शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

माहीम बीचवरील शासकीय भूखंडमाफियांच्या घशात?

By admin | Updated: May 22, 2016 01:12 IST

केळवे आणि माहीम दरम्यानच्या किनाऱ्यावरील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली व मच्छीमारी व्यवसायाच्या वापरातील सुमारे २० ते २५ एकर शासकीय जमीन काही

हितेन नाईक,  पालघरकेळवे आणि माहीम दरम्यानच्या किनाऱ्यावरील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली व मच्छीमारी व्यवसायाच्या वापरातील सुमारे २० ते २५ एकर शासकीय जमीन काही बांधकाम व हॉटेल व्यावसायिक असलेल्या भूमाफियांनी बळकावण्याचा डाव महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आखला आहे. एका रात्रीत त्यांनी काही तिवरांची कत्तल करून त्या जागेवर खुंटेही रोवल्याची तक्रार माहीम मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था व विविध सोसायट्यांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. केळवा येथील निसर्गरम्य वातावरण, सुंदर समुद्रकिनारा यामुळे या बीचवर मुंबई, ठाणे, गुजरात, नाशिक इ. भागांतील पर्यटक दरवर्षी येत असतात. केळवा, दादरपाडा, टेंभी, माहीम इ. समुद्रकिनारे निसर्गसंपत्तीने नटलेले असल्याने येथील जमिनीला गुंठ्यामागे १५ ते २० लाखांचा दर मिळतो आहे. त्यामुळे या भागातील किनाऱ्यावरील सरकारी व वनजमिनीकडे भूमाफियांच्या नजरा वळू लागल्या आहेत. बेकायदेशीररीत्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून त्या जमिनी भूमाफियांच्या हवाली केल्या जात आहेत.एखाद्या शासकीय योजनेचा फायदा घेत या किनाऱ्यावरील जागा बळकावण्याचे षड्यंत्र वरिष्ठ पातळीवरून खेळले जात असल्याची माहितीही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तत्काळ या प्रकाराची दखल घेऊन ही अतिक्रमणे दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आम्ही याबाबतचा लढा सनदशीर मार्गाने लढू, परंतु त्यामुळे आमचा हेतू साध्य झाला नाही तर या अतिक्रमणाविरोधात माहीम, मुंबई कफ परेड, कुलाबा येथे राहणारी मंडळी एकत्र येऊन आंदोलन उभारू असा परखड इशाराही नारायण तांडेल यांनी दिला. माहीम मांगेल आळीमध्ये मागील अनेक वर्षांपासून नौकांद्वारे मच्छीमारी केली जात होती. त्यामुळे किनाऱ्यावरील मोकळ्या जागेत मच्छीमारी नौका शाकारणे, मासे सुकवणे, जाळी विणणे इ कामे करून मच्छिमार झोपड्या बांधून राहत होते. परंतु बंदर व मूलभूत सुविधा नसल्याने इथला मच्छीमार हळूहळू मुंबईमध्ये स्थायिक झाला होता. त्यामुळे आता मोजक्या बोटीद्वारे इथे आजही मासेमारी सुरू आहे. त्याच्याकडून त्या रिकाम्या जागेचा वापर होत असताना काही भूमाफियांनी एका रात्रीत त्या मच्छीमारांच्या वहिवाटीच्या जागांवर सिमेंट पोल गाडून अनधिकृत कुंपणे केली आहेत. पालघर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी जागा, सरकारी, वनजमिनी या वर अतिक्रमणे करून अनधिकृत बांधकामे उभी राहत असून मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून त्या सरकारी जागा खासगी व्यक्तीच्या नावावर चढवल्या जात आहेत.