शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

पर्यायी व्यवस्था करा,मगच घरे खाली करतील - जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 22:24 IST

सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले आहेत

ठाणे :  गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे रुळाच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाकडून घरे खाली करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. हे माणुसकीला धृब नसून आधी त्यांची पर्यायी व्यवस्था करा, मगच ते ओक घरे खाली करतील असे मत गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेच्या देशभरात अनेक ठिकाणी जमिनी असून त्यातील काही जमिनींवर वर्षानुवर्षे अतिक्रमणे आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेने या जमिनी मोकळ्या करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कळवा, कल्याण (पूर्व) आणि डोंबिवली येथील रहिवाशांना रेल्वेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून तातडीने घरे रिकामी करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे अचानक असे काय झाले की त्यांना घरे खाली करण्याच्या नोटीसा काढण्यात आल्या. त्यात सात दिवसाच्या आत गजरे खाली करण्यास देखील सांगण्यात येत आहेत. हे माणूसकीला धरून नाही. संपूर्ण मुंबईभर लाखो लोक गेल्या 70 वर्षांपासू  रेल्वे रुळापासुन 15-20 फुटावर राहतात.

या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारने प्रमुख भूमिका घ्यावी लागेल. या जमिनींवर राहणारे माणसे देखील तुमचेच आहेत. त्यामुळे या माणसांना तुम्हाला वाचवावेच लागेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आधी त्यांची पर्यायी व्यवस्था करा आणि त्याच्या नंतरच ते घरे खाली करतील. तसे न झाल्यास  आम्ही त्या गोर गरीब लोकांबरोबर ठामपणे उभे राहू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच या निर्णयाचा सन्मान करीत त्याला विरोध देखील आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला.