शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
5
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
6
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
7
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
8
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
9
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
10
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
11
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
12
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
13
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
14
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
15
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
16
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
17
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
18
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
19
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
20
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

पर्यायी व्यवस्था करा,मगच घरे खाली करतील - जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 22:24 IST

सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले आहेत

ठाणे :  गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे रुळाच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाकडून घरे खाली करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. हे माणुसकीला धृब नसून आधी त्यांची पर्यायी व्यवस्था करा, मगच ते ओक घरे खाली करतील असे मत गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेच्या देशभरात अनेक ठिकाणी जमिनी असून त्यातील काही जमिनींवर वर्षानुवर्षे अतिक्रमणे आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेने या जमिनी मोकळ्या करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कळवा, कल्याण (पूर्व) आणि डोंबिवली येथील रहिवाशांना रेल्वेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून तातडीने घरे रिकामी करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे अचानक असे काय झाले की त्यांना घरे खाली करण्याच्या नोटीसा काढण्यात आल्या. त्यात सात दिवसाच्या आत गजरे खाली करण्यास देखील सांगण्यात येत आहेत. हे माणूसकीला धरून नाही. संपूर्ण मुंबईभर लाखो लोक गेल्या 70 वर्षांपासू  रेल्वे रुळापासुन 15-20 फुटावर राहतात.

या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारने प्रमुख भूमिका घ्यावी लागेल. या जमिनींवर राहणारे माणसे देखील तुमचेच आहेत. त्यामुळे या माणसांना तुम्हाला वाचवावेच लागेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आधी त्यांची पर्यायी व्यवस्था करा आणि त्याच्या नंतरच ते घरे खाली करतील. तसे न झाल्यास  आम्ही त्या गोर गरीब लोकांबरोबर ठामपणे उभे राहू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच या निर्णयाचा सन्मान करीत त्याला विरोध देखील आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला.