासपीठ, कल्याणच्या डॉक्टरांनी काळ्या फिती लावून हल्ल्याचा निधेष केला. दरम्यान, बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळल्याने रुग्णांची फारशी गैरसोय झाली नाही. कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या अमानुष मारहाणीचे पडसाद देशभरात उमटले आहेत. कल्याणमधील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेने या बंदला पाठिंबा दिला. संघटनच्या सर्व सदस्यांनी काळ्या फिती लावून कल्याण-मुरबाड रोड परिसरात डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला. सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, मागणी संघटनेचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांनी केली. आयुर्वेद व्यासपीठाच्या कल्याण शाखेच्या शंभर सदस्यांनीही निषेध नोंदवला. तसेच काळ्या फिती लावून काम केले, अशी माहिती डॉ. अभिजीत ठाकूर यांनी दिली.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप